आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, July 20, 2007

कसा ओळखू कसा कुणाला?
"मीच" मला गवसला नाही...
स्वभाव जोखत बसलो आणि
भाव मनीचा दिसला नाही....

जळुनिया पुनवेत गेलो
चांदण्यांचा रोष होता;
तुझी चुक नाही माझ्या
भावनांचा दोष होता...

चांदण्यान्नी घात केला
ती पौर्णिमेची रात होती;
मार्ग माझा दाखवाया
काजव्यांची साथ होती...

आयुष्याने धडे दिल्यावर
कविता दूर राहू लागल्या
त्यांच्या कवीचं परकं होणं
मुकयामुकयाने पाहु लागल्या...


ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा

मी शोधतोय तुला अजुन ...
पाण्या च्या तरंगावर,
वार्‍या च्या झुलुकेवर,
फुलांच्या पाकळीवर,
मी शोधतोय तुला अजुन ...

माती च्या गंधात,
वेलींच्या बंधात,
सोनेरी उन्हात,
गवताच्या पानावर,
द वा च्या थेंबात ...

पाण्याच्या काठी,
म उ म उ वाळूत,
मावलत्या सूर्याच्या
बूडणा र्‍या बिंबात,
मी शोधतोय तुला अजुन ...

डोळ्यातल्या पाण्यात,
मीट लेल्या ओ ठ् त,
नाव तुझे घेताच,
जागीच थी जून,
मी शोधतोय तुला अजुन ...

कधी भेटशील ना मला?

आज खळखळ त्या पाण्याला तहान होती,
त्या आभाळाकडे ती जमीन गहा्ण होती,
कोण व्यक्त, कोण अव्यक्त,
पानांची सळसळ वणव्यापसून अजाण होती

सरींना 'पावित्र्य' टिकवण्याची लगबग होती,
नवीच पायवाट हरवण्यापासून घाबरत होती,
कोण ओथंबले, कोण तृष्णावले,
अवर्णनीय सुंदरता ती निसर्गाकडे आश्रित होती

आनंदल्या पावसाला अंगणाचीच मनाई होती,
काळ्या काळोखात ओली जाणीव सदृश्य होती,
म्हणे पाऊस, नको जाऊस,
आजच्या जाण्यास उद्याची साशंकता थांबवित होती

वाटचाल क्षणांची ती एका क्षणात बंदिस्त होती,
अंकुरलेली तृणाई वेंधळ्या नभाच्या स्वप्नांत होती,
कोण थांबले, कोण चालले,
दोघांच्या भेटीला गेल्या जन्मांची पुण्याई होती.........

आठवतो तो समुद्र किनारा

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
तू मला भेटायला यायचीस
लाटां सारखं परतून परतून
तू मला मिठीत घ्यायचीस

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
हसता हसता आपण भांडायचो
आकाशाला धरतीवर ओढून
डोळ्यातलं नक्षत्र सांडायचो

आठवतो तो समुद्र किनारा
जिथे वाळूत बोटे रूतलेली
छोट्याश्या आपल्या घराची
स्वप्नांची पहिली वीट घातलेली

आठवतो तो समुद्र किनारा जिथे
वचनांची बरसात असायची
साक्ष म्हणून, दूर कुठेतरी
एक क्षितिजरेष दिसायची

मला सारं सारं आठवतं
आठवतं नाही ते तुला काही
आपण बांधलेल्या वाळूच्या घराची
वीट मात्र ढासळली नाही

Thursday, July 19, 2007

ग्रामीण म्हणी

१) ठसन पाट्लाची नोवायनी काच कोराची .

२)पैसा कसा काळू जीवाले येते लाळू.

३)आपलं नाही दात को-याले, लोकाचं जावं भरीत क-याले.

४) फ़ुकट फ़ाकट ,तेई चोखट .

५)कई होईन मनचं, कई मोळीन कणसं.

६)घरात खावाव झरत,बाहीर निघावं लळत.

७)चुलत भावाचा उलत भाऊ, चाल कुत्र्या खीर खाऊ.

८) सासूच्या जिनगीवर जवाई उधार,पैशाले पान साळे तिन हजार.

९)पावने आले घर वलं, दार वलं,जेवण करतो म्हशीन दूध नाही देलं, चोई शिवतो तं शिप्याचं काट्टं मेलं.

१०) फ़ुकटाचं खायं त्याले सस्त महाग काय?

