आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, June 09, 2007

असा पाऊस बरसतो......
असा पाऊस बरसतो,
जसं तुझ्‍या प्रेमानं दाटून आलेलं आभाळ, सैर होऊन कोसळावं
अंगणातल्‍या मातीचा सुवास तुझ्‍या पाणीदार डोळ्‍्यांत हरवावा

ओन्‍जळभर पाण्‍यात, तुला स्‍मरावे सारे 'ते' पाऊस...
हिरवी ओली पाने अन् त्‍यांच्‍या टोकाशी नाचणारा हर एक थेंब!

माझ्‍या मनीचा विश्र्‍वास.....

मी वेडा...फ़क्‍त तुझ्‍याचसाठी
तुझे असणे किंवा नसणे याचं भानही नाही मला

ओन्‍जळभर पाऊस हातात माझ्‍या...त्‍यावरून फ़ुटणारे तुषार...
फ़क्‍त तुझेच!!!

तुझ्‍या प्रतिबिंबाला होणारा वार्‍याचा किंचित स्‍पर्श...
अन् मी घट्‍ट मिटून घेतलेली माझी मूठ!


आज ही 'तोच' पाऊस खुणावतोय...माझ्‍या मनातील तुझ्‍या प्रतिमेला!
मी मात्र घाबरलेला...बावरलेला
डोळे भरून ह्रदयात खोलवर साठवलेलं तुला,
ओन्‍जळभर पावसात पुन्‍हा उघड्‍या डोळ्‍यांनी भेटायचे....

पण...पण हा पाऊस, हा पाऊस...
जसा सर्वत्र,
तसाच...माझ्‍या डोळ्‍यात ही!
वेलेंटाइन डे जवळ आला
वेलेंटाइन डे जवळ आला
की होते मनात चलबिचल,
या वेळीही इतरांप्रमाणे
कुणीच हकाचे नाही माझ्याजवळ...

मलाही girl friend मिळावी ॥
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
का हवा one night stand ॥
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी।


वेळ थोडाच आहे गं माझ्याकडे
पण अजुनही खुप काही करायच बाकी आहे....
आपल्याच माणसान्नी दिलेल्या
जखमा भरायच अजुन बाकी आहे...

तुझ्या प्रेमाची सवय
झाली होती मला!
म्हणुनच तुला विसरायचा
प्रयत्न अजुन बाकी आहे....

तुझ्या अमुल्य वेळेतला थोडा
अजुन वेळ देशिल का मला?
अजुनही प्रेमाचं तुझ
एक कर्तव्य अजुन बाकी आहे....

मला स्मशानापर्यंत
सोडुनच परतु नकोस
माझ्या काळजात तुझ्याबद्द्ल्च्या
भावना अजुन बाकी आहेत......

जाताना त्या तुझ्यासन्गे घेउन जा...
कारण माझ्या देहाच
जळणं अजुन बाकी आहे......

मला जाळताना रडु नकोस वेडे
नाही तर त्या यमालाही सान्गाव लागेल
जरा थाम्बतोस का माझ
तिला समजवण अजुन बाकी आहे....
क्षितीज

आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी....
एक प्रेयसी पाहीजे...

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?
कोणितरी जवळ असावसं वाटतं

आपलंही स्वतःचं कोणी असावसं वाटतं


एखाद्या संध्याकाळी ढग दाटून येतात

मन असंच आनंदात भिजतं

सर्वान्ना हवासा छान पाऊस पडतो

मलाही मग कोणातरी सोबत चिंब भिजावसं वाटतं


एखादं गाणं ऐकताना एखादा स्वर भावून जातो

मनाला शांत करणारा गारवा देऊन जातो

अशावेळी दाद देणारं कोणी हवं असतं

कारण मलाही असं शांत व्हायचं असतं


कधितरी दिवस असाच वाईट जातो

एकट्या या मनाला आणखी दुखावून जातो

अशावेळी कुशीत शिरुन रडावंसं वाटतं

माझं तेव्हा कोणितरी असावंसं वाटतं


अशातंच शेवटी निघायची वेळ येते

कोणितरी थांबवणारं असावंसं वाटतं

निघून गेल्यावर रडणारं कोणितरी असावंसं वाटतं

म्हणूनच मला दुकटं व्हावंसं वाटतं
ज़न्माला आला आहेस
थोडं जगून बघ ,

जीवनात दु:ख खूप आहे
थोडं सोसून बघ !

चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस ,
दु:खाचे पहाड चडून बघ !

यशाची चव चाखून बघ ,
अपयश येत, निरखून बघ ,

डाव मांडणं सोपं असतं ,
थोडं खेळून बघ !

घरटं बांधणं सोपं असतं ,
थोडी मेहनत करुन बघ !

जगणं कठीण असतं , मरणं सोपं असतं ,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !

ज़ीणं - मरणं एक कोडं असतं ,
जाता - जाता एवढं सोडवून बघ !

~~~~~~ : ~~~~~~

एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...

फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...

फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...

फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...

मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...

तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...

वाटणारी प्रत्येक गोष्ट शब्दात मांडता आली तर
मनातली प्रत्येक भावना बोलून दाखवटा आली तर
तुझ्या स्पर्श्याशिवाय ही मला शहारता आले तर
बरोबर पहिलेल्या स्वप्णाना विसरता आले तर
घेतलेल्या सर्व शपथाना मोडता आले तर
समोर पाहून ही तुला टाळता आले तर
तूच डाव मोड्लस हे मनाला सांगता आले तर
तुझ्या इतके नाही पण थोडे फार तुझ्या सारखे वगता आले तर
प्रेमाला खेळ समजून पुन्हा पुन्हा डाव मांडता आला तर
नाही जमणार हे मला माहीत आहे
पण काही ही करून तुला विसरता आले तर
किती बरे होईल तुझ्याशिवाय जगता आले तर
सुखी होईल मी जर तुला विसरता आले तर
विसरलोय तुला हे सहज सांगता आले तर
तुज्याशिवाय ही जगू शकतो हे पटवून घेता आले तर
तू नसताना ही हासतो आहे आसे भासवाता आले तर
तू आता माझी नाही हे मनाला बजावता आले तर
सुखी होईल मी जर तुला विसरता आले तर

आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...
पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !

म्हणूनच ......
आज तुला जे काही बोलायचंय ते सारं बोलशील का ?
स्वतःला विसरून फक्त माझ्या डोळ्यांमधे हरवशील का ?

हातात हात घेऊन मनातील सारे भाव सांगशील का ?
गुपित तुझ्या ह्रुदयातील सांग ना उलगडशील का ?

सर्व दुःख यातना विसरून मनापासून हसशील का ?
झुगारून सारी बंधनं फक्त माझाच होऊन राहशील का ?

कारण .......
आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...
पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !!!

आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील
आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील
तुझे आभार कसे मानू
हे गरजणारया नभा..
आलीये माझ्या मिठीत ती घाबरूनी
आता तु जरासा रहा तिथेच उभा...

मी बावरलॊ होतो
जेव्हा तु माझ्या मिठीत आलीस..
स्वप्नील दुनियेला माझ्या
तु गुज प्रेमळ अस्तित्वाची दिलीस॥

कुंपणापलिकडे जायचं म्हटलं
तरी काटे तसे फार नव्हते
तिच्या गुलाबी ओठांनी मात्र
बंद केलेले एक दार होते.

