आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, September 07, 2007

[एका जुन्या कथेच्या आधारे]

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि। ति हासली.

१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि...ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.


टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,

ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता

योगदान -- ग्रिश्मा
काही व्याख्या

कॉन्फरन्स रूम : जिथे सगळे बोलतात, कुणीच ऐकत नाही आणि नंतर सगळ्यांचेच मतभेद होतात.

उत्कंठा : आपल्याला कधीही वाटले नव्हते असे काहीतरी आता वाटणार आहे असे वाटणे.

स्मित : जी अनेक गोष्टी सरळ करू शकते अशी सुरेख वक्ररेषा.

ऑफिस : घरकामाच्या धबडग्यानंतर हक्काची विश्ाांती घेण्याचे ठिकाण.

जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची दुमीर्ळ संधी.

वगैरे वगैरे : तुमच्या प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा तुम्हाला फारच जास्त कळते, अशी इतरांची समजूत करून देण्याचे साधन.

अणुबाँब : इतर सर्व शोधांचा अंत घडवणारा शोध.

आशावादी : जो आयफेल टॉवरवरून कोसळताना मध्यावर आला की आनंदून ओरडतो, ''पाहा पाहा, अजूनतरी दुखापत झालेली नाही!!!!''

प्रौढ माणूस : ज्याची दोन्ही टोकांची वाढ थांबली असून आता फक्त मध्यभागाची वाढ सुरू आहे, असा इसम.

मौलिक पुराणवस्तू : जी तुमच्या आजोबानं विकत घेतली, वडिलांनी भंगारात काढली आणि तुम्ही शेकडो रुपये मोजून पुन्हा विकत घेत आहात.

ओव्हरस्मार्ट : तुमच्यापेक्षा स्मार्ट माणूस

कोंबडी : एक असा पक्षी जो तुम्ही त्याच्या जन्माआधीही खाऊ शकता किंवा मृत्यूनंतरही.

शिष्ट : तोंड बंद ठेवून जांभई देण्याची कला अवगत असलेला मनुष्य.

फाइव्हस्टार हॉटेल : जिथे गारढोण, बेचव चहा मिळतो. तो गारच प्यायचा उच्चभ्रू चहा असतो. आणि त्यासाठी तुम्हाला तीनचार महिने सकाळदुपारसंध्याकाळ कटिंग पिऊ शकला असतात, इतके पैसे द्यावे लागतात.

चुंबन : एक प्रभावी साधन जे दोन माणसांना इतके जवळ आणते की त्यांना काही काळासाठी एकमेकांचे दोषच दिसेनासे होतात!!!

डास : एक असा कीटक ज्याच्यामुळे तुम्हाला माश्या निरुपदवी वाटू लागतात.

गुपित : अशी गोष्ट जी तुम्ही एका वेळी एकाच माणसाला सांगता

अहंकार
प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव सापडेल . माणूस लहान असो ,मोठा असो, त्याला जे काही हवं ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख मारत असते.
जी काही आपली पात्रता आहे तीनुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही हि भावना सारखी छळत रहाते. शांतपणे जगू देत नाही.
प्रत्येक छोट्यामोठ्या ऒदासिन्यामागे एक सुप्त अहंकार असतो.अहंकारानं भरलेलं मन
काठोकाठ भरलेलं असेल तर त्यात दुसय्रा भावनेचा शिरकाव होणार कसा?

ताकद
जीवनाचा क्रुस हलका असो वा जड असो,ज्याचा त्याला वहावा लागतो.क्रुसाच्या निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. तो आपल्या वाट्याला येवू नये किंवा तो आपल्या मनाप्रमाणे असावा अशी प्रार्थना
न करता देवाला सांगावं,क्रुस कसाही दे फ़क्त तो पेलणारा खांदा मात्र मजबूत कर.

धडा
सर्वात जवळची माणसं जास्त तह्रेवाईकपणे वागतात.त्यात आपण मनाला मूळीसुध्दा कुलूप घेउ नये.
परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करु नये ह्याचा धडा आपल्याला घर बसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो.एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माणच होत नाही.