११) कधी नाहि मीळला, नी गटकन गीळला

१२) आयत्यावर कोयता

१३) सर्व आहे घरी, नेत नाही बरी

१४) चोराले म्हणते चोरी कर, सावाले म्हणते हुशार राय

चला पावसात, चला पावसात

आज थोडे हरवूया
घर तर नेहमीचेच
जरा , आज रस्ता विसरु या..

चला पावसात , चला पावसात
आज थोडे खेळूया
मोठेपण तर नेहमीचेच
जरा , आज लहान होऊ या..

चला पावसात , चला पावसात
आज थोडे रडूया
सुखाचे नाटक तर नेहमीचेच
जरा , आज चेह-याचा रंग उतरवू या..

चला पावसात , चला पावसात
आज थोडे हसूया
मुखवटे तर नेहमीचेच
जरा , आज स्वत:ला भेटू या..

चला पावसात , चला पावसात
आज थोडे नाचूया
सरळ चालणे तर नेहमीचेच
जरा , आज बेधुंद डोलू या..

चला पावसात , चला पावसात
आज थोडे भिजूया
खारट पाणी तर नेहमीचेच
जरा , आज मदिरा नभीची चाखू या..

चला पावसात , चला पावसात , चला..


- स्वप्ना
आधुनिक युगाच्या या यंत्राविषयी,
पेपरात सर्वप्रथम जेव्हा वाचले,
त्या बद्दलचे चर्चासत्र,
जिकडे-तिकडे सुरु झाले.

सुरुवातीला लोकांचा,
विश्वासच बसत नव्हता,
बिन वायरीच्या फोनचा,
त्यांनी कधि विचारच केला नव्हता.

हळु हळु जेव्हा,
त्याचा वापर सुरु झाला,
माणसाच्या जीवनाचा एक,
अविभाज्य घटकच बनला.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,
कामगारांपासून ते मालकांपर्यंत,
रिक्षाचालक ते पायलटपर्यंत,
चोरांपासून ते पोलीसांपर्यंत,
सर्वत्र त्याचा वापर.

कॉलेजात त्याचा,
अतिरीक्त वापर होतो,
लेक्चर चालू असताना,
नेमका तो आवाज करतो.

ऑफ़िसात सुद्धा त्याची,
एक वेगळिच शान,
भारीतला मोबाईल ज्याच्याकडे,
त्याचा खूप मोठा मान.

मंत्र्यांकडे तर आमच्या,
एक सोडून दोन-दोन,
अन त्यांचे बिल भरायला,
सरकारला घ्यावे लागते लोन.

सेलिब्रिटिज चा नंबर तर,
सर्वसामान्यांना माहित नसतो,
पण त्यातहि कोणी अद्न्यात इसम,
त्यांना नको ते मेसेज करत असतो.

जितका त्याचा फ़ायदा,
तितकाच दुरुपयोग सुद्धा होतो,
कोणासाठि जीवलग तर,
कोणासाठि शत्रू बनतो.

नव-नव्या Ringtones अन,
फोटो काढण्यात चढाओढ,
videos आणि sms मुळे,
खूप जणांचा हिरमोड.

मिस कॉल देण्या-घेण्यावर,
कोणाचे Count नसते,
अन forwarded smsला,
सर्वप्रथम पसंती असते.

पब्लिक पोल साठि,
smsचा आधार असतो,
अन त्याच्याच द्वारे तर आमचा,
Indian idle निवडला जातो.

मोबाईल मार्केटिंग मध्ये,
नेहमीच स्पर्धा असते,
नवीन technology घेऊन रोज,
वेगळेच model येत असते.

तर असा होतो आहे मोबाईलचा,
प्रत्येकाच्या जीवनावर असर,
घट्ट पकड घेतली त्याने,
हर एक च्या मेंदूवर.

मला एकच वाटते,

मोबाईलचा माणसाने,
दुरुपयोग टाळावा,
अन नव-नवीन तंत्रद्यानाचा,
सदुपयोग करावा.....

----निलेश लोटणकर
तो
औंदा लगीन करायच न्हाय ...


कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात...
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय...
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
....................................औंदा लगीन करायच न्हाय.

कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता...
रोज रोजची कटकट न वटवट, आयला...
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय...
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय...
...........................म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.

म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली...
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय...
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय...
..........................म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.

बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच 'लचांड' मग मागचकी लगतय...
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय...
..............आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.


झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव....
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
.....................इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?

