आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, October 12, 2007

तुझा विचार करताना
मी कधी घड्याळ बघत नाही,
कारण काटे फीरताना दिसतात...
पण वेळेच भानच उरत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी मुकि रडत नाही,
कारण आसवांतही तुच दिसतोस...
अन मग डोळ्यात आसुच उरत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी हलके लाजत नाही,
कारण गालावर लाली चढते...
अन मग माझच सुख मला सोसत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी तुझी वाट बघत नाही,
कारण सगळीकडे तुच असतोस...
क्षितिजापर्यंत जाणारा दुसरा रस्ताच दिसत नाही......

तुझा विचार करताना
मी कधी हरत नाही,
कारन तुझा विचार केल्यावर...
मी माझिच मुळी उरत नाही

कवी: ...........
पिकलेलं पान बघुन, हिरव पान रडलं
लोकांना वाटलं, त्यावर दव साठलं

पिकलेलं पान म्हणालं, मी पण होतो
कधी काळी हिरवा, उन पिउन झालो पिवळा

पावसात भिजलो, वाऱ्याबरोबर नाचलो
आयुष्य जगुन, आता थोडा थकलो

वाळुन आता गळणार, आईच्य कुशीत विसावणार
हिरवी पालवी बनुन, पुनर्जन्म घेणार

-- हेमंत मुळे
काही असे घडावे
नजरेस तू पडावे

स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?

वैरीहि तो असा की
मन ज्यावरी जडावे

मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?

मी कोण,काय होतो
की मज कुणी रडावे?

--जयन्ता
मनं माझ तुझसाठी वेडं का......?

आज बरसत्या पावसासवे

हे भंयकर वादळ का ......?

आयुष्यभर तुझ्यासवे जगण्याचस्वप्न

आज असे तुटल का......?

तुझ्या प्रेमला मुकलोय तरी

तु माझीच आहेहा व्यर्थ भास का ......?

पानावरच्या दवासारखी तुझी साथ

जिवनात माझ्या क्षणभंगुर का......?

तु दिलेल्या वेदना मनाच्या प्रत्येक कोप-यात्त पसरल्यावरही

अजुनही हे मन तुझ्यासाठी वेड का......?

तु विसरलीस मला हे माहीत असुनही

माझ हे मन तुझ्या आठवणीत बैचैन का......?

भंगलेल्या स्वप्नालाच पुर्ण करायचयं

हे वेड स्वप्न उराशी बाळगुन का......?

तुझ्या मनापर्यंत पोहोचल्यावरही

माझ्या मनाचा कागद कोरा का......?

जिला माझ्या भावनाच कळल्या ना कधी

तिलाच प्रत्येक शब्दातुन मांडतो का......?

सगळे संपले असतानाही

तु माझीच होशिल हा व्यर्थ भास का......?

नेहमी स्वत:ला तुझ्या डोळ्यात शोधन्याच्या प्रयत्न करणा-या

माझ्या या डोळ्यात आज आसवांची माळ का......?

आयुष्यभर जीवनाच कोडं सोडवणा-याला

आपल्या जिवा ऎवजी त्या कोड्याचच महत्व का......?

तु परत येणार नाही ही जाणिव असतानाही

हा जीव जायचा थांबला का......?

सरणावर झोपल्यावरही मनात मझ्या

तुझ्या सवे जगायची इच्छा का......?

मनं माझ तुझसाठी वेडं का......?

-- सचिन काकडे

Thursday, October 11, 2007

आयुष्य माझे एकटे
एकट्या पाउल वाटेने सरणे
एकट्याचे जिणे कठ्ने
एकटयनेच शेवटी मरणे


रस्त्यात मिळाले साथीदार सारे
फिरले साथितुन जसे फिरतात वारे
एकटे पणा जिवाला सुटत नाही
नाती बनलिच नाहीत म्हणून तुटत नाहीत


रस्त्यात कधी तरी कोणी ओ देईल
भरकतलेल्या जिवाला वाट दाखविल
आंधला कंदील घेऊन फिरतोय
डोळसनांना उजेड दाखवायला

-- विजय कुड़ाळ

Wednesday, October 10, 2007

एक दिवस असा होता की

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

कवी: ..........