जेव्हा मी बोलत नसतो
अन तिही समोर गप्प असते
चार डोळ्यांचे तेव्हा मात्र
सुरू शब्दिक द्वंद्व असते

रूसायचं मी तुझाकडून शिकलोय
त्यात न बोलता झुरवायचं असतं
आसावलेल्या डोळ्यांनी घायाळ करून
मग खोट्या अश्रूंनी चिघळायचं असतं

तिचं गोड हसणं जणू
ग्रीष्मशापाला पर्जन्य-वर आहे
त्याला मृदगंधाने दरवळलेल्या
आसमंताची सर आहे.

तिनं, ‘प्रेम कसं असतं?’ विचारता
मी उपहासाने हसलो
तिच्या डोळ्यांतले भाव सोडून
नस्ती उदाहरणं देत बसलो।



ऊशीरा येण्याचे तुजकडे
एकनेक बहाणे असतात
मजकडे मात्र प्रतीक्षेचे
युगन्युग मागल्या क्षणांचे असतात.

लावते पिसे मनाला
ही रम्य मदभरी सांजवेळ
अन बोटांनी बोटांशी केलेला
तो स्पर्शाचा नाजुक खेळ.

प्रयत्नांची शर्थ करावी किती
भाती नजरबाणांची झाली रिती
तिचे कौशल्य नेहेमी जिंकायला पुरेसे
तिथे हरायची सतत मलाच भीती.

थोडं प्रेम करू म्हणतो
तर तुझं नको नको म्हणणं असतं
फुलांवर बागडणाऱ्या भुंग्याचं त्यावर
वाकुल्या करीत हसणं असतं.

ओल्या वाळूवर चालताना एक
लाट तुझ्या पायांशी पोचलेली
तिनं पावलं पुसण्याधी तुझी
मी हळूच ती वाळू चोरलेली.

तुझ्या लावण्याशी स्पर्धा करू म्हणून
चंद्रचांदण्या व वाळू एक झाले
अगणित चांदण्या अन निखर्व वाळूकण
यांना तरी सपशेल अपयश आले.

पूर्वी सूर्य उदास वाटायचा
अथांग सागरात बुडताना
तुझ्या सोबती आज जीव जडतो
त्या संध्येचे वर्ण मोजताना।


लहान असताना..तुझ्याबरोबर
भातुकलीच्या खेळात रमायचो..
आता कळायला लागले तर..
माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला सुद्धा दचकायचो॥

स्पर्श माझा..
तुला हवाहवासा...
जसा हवेला छेडणारा..
मंद गारवा साजेसा॥

तुझ्याशिवाय जगणं
व्यर्थच आहे म्हणा..
कारण तु काही बोलली नाहीस तरी
जगवतात मला तुझ्या त्या प्रेमाच्या खाणाखुणा॥

प्रेम माझं
हे असचं असतं..
कुठे कपारीतला पाझर
तर कूठे कुठे प्रेमरसाचा सागर असतं

उमलणारं फुल तु..
त्याला सुगंधाची लहर..
तुझं असं रूप पाहूनी..
शरीरात येतो नुसता प्रेमाचाच कहर॥

मनाची तळमळ..
जशी शिशिराची पानगळ..
मग तुझ्या स्पर्श..
जशी सृष्टिला हिरवाईची भूरळ...

तुझ्या गळामिठीणं..
डोळ्यात चांदण चमकलं..
तुझ्या चुंबनाने तर..
चंद्राला मधानेच भिजवलं॥

गरजणारे ढग ..
कोसळणारा पाऊस..
माझ्या मनाला सुद्धा ..
तुझ्या प्रेमवर्षावाची भलतीच हाऊस॥

तुझे केस वारयाने उडायचे
अन् मी त्यांना हाताने अलगद सावरायचे..
मग अचानक् ओठांना एवढे
धाडस् कुठुन यायचे कुणास ठाऊक
कि ते थेट ओठांवर जाऊनच विसावयाचे....

श्रावणातील रिमझीम
धारा बरसत होत्या
आभळाचा निरोप
धरणीला देत होत्या !!!

विचार करतेय...
अपुर्ण अध्याय पुर्ण करावा
नेहमीचा गोड शेवट नसुनही..
शेवटचा शेवट आपण करावा

आता हे नेहमीचच झालय
रात्र जागवुन काढणे..
अनावरुन येणारे हुंदके
ओठांतच दाबणे


Friday, June 08, 2007

प्रेमाचा वर्षाव ..
हा असाच अखंड चालू राहीन..