नाय, तसं न्हाय...तिचं नखरं सोशीन म्हणतो....
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो....
गावच्या पोरिमधी.... नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
....जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय.....

ती

आत्याचा बाळ्या न्हाई न्हाई म्हणत व्हता..
मी म्हणते आत्ता तयार ह्यो झालाच कसा?
मला काही केल्या काहीच सुचत न्हाई आता...
ह्याला आठवलीच कुठून न्हाई ती आवदसा....
.......त्याचं मारू द्या, पण मला औ दा लगीन करायचं हाय.

आकलेचा कांदा आन् डोक्यात बटाटं हाय...
तोंडाचं टकसाळ कधी बंदच व्हत न्हाय...
सालेत हा जायचा आवसेला न पूनवेला
गुर्जिन बी ह्याला राम राम केलेला हाय...
............त्याचं सोडा, पण मला औदा लगीन करायचं हाय.

काम ना धंदा आन् बोम्बालत गावभर फिरतो...
मायचं न बाचं रोजच जोडं, ह्यो पोटभर खातो..
एवढ्यावर बी त्याचं भागत न्हाय की काय ?
पोरींच्या श्या बी खाण्यात हा पटाईत हाय...
.......पण करावं काय? मला तर औदा लगीन करायचच हाय.

चार भनींकड बघून, मायचं डोळ आटतच न्हाय..
आन् बाचं काही केल्या कराज पण मिटत न्हाय...
आत्याशिवाय घराचं आमच्या पान बी हालत न्हाय
ह्याच्या शिवाय मला आता दुसरा पर्यायच न्हाय...
..............................म्हणून औदा लगीन करायचं हाय....

रेणुका@ एक झोका....चुके काळजाचा ठोका...

एक नवीन ओळख...
आयुष्य उजळवणाऱ्या त्या प्रकाशाला ओळखा
तमोवृत्ती सोडून कर्तृत्वाच्या दिवसाला ओळखा

नटश्रेष्ठांच्या क्षणिक पराक्रमावर काय जाता
त्या पडद्यामागच्या खऱ्या माणसाला ओळखा

स्वप्नं पाहायला कोण नाही म्हणतंय
पण झेपेची उंची दाखवणाऱ्या आकाशाला ओळखा

या बहुरुपी दुनियेत अनेक मुखवटे भेटतील
खरं रुप असलेल्या डोळ्यांच्या आरशाला ओळखा

आपण हरतोय म्हणून इतरांवर काय जळता
शुन्यातून जिंकवणाऱ्या प्रयत्नांच्या पावसाला ओळखा

शर्यतीला जिवघेणी हेच विशेषण का लावता
आधी प्रतिस्पर्ध्यात लपलेल्या माणसाला ओळखा

-- अभिजीत गलगलिकर
तु मला आजवर खुप काही दिलंस
झोपेत होतो मी आजवर तु मला जाग केलस
तु मला ऊंच आकाशात स्वछ्चंद उडायला शिकवलस
चंद्र ता-यांची सहल घडवत तु मला स्वर्गाच रुप दाखवलस
सोनेरी स्वप्न दाखऊन तु प्रेम करायला शिकवलस

तु मला आजवर खुप काही दिलंस
तुच तर स्वप्नांचे आभाळ दिलंस
सप्तरंगी आसमंतात मला सोबत घेउन
तु एक नवं जग दाखवलस
पण नंतर तुच पंख छाटुन माझे
मला जमीनीवर आणलस

तु मला आजवर खुप काही दिलंस
बंधने सगळी तोडुन तु मला जगायला शिकवलस
ज्या हत्यारने छाट्लीस बंधने तेच
हत्यार तु माझ्या काळजावरही चालवलस
ज्या पानांवर लिहिणार होतो
मी प्रेमकहाणी तु त्यांनाही पेटवलस

तु मला आजवर खुप काही दिलंस
तुच तर रडायला शिकवलस
कोरडे होते जे डोळे माझे
आसवांनी त्यांना तु भिजवलस
माझ्या निस्तेज मनाला तु नव तेज दिलस
ऊदास मनाच्या पोकळीला तु वेदनांनी भरलस


तु मला आजवर खुप काही दिलंस
तुच तर मला एकट्याने जगायला शिकवलस
जी बंधने तोडलीस त्याच बंधनात
तु मला पुन्हा अडकवलस
मुका होतो जणु आजवर मी
तु मला या शब्दातुन बोलकं केलस

मरता मरता जगत होतो तु
जगता जगता मरायला शिकवलस
झोपेत होतो मी आजवर
तु मला "खरंच" जाग केलस

तु मला आजवर खुप काही दिलंस........