समस्या

एका माणसाच्या समस्येवर दुसय्रा माणसाजवळ उत्तरच नसतं.कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोह्चू शकत नाही.तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो.समस्येतून जाणाय्रा मणसाच्या भुमिकेत तो जाऊ शकत नाही.समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्त्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खुश होतो.
-व।पु.काळे (महोत्सव)

घर

घर असावे घरासारखे ,नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
त्या शब्दात अर्थ असावा ,नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे,नकोत नुसती गाणी

सवीकार
जो माणुस स्वत: असमाधानी असतो तो दुसऱ्याला कधीच आनंद देउ शकत नाही.
आपल्या भोवतालच्या व्यक्ति जश्या असतात, तसच आपल्याला त्यांचा स्विकार करावा लागतो.
त्या कश्या असाव्यात, याविषयी आपल्या भावना काय आहेत, याला काही महत्व नसत.
- सुधा मुर्ती - पुन्यभुमी भारत

सुहास्य
सुहास्य वदनाने बाहेर पड्णारा माणूस खरोखरीच रामायणातल्या खारी प्रमाणॆ समाजसेवा करीत असतो, किंवा गंधित फुला प्रमाणे थोड्या प्रमाणत कां होईना जग सुगंधित प्रफुल्लित करीत असतो।

मैत्री
मैत्री म्हणजे विश्वास,तिथं भांड्ण होऊ शकते पण गैरसमज संभवतच नाही.

गैरसमज
गैरसमज हा कैंसर सारखा असतो,तिसरया स्टेजला गेल्यावरच खरं रुप प्रगट करतो.
-- व. पू .काळे. 'ऐक सखे'.

पु.लं. एकदा म्हणाले होते..
"माणसाच्या शरीराचा कोणता तरी एक कोपरा नेहमीच दुखत असतो. फक्त त्या वेदना तीव्र नसल्याने माणसाला ते जाणवत नाही. पण ज्या दिवशी त्या वेदना जाणवणार नाहीत तेव्हा तो माणूस मेलेला असेल."

समाधान
हे देवा जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचं समर्थ्य मला दे. जी परिस्थितीमी बदलू शकत नाही तिचा स्विकार करण्याची शक्ति मला दे.आणि या दोहोमधला फ़रक जाणण्याची बुद्धी मला दे.
जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचा प्रयत्न करणं आणि जी बदलू शकत नाही तिचा स्वीकार करणं म्हणजे समाधानी वॄत्त्ती ।

काही माणसं....................
काही माणसं
पिंपळाच्या पानासारखी असतात
त्याची कीतीही जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपुन ठेवावीशी वाटतात

जवळची नाती
आपण घरातल्या सर्वात महत्वाच्या सर्वात जवळच्या नातेसंबंधाना गॄहीत धरतो, पीळ निरगाठी पडू देतो। जवळ्जवळ चिंध्या होइपर्यंत ताणतो आणि बाहेरच्या तुलनेने अनावश्यक संबंधांना मात्र जपत असतो . ते तुटतील म्हणून घाबरत असतो.

कोमलतेची ताकद
कोमलतेत ताकद असते।पावसाचं पाणी आकाशातून पडतं,माती वाहुन जाते, नध्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात.पाणी वहातच रहातं. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं.कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही. स्वतःची वाट शोधून बाजूने निघुन जातं. ह्या वहाण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळू हळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो.

भिती
एखादी गोष्ट तडीला न्यायची असेल तर अपयशाची भिती मनातून काढून टाकली पाहिजे.याच भीतीने सर्वोत्क्रुष्ट साध्यासाठी प्रयत्न करण्यापासून माणूस दूर राहतो.


चुका सगळेच करतात. कुणी पाहात नसताना त्या करण्याची कला साधली पाहिजे.

तुम्हाला आयुष्याची उजळ बाजू दिसत नसेल, तर किमान जी काळवंडलेली बाजू दिसते, ती तरी पॉलिश करून चकचकवा.

नकार देणे ही कला असेल। पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.

शुन्य
शुन्यालाही देता येते किम्मत
फ़क्त त्यासाठी कुणितरी "एक" होवुन-
शुन्यापुढे उभ राहन्याची
दाखवावी लागते हिम्मत

स्वर्ग
माणसाला छंद हवा. स्वप्न हवीत. पुरी होनारी किंवा कायम अपुरी राहनारी. त्यातुन तो स्वत:ला हरवायला शिकतो. हे हरवन सापडण प्रत्येकाच नीराळ असत. हरवन्या सापडण्याच्या ह्या जागा पती पत्निच्या एकच निघाल्या तर संसारात "स्वर्ग" उतरतो.
-- वपुर्जा- व.पु.काळे.

अत्म आनंद
आत्म-बलच ढग जस आपल्याला स्वता:तुनच बाहेर काढावा लागतो तसच आत्म-आनंदाच ही आहे,तो ही आतुनच यावा लागतो.
- हसरी किदानी

योगदान : ग्रिश्मा






तुझ्याचसाठी...