भिजली नाही मने तरीही..
भावनाचा पूर ओसांडून वाहत राहीन...

प्राजक्ताचा सडा नी
पाखरांचा किलबिलणारा थवा...
तिथेच कुठेतरी तु अन् मी
नी स्तब्ध निस्तब्ध हवा!!!

प्रेमाचा पाझरं..
ह्रिदयाच्या कपारीतून..
भावनांचा भवसागर ..
फक्त तुझ्याच ओठांतून॥

तुझ्या आठवणि
अश्या एकत्र येतात...
एकिशी बोलाव तर...
दुसरया रागवुन जातात....

भीरभीरती डोळे पाहण्या तुला
कुठे हरवलास राजसा माझ्या???
परतीची वाट का न दिसशी तुला??
आतुरले डोळे पाहण्या तुला !!!

आतुरले कान ऐकण्यास तुला,
स्तब्ध डोळे पाहण्यास तुला ,
फैलावले कर कवेत घेण्यास तुला,
व्याकुळ मी॥करण्यास माझा...तुला!!!

तुझ्या नाजूक् गालावरती
पावसाचा एक थेम्ब पडला,
तुझ्या प्रेमात इतका बुडला की
वहानच विसरुन बसला

वचनांचा ऋणी...
प्रेमाचा धनी मी..
सखे पण तुझ्यासाठी..
तुझ्याच मनॊमनी मी...

तुषार प्रेमाचे..
रगं उधळती..
तुझी न माझी भेट मग..
तिथेच त्या वेशीच्या वळणावरती...

किनारयाच्या रेतीवर..
नाव तुझे कोरले..
किती आश्चर्य झाले होते..
जेव्हा तुझ्या स्पर्शाने मला न कळत हेरले॥

सुर्याचे मावळतीचे रंग..
अन तु माझ्या संग..
त्या किनारयावर चालताना..
जुळले तुझ्या माझ्य ह्रिदयाचे अंतरंग...



तुझा आवाज ,तुझा शब्द
किती मोहक आहेत...
खुप धावल्यावर कळत
अरे हे म्रुगजळ आहे।

शब्द तुझ्या मनातले
प्रेम तुझ्या ह्रुदयातले ,
ह्याहुन जास्त नाही मागत
प्रिया मी तुझ्याकडे !!!

तुझ्या पावलांनवर
पाउल टाकत चालताना
सहजच मागे वळुन पाहिल्यावर जाणवल
माझ अस्तित्व तुझ्यात एकरुप झालेल.....

तुला न बघुनही बघितल्यासराख वाटत
तुला न स्पर्शहुनही स्पर्शिल्यासारख वाटत.....
खर सागं तु आहेस तरी कोण?
एक सत्य कि एक हवहवस सुन्दर स्वप्न !!!

पहाटेच्या दवबिंदुत
प्राजक्त नाहलेला,
रात्रीच्या मिलनाने
तृप्त पहुडलेला

चान्दण बेहोश होताना
तु कधी पाहिलसं???
तु बघितल नसलं ना
तरी मी ते अनुभवलय!!!

प्रेमाचा दिवस अपुरा पडला..
तुला आपलसं करताना...
खरं सांगू एक इतिहासच घडला..
तुझ्यासाठी जमान्याशी लढताना...

तुझ्याहुन सुंदर मला
असे काहीच भासत नाही..
स्वर्गाच्या अप्सरांचा मत्सरसुदधा..
तुझ्या अस्तिवाच्या सौंदर्याला नजर लावू शकत नाही...

सतत तुझ्या आठवणीने
मना काहूर काहूर लागते..
मग क्षणोक्षणी साजने..
फक्त तुझीच उणीव भासते...

तो सागरी किनारा
अन अंगाला छेडणारा खट्याळ वारा..
मग शहारलीस तु...
जेव्हा स्पर्शल्या माझ्या सहवासाच्या ओल्या चिंब गारा....

मृग नयनेची अनोखी चाल..
संगिताला तुझ्या सुंदर असा ताल..
घायाळ केलेस तु सोडुनी प्रेमाचा तो तीर..
साजनी इतके का केले आहे तुझ्या आठवणीने मला बेहाल...

तुच माझी चांदणी रात..
अन तुच माझी मंद वात..
आतुरलेल्या माझ्या चातकाला..
तुझ्याच चिंब ओल्या सरींची साथ...

बहरलेली रात्र,
भिजलेली गात्रं ,
रातराणिचा मादक गंध,
अन् आपण असे काहिसे धुंद....





तुझं चांदण