तु मला आजवर खुप काही दिलंस........

सचिन काकडे

Wednesday, July 18, 2007

खूप दूरवर जाणारा रस्ता
कां वाटतो आपलासा
कायम वाट बघणारा
केविलवाणा बराचसा

सोबत त्याच्या एकदा मला
तुझ्या साथीनं जायचंय
खरंच कुठे जातो ते
शोधून काढायचंय

विरक्त साधूसारखा
असतो तो अलिप्त
साथ मात्र देतो तो
समजून सकला आप्त

येशील तू माझ्यासोबत...
जगाच्या अंतापर्यंत...
रस्ता फक्त निमित्त रे....
खरं तर साथ तुझी हवीये
जीवनाच्या अस्तापर्यंत

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…॥भिजून घ्या

सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या वेळी आसपास कोणीही नसावे असे वाटते
आजुबाजुचे रान सारं गप्प गप्प झालेलं असतं
धुक्यानेही रानसारे गच्च गच्च झालेलं असतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

आले आले मी आले करत सर धावतं येते
तुझ्या आठवणींचे पिंपळपान मग मनात दाटुन येते
त्या आठवणींच्या जोरावर पुन्हा उंच उडावंस वाटंत
स्पर्श करुन तारयांना खाली खेचुन आणावंस वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

त्या तिथे आज कुणीही येऊ नये असं वाटंत
अचानक कुठुन तरी आभाळ वर दाटतं
तलावाच्या काठी मग माझं मन भिजु लागतं
पाण्याच्या पार्श्वभुमीवर आपलं इंद्रधनुष्य शोधु लागतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते...

पाऊस थांबल्यानंतर निसर्गाची रुपे निरखु लागतं
थव्यांसोबत पक्षांच्या मन मात्र उडु लागतं
गवताच्या पात्यांवर पडलेल्या थेंबाप्रमाणे दुःख सारं मग ओसरु लागतं
कुठल्यातरी झाडाखाली डोळे मिटुन बसावसं वाटतं
आणि मग...
सारे सोबत असतानाही कधीतरी एकटे असावे असे वाटते....

एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं

निर्णय

निर्णय घेता न येणे यासारखा दुसरा दोष नाही.
अजिबात निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय हे अधिक बरे !
चुकीचा निर्णय घेणार्‍या माणसांनीसुध्दा जीवनात यश मिळवले आहे.
परंतु जे निर्णय घेऊ शकत नाहीत , ज्यांचे मन नेहमी ' हे की ते ' ( Double mind ) या गोंधळात गुरफटलेले असते असा मनुष्य मात्र कधीच यशस्वी झाल्याचे ऐकीवात नाही।ज्याला निर्णय घेता येऊ शकत नाही , त्याला कृती करता येत नाही. त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही

नकारात्मक विचार मनात आले की लक्षात ठेवा,
गणितातली बेरजेची खूण ही वजा बाकीच्या दोन खूणांनी मिळून बनलेली असते
घड्याळ बंद जरी असले तरी दोनदा वेळ बरोबर सांगते.......
कोण म्हणते ती निघून गेली?
बस थोड्या वेळाचा एकांत आहे...
दुराव्याची थोडीशी खंत आहे
पण मला माहीत आहे...
या आभासाचाही लवकरच अंत आहे!!!

याचे विडंबन

कोण म्हणते ती निघून गेली?
अरे तो तर एक नुसता आभास आहे...
मी लाख जा म्हणतो, मी लाख जा म्हणतो
पण ती जात नाही हाच तर त्रास आहे...


काही नविन ग्राफ़िटी...........

* गरज ही शोधांची जननी आहे तर आळस ही सावत्र आई..

* झाडावर प्रेम करा. झाडाखाली नको..

* संवादान जग जिंकताही येत आणि सर्वस्व गमावताही...

* कोणतीही गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलण सोपं असत. जबाबदारीच्या बाबतीत मी तेच करतो.

* नवरा नावाच बंदर असतं बायको नावाच्या डोंबा-यासाठी...

* संवाद हे अतिशय प्रभावी माध्यम आहे पण मौन त्याहूनही प्रभावी..