हवं ते मिळालं की ,
बाळ खुश होऊन जातं . .
बाळ गोड गोड हसून
आपल्याला ही खुलवतं ....

हवं ते मिळालं तरी ,
आपण नाखुशच असतो ...
पळत्याच्या पाठीमागे
सारखे धावत असतो....

आनंदाचा क्षण काही
टिकवून ठेवता येत नाही . .
दैवाला दूषण देवून
हव्यास सोडता येत नाही ....

हृदयात डोकावून पाहिले
तर कारुण्य खूप दिसते...
पण तेवढीच जागा ही
आनंदाने व्यापलेली असते....

जावू नये दु:खाने पोळून
की सुखाने खूप हूरळून ...
शांत शांत वाटेल बघा,
दोघांचा समतोल ठेवून ....


कवी: ..........

माध्यमाशिवाय दिसत नाही,
जरी प्रकाशाला असे प्रचंड वेग ...
माध्यमाशिवाय ऐकू येत नाही,
जरी ध्वनीला असतो त्याचा वेग...

प्रेम उचंबळून येत नाही,
जर प्रेमात नसला आवेग ...
भजन रंगून जात नाही ,
ह्रुदयात नसला जर आवेग ...

वक्त्याला हवेत समोर श्रोते ,
श्रोत्याना समोर वक्ता हवा ...
शिकणारे हवेत विद्यार्थी ,
विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हवा ...

सदैव मित्र असतो मित्रासाठी,
क्षण आनंदे जगण्याचे माध्यम ...
जीवात्मा परमात्मा मिलनासाठी,
प्रेमपूर्ण भक्ती हेच माध्यम .....

कवी: अरविंद चौधरी

नयनास नयन मिळता मन गहिवरलेले,
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले..../०/

दोन थेंब अनावर आवेगाचे डोळ्यांत दाटले,
पापण्यांतुनि गळताच मोती होऊन पडले...
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले..../१/

लोचनांत परस्परांच्या प्रेमबिंदु साठलेले ,
नजरभेट होताच झर झर पाझरू लागले...
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले..../२/

वाटे बरसत रहावेत असेच अमुचे डोळे ,
स्वर्गातही नसावे यासम अमृत साठलेले...
निःशब्द ओठांतुनि बोल भावनांचे उमगले....

कवी: अरविंद चौधरी

निसटून गेलेले क्षण
येत नाहीत परत ...
आपण त्यांच्या मागे
धावतो खुळ्यागत .....

पळत सुटलो तरी
नाही काही हाती लागत ...
आपण मात्र एकटेच
बसत बसतो कुढत ....

उद्विग्न होता आपण
सारे दूर पळतात...
दुरावा आला म्हणजे
संवाद ही हरवतात ....

आपल्या मनाचा आवाज
ऐकता आला पाहिजे ...
उत्स्फुर्तता टिकवून
स्वसंवाद झाला पाहिजे ....

मन व शरीर यांच्या
संवेदना जाणवू या...
स्वत:ला व्यक्त करण्यास्तव
कामास त्यांना लावू या....


कवी: ..........

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचास
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजली आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.....

कवी: ..........

कुंतलांच्या दाट छायेत विसावण्याची, संवय ती लावून गेली
आठवणींच्या तुषारांत चिंब होण्याची, चटक ती लावून गेली...

भुरभुरती अलक मऊ रेशमी, कधी गुलाबी गालांवरती
मंद मंद सुगंधे गंधित होण्याचा, नाद ती लावून गेली ....