जगणे हे वाटते फ़क्त तुझ्याचसाठी
मरण सुद्धा आता यावे तुझ्याचसाठी

विसरुन पाहीले तुला परी विसरु कसा
शराबी अता मी झालो तुझ्याचसाठी

होते काय माझे जे मी तुला देऊ
श्वासांनाच या विसरलो तुझ्याचसाठी

रंग बेरंगी...गंध गंधहीन झाला
प्राजक्त कधि बरसायचा तुझ्याचसाठी

रंग काजळला असा तुझ्या काजळाचा
जाळले जेव्हा मी मला तुझ्याचसाठी

-- संदीप सुराले
फुलांनी अता चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने अता मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

वर्षावे ढगांनी हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

नव्या आसमंती प्रकाशीत होतो कसा सूर्य हा,
जगाचे नवे आज निर्माण व्हावे अशी गोड तू

दिल्या तू मनाला विखारी किती यातना,
व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू

कवी : अद्न्यात

Wednesday, September 05, 2007

तु म्हणजे एक स्वप्न

तु म्हणजे एक स्वप्न...,
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे........ ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
श्वासाश्वासात भिनलेले,
तरिही दुर दुर असणारे...

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या आठवणीत जगणारे,
मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत फ़िरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
दिवसा सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही, असल्याचे भासविणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
आठवणींचा कोंदवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व पसरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
माझे कधिही न झालेले,
तु दुर असलीस तरीही, तुझ्या सुखासाठी तळमळणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तु जिंकावीस म्हणुन, कितेकदा स्वत:लाच हरविणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडुनही, पालवीची आस धरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
शब्दा शब्दात विणलेले,
मला मात्र नव्या कवितेला वाव देणारे


कवी : अद्न्यात
योगदान : रेशमा


चुकुन तिच्या
प्रेमात पडलो
जीवनातले सुख
गमावुन बसलो

तिच्या अदांनी
मन घायाळ झाले
ह्रदयातचे घड्याळ
जोऱ्यात वाजू लागले

रात्रीची झोप
उडून गेली
दिवसा उजेडी
स्वप्न पडू लागली

प्रत्येक ठिकाणी
तिचा भास होउ लागला
तिच्या आठवणीने
जीव व्याकुळ झाला

एका बेसावध क्षणी
तिला विचारून टाकले
शब्दातून ह्रदय
मांडुन टाकले

न बोलताच
तिने नकार दिला
मैत्री तरी ठेव म्हणत
मी ही प्रतिकार केला

प्रेमात तिच्या
अजुनही झुरतो
तिच्या मैत्रीलाही
तरसतो आहे

नाव तिचे घेण्यात
वेगळीच नशा आहे
कधीतरी हो म्हणेल अशी
वेडी आशा आहे

कवी: अद्न्यात
योगदान : रेशमा

Tuesday, September 04, 2007

नशीबाच्या हातून हल्ली ठगत नाही

हल्ली मी मलाच शोधत नाही
कुठेच थांगपत्ता लागत नाही

पायांनी किती अंतर कापले
हातांच्या फेऱ्या वरून मोजत नाही

निवडुंग कुठेही जगतो म्हणून
तुळशी शेजारी कुणी लावत नाही

विदूषकाच्या देहात शिरताना हल्ली
दु:खांना सुखाने भागत नाही

तारा तुटताच नुसताच पाहतो
नशीबाच्या हातून हल्ली ठगत नाही

चालाख, जुगारी हातांशी हल्ली
हवा तसा पत्ता वागत नाही

फळ्यावर ब्रम्हज्ञान लिहीलं जरी
फळ्याच्या ज्ञानात भर पडत नाही

@सनिल पांगे
शाळेची आठवण...

आठवतात ते दिवस,
वर्गात जाण्यासाठि धावायचो,
पहिला बॆंच पकडण्यासाठि,
अनेकदा धडपडायचो.

आठवते मला दप्तरातली,
पेन्सिल आणि दुहेरी रेघांची वही,
घ्यायला लागायची ग्रुहपाठावर,
नियमित आई बाबांची सहि.

रोज सकाळि प्रार्थनेला,
वेळेवर हजर राहणे,
मधल्या सुट्टित डबा खाऊन,
धावत मैदानावर जाणे.

हस्तकलेच्या तासाला,
काहितरी उपद्व्याप करणे,
अन वर्गासमोर शिक्षकांचा,
पाठित धपाटा खाणे.

खेळाच्या तासाला जाताना,
एका रांगेतुन चालणे,
अन परत येत असताना,
मित्रांच्या खोड्या काढणे.

सहामाहि परिक्षेनंतर येणा-या
दिवाळिच्या सुट्टिची मजा
आणि त्या सुट्टित बाईंनी दिलेल्या
दिवाळिच्या अभ्यासाची सजा.