* तुम्ही दारु पिता का? हा प्रश्न आहे की आमंत्रण...

* लिंबाचा वापर दोन गोष्टींसाठी. उतरुन टाकायला आणि उतरवायला...

* दुस-यांचे फ़क्त दुर्गुण दिसण हा ही एक दुर्गुणच..

* तुमच्या ऑफ़िसमध्ये जोर कमी आणि बैठका जास्त अस होतय का?

* अजिबात झोप लागत नाहीये. अशी स्वप्न पडतात हल्ली..

* गार पाण्याचे पहिले दोन तांबे घेववत नाही. एकदम तिसराच घेतला तर..

* मला इतरांना मदत करायची आवड आहे पण सवडच मिळत नाही...

* आपण किती शुद्ध आहोत याचा अंदाज येईल...
हिमालयात जा किंवा सरकारी कार्यालयात....

* माणसाला रोजचे सुख नको असते॥ रोज नविन सुख हवे असते...

* दारु पिऊन गाडी चालवायला बंदी आहे ना?
मग बार बाहेर पार्किंग ची सोय कशाला?

* चूक नेहमी अचूकपणे करावी..

* जंतूनाशक इंजेक्शन नेहमी निर्जंतूक करुन का घ्यावे लागते...

* मोहाचा सामना करण्याचा एकच मार्ग.. त्याच्या मोहात पडण...

* फ़ॅशन म्हणजे असा कंटाळवाणा प्रकार . जो दर सहा महिन्यांनी बदलावा लागतो..

* काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं चांगल..

* स्वतःपेक्षा दुस-याच्या सुखावरुन प्रत्येकजण आपल दुःख ठरवतो..

* आयुष्य हे नदी सारखच आहे.. वहाण थांबल की डबकचं...

* पॉझीटीव्ह विचार केल्याने खरचं उपयोग होतो....

* दुचाकीची मळलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण...

*एक किलो सोन्याचे बक्षीस लागेल त्याची, चांदीच ना!!

*आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आरोप करणार्‍यांना "खपवले" जाईल.

*आयुष्यात चार माणसे तरी जोडावित.....शेवटी उपयोगी पडतात.

*मांजर आणि नवरा कुठेही नेयुन सोडला, तरी संध्याकाळी घरीच परत येतो.....

Tuesday, July 17, 2007

स्वप्न म्हणजे काय.?हे कुणालही व्यवस्थित सांगता येइल कय..?
मला तरी ते अतॄप्त मनाच्या इच्छा पुरविणारया कल्पवॄक्षासारखी वाटतात ....!

द्वेष हा धुधारी शस्त्रासरखा असतो ! तो करणार्‍याला आणि ज्याचा केला जातो ,त्या दोघांनाही सारखाच
मारक ठरतो...!

माणसान राजहंससारख असाव। जे पटेल ते घ्याव नाही ते सोडुन दयाव।

काळ म्हणजे तरी काय आहे..? ऐक सारथीच नाही काय..?
मानवरुपी घोड्याच्या पाठीवर आपल्या संकेताचे आसुड मारीत
केव्हा केव्हा किती तो गतीने पिटाळतो हे घोडॆ.....!!!!

कोणी म्हणत आठवणी म्हणजे मोरपिसा सारख्या असतात...तर कोणी म्हणत त्या बकुळीसारखा आपला सुगंध मागे दरवळत ठेवणा-या असतात।पण, मला मात्र ते कधीच पटत नाही.आठवणी या नेहमी हत्त्तीच्या पायासारख्या असतात ! त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भुमीत मागे ठेवुनच जातात.....

माणसाचे प्रेम हे धरतीसारखे असते,अगोदर ऐक दाणा पेरावा लागतो
तेव्हाच धरती अनेक दाण्यानी टिच्चुन भरलेली कणीस देते....
माणुसही तसाच असतो, प्रेमाचा शब्द मिळाला तर
त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार असतो....