ओंठ गुलाबी पाकळी, बागेतील कळी कळीचा रस शोषलेली
अधर मधुकलश, तयांची मनी, हुरहूर ती लावून गेली ....

झर झर जसा वाहे निर्झर, हास्य तिचे खळ खळ अवखळ
रमणीच्या हास्यात पुनः रमण्याची, चुटपूट ती लावून गेली....

लाजरे हसरे काळे टपोर डोळे, बोलत असत रात्रंदिनी
झोप उडवूनि, मज त्या सुनयनांची, चटक ती लावून गेली..

कवी: अरविंद चौधरी
आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं

कवी: ..............

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं

कवी:............

Tuesday, October 09, 2007

पाहीले तुझ्या डोळ्यांत जेव्हा…
मी मला सापडाया लागलो ।
तू हासलीस मुग्ध पाहुनी अन …
मी मला आवडाया लागलो ।

मानले की वेदनांना अंत नाही…
तरी त्यांची आता जराही खंत नाही…
स्पर्शता तू घाव ही गंधाळती…
सुगंधात मी बुडाया लागलो ।

एकांती उमलतील संदर्भ माझे..
ओठी तुझ्या हसतील शब्द माझे,
फुलतील देही श्वास माझे तुझ्या ..
हृदयी मी धडधडाया लागलो ।

कवी: मुकुंद भालेराव
कोसळनारा पाऊस जेव्हा तूझ्या घराकडे वळू लागतो
तेव्हा मी सूद्धा त्यच्याबरोबर सेरावेरा पळू लागतो.
मला माहीत आहे तो तूझ्याच अंगणात पडनार आहे
तू घातलेल्या सड्यावर तो मग हलकेच कोसळनार आहे.


स्वताला विसरुन तू मग पावसात नाचू लागशील
मला सुद्धा पाऊस समजुन तळहातावर झेलू पाहशील
मला आवडेल तुझ्या ओन्ज्ळीतल पाणी होऊन राहण
आणि एकत रहाव तू रचलेल पाऊसावरच एखाद सुंदर गाण


पाऊस पडुन गेल्यावर
मी सुद्धा निघून जाइन
पण ओड्याकाटच्या उंच दगडावर ,
मी तुझी वाट पाहिन

-- अमोल
कळत नं कळत,
तु माझ्या इतकी जवळ आलीस,
जाता जाता मनात माझ्या
घर करुन गेलीस.........

घरामध्ये आता या,
कोणीच राहत नाही,
खिडकीतून खुणावणाऱ्या आठवणी
हल्ली मी देखील पाहत नाही........

प्रेमा मध्ये काय ओलावा
कमी होता मझ्या?
की, मनातला दुश्काळ
लांबला होता तुझ्या?

जाता जाता म्हणालीस
विसरुन जा मला,
मनं मात्र माझ विचारतं
कुठे ठेवु तुझ्या वेड्या प्रेमाला?

जपून ठेवलयं मी ते प्रेम
भेटलीस की देइन तुला......
भीती मात्र वाटते खरच
विसरली तर नसशील ना मला????

कवी : ..........
आता तुझी माझी
वाट वेगळी होणार

माझे मन मात्र
तुझ्या मागे जाणार

पुढचा प्रवास आता
एकट्याला करावा लागणार

वाटेवरच प्रत्येक पाउल
जड मनाने पडणार

पडणाऱ्या पावला बरोबर
तुझ्या आठवणी येणार

तू बरोबर नसणार
म्हणुन मनोमन रडणार

माहीत होत मला
कधीतरी हे होणार

एका वळणावर
दोघे वेगळे होणार

म्हणुनच तू जातांना
चेहऱ्यावर हसू आणणार

डोळ्यांमधलं पाणी लपवून
तुला अलविदा म्हणणार

वाट बघितली असती पण
तू नाही येणार

म्हणुनच तू जाईपर्यंत
डोळे भरून पाहणार

कवी: ..........