वार्षिक परिक्षेच्या वेळि,
येणा-या उन्हाळि सुट्टिची तयारी,
अन निकाल लागल्यानंतर,
बाहेर पडायची आमची हुशारी.

परत नवीन वर्गात जाण्यासाठि,
मनं उत्साहि व्हायचं,
अन पहिला बॆंच पकडण्यासाठि,
पुन: पुन: धडपडायचं......

कवी : अद्न्यात

Monday, September 03, 2007

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला

आयुष्यात प्रेम करायचय मला

कवी : अद्न्यात
आज संध्याकाळी
तिची-माझी भेट ठरली
वाट तिची बघण्यात
क्षण युगे भासली

उगवत्या चंद्रा बरोबर
ती पण आली
माझी नजर पडताच
मनोमनी लाजली

आमच्या प्रिती सारखी
बहरली रातराणी
दिल्या-घेतल्या वचनांना साक्षी
क्षितिजावरची चांदणी

लक्ष चांदण्यांचे तेज
एका चंद्राने झाकोळले
तीच्या एका स्पर्शाने
देहभान हरपले

मदहोष करणारे क्षण
हातात पकडायचे होते
मनातल्या चोर कप्प्यात
जपुन ठेवायचे होते

निरोपाची वेळ येताच
मन उदास झाले
बेचैन मनाला पुढच्या
भेटीची आस लागे

-- हेमंत मुळे
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे

हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

कवी: अद्न्यात

प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही..........


प्रेम हे माझे तुझे जुळलेच नाही
खेळ दैवाचे कुणा कळलेच नही

पाहिले रस्ते सुखाचे केवढे मी
पाय त्या वाटेवरी वळलेच नाही

झेलले छातीवरी मी वार सरे
वार पाठीवर कधी टळलेच नाही

मी कसे लपवून ठेवू दु:ख माझे
हुंद्क्यांना मी इथे गिळलेच नाही

मी तुझ्या प्रेमात या भिजलो असा की
प्रेत ही माझे कधी जळलेच नाही

तोडल्या त्यांनी कळ्या माझ्या सुगंधी
मग फुलांचे गंध दरवळलेच नाही

कवी: अद्न्यात
रात्र अर्धी सरली
चंद्र नभी आला
शुभ्र चांदण्याची
भिती अंधाराला

संथ पाण्यात पडले
चंद्राचे प्रतिबींब
कांचनमय झालेला
पाण्याचा थेंब थेंब

पानांच्या झरोक्यातुन पडले
चांदण्याचे कवडसे
चांदणे प्यायला
पान् पान आसुसले

मनातल्या चकोराला
ओढ चांदण्याची
महिन्यातून एकदाच का येते
वेळ चांदण्याची

-- हेमंत मुळे

पाहील मी पहील्यादांच
तिचं गोड हसणं, तिझं ते रुप देखणं
मनाने हाक देताच नेमकं
तिने मागे वळुन पाहणं
त्या पहील्या भेटीत मित्रहो
मी तिचा दिवाना झालो होतो

त्यादिवसानंतर मी कितींदा
अख्खी रात्र जागवली , दिवसा तिची स्वप्न पाहीली
न राहुन एकदा तिला मी तिची मर्जी विचारली
शब्द माझे कानी पडताच ति छान लाजली
तिच्या मनाच्या घरट्यात तेव्हा मित्रहो
त्या दिवशी मी नवा पाहुणा झालो होतो

या दुनियेला हरवाण्याची ईछचा
तिच्या मनी होती
त्यासाठी ती मला मदतीचा हात मागत होती
ध्येयाकडे पोहोचायला उत्साही साथ मागत होती
"फ़क्त तुझ्यासाठीच" म्हणत तेव्हा मित्रहो
मी तिच्या जिंकण्याचा बहाणा झालो होतो

दिला शब्द पाळत मी तिला शिकवलं
नजरेचा तीर चालवणं
शिकताना नेहमी तीनं
माझ्या नजरेत खोलवर पाहणं
अनं तिच्या त्या कातील
नजरेचा मित्रहो
शेवटी मीच निशाना झालो होतो

मनात तिच्या एकदा
स्वार्थाची ठीणगी ऊडाली
नियतीच्या खेळात तेव्हा
मला दगेबाजांची जात कळाली
तिच्या त्या अजब वागण्याने
माझी सारी स्वप्न धुळीस मिळाली
तिच्यासाठी मित्रहो तेव्हा
मी कदाचीत जुना-जमाना झालो होतो

सचिन काकडे [ सप्टेंबर १, २००७]