Monday, July 16, 2007

नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
त्याच्या या खेळापुढे मनातले निर्मळ प्रेमही हतबल होते
डोळ्यातले सदा बोलके भावही तेव्हा
मग होतात जसे नकळते
मनातले शब्दांचे बोलकं वादळ मग ओठांशी
य़ेउन अचानक शांत होते

य़ा नशीबाच्या खेळात मनात
एक वेदनेची लखलखती वीज चमकते
ती वेदना मग दुख:रुपी पावसासोबत रात्रभर बरसते
त्या पावसात मनाच्या इच्छांना ती चिंब भिजवते

एक क्षणिक दुख: ते आयुष्यभर साथ देते
कधी न मिटणा-या दुराव्याने ते
काळजा शेजारीच आपला संसार थाटते

आयुष्यात जशी कधी न सरणारी अंधारी रात्रच उरते
ती रात्र सोबत गर्द काळोख घेउन येते
अंधाराला तिथे निराशाही बिलगते
त्या एकट्या जिवाच्या सोबतिला फ़क्त न सुटलेली गणिते
एका तुटक्या मनाला याशीवाय
दुसरं कुठे काय मिळते

सचिन काकडे

सायकळच्या चाकात
ओढणी अडकून राहिली
तिच्या चेहर्यावरची
काळजी मीही पाहिली

म्हणाली नाही ती की
मदत हवी म्हणून
मीच गेलो विचारायला
मदत हवी का म्हणून?

खूपच घट्ट अडकून बसली होती
ती त्या चाकात
माझ्याकडे पाहून
हसत होती गालात

ओठ च नव्हते बोलत नुसते
डोळेही सांगत होते
ओढनिचे शरीरही
माझ्या स्पर्शाने थरथरत होते

हळूवार हातांनी तिला
बाहेर त्यातून काढले
तिनेही हसत हसत
माझे आभार मानले

परत जेव्हा ती तिच्या
खांद्यावर ओढली गेली
माझ्या स्पर्शाचा अनुभव तीही
तिला देत गेली

अचानक या प्रसंगातून
बाहेर मी पडलो
सोडून तिला जाताना
मनातल्या मनात राडलो

नाव विचारायचे
तर राहूनच गेले
मनातले विचार ओळखून
तिनेच ते सांगितले

याच तर प्रसंगातून
प्रेम आमचे बहरले
आंब्याचे झाडही
पावसाळ्यात मोहरले

अजूनही तिची ओढणी
स्पर्श माझा मागत असते
वेळेचे भान ठेवून
तीही तिची साथ सोडत असते

--- शिरीष
परीसहल

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
आकाशात जाऊन आपण सारे तारे तोडू,
ओंजळीत भरून तारे खूप खूप खेळू


परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
मऊ मऊ ढगांच्या गादीवर झोपू
चांदोबाकडे जाऊन त्याला गोड गोड साखरेचा पापा आपण देऊ

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
खूप खूप खेळून आपण हाश हूश दमू
चॉकलेट आणि आइस्क्रीमच्या बागेकडे मोर्चा आपण नेऊ

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
दोन दोन हातांनी मनसोक्त आइस्कीम चॉकलेट खाऊ
पोटोबा भरल्यावर वाऱ्या दादासोबत,
फुलांच्या रंगीत जगात आपण एक फेरफटका मारू

परीराणी परीराणी लवकर ये
मला सुद्धा तुझ्यासंगे आकाशात ने
खूप खूप तुझ्यासंगे गंमाडी जंम्मत करायची आहे मला
म्हणूनच लवकर लवकर ये स्वप्नात सांगते मी तुला.............

विडंबन
-- योगेश रानडे
ग्लासभर दारु खिडकीतभं राहून ढोसुन पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारा बियरचा फेस चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, गुत्त्यावर ये
तो भरलेला असेलच, टेबलावर हात ठेवुन बसुन रहा
खुर्ची सरकेल बुडाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग पिऊ लाग, दारुचे अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा संपेपर्यत, तो संपणार नाहिच, शेवटी घरी ये
चड्डी बदलू नकोस, ग्लास पुसू नकोस, पुन्हा त्याच
खिडकीत ये
आता बेवड्यांची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली बाटली घे, ओपनर तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या झिंगण्याचं कारण, तू म्हणं ज्युस संपलंय
मग चिअर्स कर, तूही घे
तो उठून हिमेश रेशमिया लावेल, तो तू बंद कर
किशोरचं शराबी लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला बिल देईल, म्हणेल तू मला देणं लागतोस
पण तुही तसचं म्हणं
मोबाईलचा थरथराट होईल, तो घराकडे रवाना होईल
तो त्या गटारात पडेल, त्याच्या माखलेल्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी रस्त्ता पहायला विसरू नकोस
यानंतर दारुड्यांचा आवाज नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली बाटली घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या गटारीला एक क्षणतरी, बघ माझी आठवण येते का?