माझिया आंगणात...
मलाचं खुणवतय..
इशारयाची अल्लड खाणाखुणानी
मला आणखी उजळवतय...

निशेच्या सोबतीला
हवी आहे चांदण्याची सैर..
तु सुंदर आहेस हे सांगताना
घेतले होते मी त्या चंद्राशी वैर

हि रात चांदण्याची..
चकवणारया काजव्यांची..
मग तुझे तेज पाहूनी आली आठवण..
माझ्या मिठीत येणारया अवखळ चांदनीची

कधी कधी भासते तुझं प्रेम..
मॄगजळाचा आभासी खेळ...
पण माझिया अस्तित्वास जागं करूनी
म्हणतेस आता एकरुप होण्याची आलीया अचुक वेळ...

आपल्या प्रेमाची अनोखी भागिदारी..
जिथे नाही नफा नाही तोटा..
तरीही किती अजब हे अश्चर्य
आपल्या प्रेमाचा आलेख किती झालाय मोठा॥

गुतंत गेले प्रेम आपुले..
अन भावनांचा गुंता वाढत गेला..
तुझ्याविना माझं काहीच नाही
हे समजवताना अश्रूंचा पूर दाटतचं गेला॥

तुझं असं वागण..
मला अस्वस्थ करतं..
मनाच्या भावनांना मग..
पापण्यांच्या काठाला पुरतं भिजवत॥

कधी कधी वाटतं
माझ्या प्रेमाचं ओझ तर होत नाही ना.. ?
माझ्यासंगे चालताना
तुझे लक्ष तुझ्यापासून दुरावत तर नाही ना।

प्रेमात सहन करणं
अवघड असतं हे खरं...
पण त्याशिवाय का
खरं प्रेम निभवता येतं बरं...

तुला हवं मिळेल..
अशी ग्वाही मी देतो..
कारण तुझ्याचं सुखाच्यां लाटांवर..
माझ्या जिवनाचे जहाज मी तरंगवतो॥


तुझ अस कापरासारख विरघळण,
मला अजिबात आवडत नाही.....
गन्ध दरवळुण गेल्यावर
मागे काहिच उरत नाही।

तु बुडताना मी
तुझ्याकडे धावलो ते
मदतीला नव्हे तर सोबतीला
नाहितर मला तरी कुठे येत पोहायला

हळुवार दूर सार त्या
माझ्या कुरळ्या बटांना ....
कारण मलाही डोळ्यांत डोळे
घालुन वाचायचय तुला....

पाऊलखुणा माझ्या
तु हळुवार कुरवाळतेस..
तुला काय सांगू
मनाला माझ्या तु अश्याच गुदगुल्या करतेस...

तुझ्या स्पर्शाची लक्ष्मणरेषा
मला जाणवलीच नाही..
प्रेम इतकं आतुर झालं होतं
त्या मिलनाच्या रातीत..
कि कुठल्याच भितीने मला क्षणभर सुद्धा हिनवलं नाही।

तुच माझ शहरं
अन तुच माझा गाव..
हरवलो आहे मी मृगनयनात तुझ्या ..
तुच माझिया मनाचे अचूक ठाव

तुझ्या कर्णपटलावरी..
ओठांनी माझ्या विसावा घेतला..
किती अजब होता तो क्षण ..
तुझ्या स्पर्शानेच माझ्या प्रेमाचा मागोवा घेतला॥

तुझा आधार
माझ्या जगण्याला..
निराधार झालेल्या
एकट्या चांदण्याला॥


ती मधूचंद्राची मैफील
फक्त माझी अन तुझीच होती..
स्पर्श माझे झाले होते सुर..
अन थरथरणारे अंग तुझे त्याला मिळालेली दाद होती...

स्पर्श तुझा होताच..
मदन माझा गहीवरला..
क्षण तो मिलनाचा पाहुनी..
मधूचंद्र ही लाजुन गेला...

शब्द माझे खेचतात तुला..
ये जवळी ये माझ्या फुला..
हळुवार कुरवाळुनी...
माझ्या कुशीत निजवतो तुला...

मिठीत येताच तु..
रात्रगंधार माझा जागा होतॊ...
कितीही आवरले त्याला तरी..
तो पहाटेलाच शांत होतो...

स्पर्श म्हणजे..
कधी न संपणारा हर्ष..
तुझ्या माझ्या प्रेमाच..
असेल हे आणखी एक रहस्य...

कधी कधी तु ही
माझ्या कुशीत येऊन लाजावं..
माझ्या या प्रेम वर्शावात..
तु चिंब ओलं होऊन भिजाव...

लाजून लाजून गेलोय भिजून..
आता आलाय शहारा अंगावर
कोण सावरणार आता ह्या घडीला..
असचं होतं जेव्हा दवं हलूच स्पर्षितो गुलछडीला...

तुल्या भेटण्याआधी
घाबरलो होतो खुप...
तुला भेटल्यावर मात्र..
डोळे दिपून गेले पाहूनी तुझे परीसमान सुंदर रुप॥

त्यांच्या मते तुझ हसणं...
फार दुर्मिळ असतं..
खुळचं ते...
त्यांना काय ठाऊक..ते फक्त
माझ्यासाठीच तर आरक्शीत असतं...

तुझ्या चेहरयावर येणारया
तुझ्या त्या नाजूक बटा मला फार सतावतात..
कारण तुझ्या डॊळ्यात पाहण्याचा..
माझा हक्कच ते हिरवतात...

तुझं एक हसू तुझं सारं सौंदर्य
तुझ्या गालाच्या खळीत एकवटतं
मला मात्र ते एका क्शणात
कापरासारखं विरघळवतं


सप्तरंग त्या इंद्रधनुचे..
नयनात तुझीया पाहीले..
अवखळ ते दिव्य तेज पाहूनी..
आनंद अश्रु नयनी माझ्या वाहीले

स्वरवेली हि नवनवेली..
तुझीया कठांतुनी जन्मली..
स्वरवेड्याने मग तुझ्यावरचं
सुरांची उधळण केली॥

नवनवलाईचा मंत्र घेवूनी
स्वर कवितेचे आले..
तुझे माझे नाते
बघ कसे गीत-कवीता जाहले...

आस्वाद प्रेमाच्या वडीचा..
गोड गुलाबी गुलछडीचा..
चला आनंदाने गाऊया..
श्रावणधारा होऊनी बरसुय़ा...

मनामनाची नाती
अन भावना त्यात वाहती..
असाच चालतो नित्यनेम..
काय हो ह्यालाच म्हणतात का प्रेम?

फुलांची आरास ..
सजवुनी ठेवलीया दारात...
अगं ये ना सजने..
ते माप ओलांडुन कायमची माझ्या घरात...

चांदण्यारात्री असेच घडायचे..
मी तुझ्या अन तु माझ्या कुशीत निजायचे..
मला तेव्हा काहीच कळत नव्हते..
पण वरती आकाशात चंद्र चांदणीचे असेच मिलन घडायचे॥

कोरया कागदावर काय लिहायचं..
या विचाराने डोकं खाजवलं..
पण लेखनीने कागदावरचं प्रेम..
शब्दाच्या आधाराने अचुक सांगितलं

तु येण्याची चाहूल लागताच..
मन वारयासवे डॊलू लागले..
शब्द हे माझे...
मग सुरेल गीत बनू लागले...

हट्ट असा तुझा..
कि मिठीत येऊन शांत बसायचे..
तुझ्या ओठांना आवर आधी...
त्यांनी सुरू केलयं सत्र मला गुपचुप खुणवायचे...


भिजावसच वाटत नाही आता

ओल्या ओल्या पावसात,

पाझरु लागत आभाळ साठवलेल डोळ्यात,

अन मग मनाचे होतात सुरु खेळ

कधी तळ्यात कधी मळ्यात

आणि मग आणखी एक खुळ लागत

तळ हातावर साठवलेल्या ईवल्याशा तळ्यात

मन गुन्तून राहत

तुझ खळखळणार हसु शोधण्यात...

आज पुन्हा वाट पहावी लागणार?


सान्जसुद्धा ढळताना हिरमुसली होणार,

आलीसच नाहिस तर रात्रसुद्धा छळणार,

रातराणीचा गन्ध सुद्धा दुर दुर पळणार,

कसा हा कळवळा "तिला" कळणार?

आज पुन्हा वाट पहावी लागणार?
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ !!
हे प्रेमाचं असच असत..
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं

तुझ्या माझ्या प्रेमाची
हि अखंड कथा अशीच चालु राहील...
थांबली लेखनी जरी..
तरी कथानके तशीच जिवंत राहील...

माझ्या मनात काय आहे,
ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !

प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं

किती वाट पहायची ,
तुझ्या होकाराची ?
संपत आलीये आता
लेखनी माझ्या जिवनाची

कितीदा ठरवलय ,
प्रेमावर काही लिहायच नाही,
पण मी तरी काय करणार..
त्या लेखनीला कागदावरच प्रेम व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही...

आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !

चांदण्याची सवय ,
खुपच असते भारी..
चांदरातीच्या मिलनाला..
उगाचच त्यांची लुडबुडती हजेरी....

मिलनाच्या रातीला..
सहवास तुझा साथीला..
मग काय हवय अजून,
या मधुचंद्राच्या रातीला...

मधूचंद्राचे किस्से
सहसा कोणाला सांगत नाही..
पण त्या क्षणासारखे
अजब मिलन मला कुठेच दिसले नाही

ह्रुदयातुन एक स्पन्दन आले,
चेहरया वरचे भाव बदलले..
ह्रुदयातील त्या स्पन्दनाला,
प्रेम हे नाव मिळाले....

तुझ्यावर लिहणं म्हणजे
आकाशातील तारयाना मोजण..
किती अवघढ असतं हे खर प्रेम
शक्य नसतं ते सहजासहजी मिळंण....

कोणाला सांगाव्यात
प्रेमाच्या व्यथा!
सगळ्यांच्याच नावावर,
व्यथांची गाथा।

तीच्या होकारासाठी
करावी लागली तारेवरची कसरत...
खरं सांगायच तर ..
प्रेमात असते हिच खरी गंम्मत....

प्रेम कराव आभाळासारख
धरणिला समांतर असणार
सुखदु:खाच अंतर लांघुन
क्षितिजावर मिलन करणार

तुझ्या डोळ्यातले भाव..
मला चांगलच ओळखता...
मग शब्दावाचून बोलण्याचे..
नवीनच खुळ घालतात...

आठवत का तुला...
आपण दोघेच होतॊ रानात..
तु माझी अन मी तुझी
सावली झालो होतो त्या रख्ररखत्या उन्हात...

तु हसलीस की ..
मला हे जग माझं वाटत..
मग मलाही जगताना...
कस ताजं वाटतं...

अन्तरबाह्य तुच आहेस
हेच सत्य जाण
लोका असतील पन्चप्राण
पण तु माझा सहावा प्राण !

अनंत असे शब्द माझे..
सोबतीला सुर तुझे..
राग प्रेमाचा छेडूया..
सजने आजतरी मैफिलीत ..
तु माझी अन मी तुझा होऊया....

स्पर्श तुझा होतॊ..
अन चेतनांचा कारंजा उडतो..
नेहमी तु जवळी येता..
मग उगाच काळजाचा ठोका तुझ्याकडेच वळतो...

लुकलुकत होते आकाशी तारे
अन नकळत घडले होते सारे..
त्या प्रेमाच्या निशा-मिलनात..
हे अजब होते सारे न घडणारे

टिमटिमणारया दिव्यामधे..
तुझं दिसलं मला सुदंर रुप..
लक्ष तुझ्याकडे वळालं म्हणून..
दिव्याने ही घेतलं तेजस्वाचं हूरूप...


प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

डोळ्यात तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग;
तीच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

तीच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्रान्समोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सार राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन जाणार्,
तीचा साधा meesage सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक senti mesage पहिला तीलाच forward होणर,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

असा एक किनारा असावा
माणसा मणसात जिथे वाद नसावा
नसावी तिथे कसलीच भिती
वावरुदे तिथे सदा प्रिती

असा हि एक किनारा असावा
जीथे वारा उनाड असावा
पाना झाडातुन वारा शिळ घालत सुटावा
श्वासात ही माणसाच्या बेधभाव नसाव

काहि किनारे असे हि असतात
जे फक्त स्वप्नात दिसतात
ज्यान्च्या वर्णनासाठी शब्द कमी पडतात
असे किनारे स्वप्नातच का बरे दिसतात ??


गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं


आठवण येते कधी मला...
अन गालावर खुद्कन खळी पाडते...
तर कधी हसता-हसता....
डोळी माझ्या पाणी आणते.....
गर्दीत राहुन सुद्धा ती....
एकांताच आभास देते.....
अन एकांतात गेलो तरी मला....
नाही कधी एकटे सोडते....
डोळे बंद केल्यावरचे.....
नवे विश्व दाखवुन देते....
अन उघड्या डोळ्यांनाही .....
ती कधी धुंद करुन टाकते.....
दूर लोटायचा प्रयत्न केला....
तर अधिकच जवळ येवुन बसते....
जवळ तिला बोलवले तर मात्र....
कोपरयात कुठे दडुन बसते.....
हिच आहे माझी खरी मैत्रिण....
नेहमी साथ देणारी.....
आगंतुक असली तरी.....
हवी-हवीशी वाटणारी....

मलाही वाटतं कधि कधि,
आपणही प्रेम करावं.......
कोणाच्या तरी गोड हसण्यावर,
मी सुद्धा वेडं व्हावं...

नदी काठी एका सुंदर संध्याकाळी,
आम्ही दोघेच असावं....
पहिल्या पावसात मातीचा गंध घेत,
अम्ही दोघांनीच फिरावं.......


माझं तुझ्यावर प्रेम आहे
अस एकमेकाला सारखच का सांगाव?
दोघांच्याही मनात हे सत्य,
खोलवर कोरलेलं असावं


प्रेम हे कधीही बंधन वाटू नये,
कितीही वर्षं लोटली तरी
त्यातली मजाच संपू नये...

तिनेच प्रत्येक वेळी
का म्हणून स्वतःला बदलाव?
तिच्यासाठी कधि कधि
मी ही आपलं म्हणणं सोडावं....

पण काय करु?
माझं मन जाणणारी मला कोणी भेटतच नाही!
की तुम्हीच सांगा, प्रेम म्हणजे नक्की काय
हे मला कळतचं नही?

Wednesday, June 06, 2007


















Monday, June 04, 2007

सारे सोबत असताना ही
कधीतरी एकटे असावे असे वाटते...
त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते
आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं
धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
आले आले मी आले करत सर धावतं येते
तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते
त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत
स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत
अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं
तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं
पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...
पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं
थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं
गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...