आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, February 28, 2008

एक छानशी गोष्ट

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

स्त्रोत : अंतरजाळ..

Wednesday, February 27, 2008

कधीतरी शिकुन घे, तु
शब्दांमधला अर्थ उलगडायला,
मग बघ, तुला पण नाही जमायचं
डोळ्यांपासुन आसवांना अलग करायला .!!!...

खरचं मन जे विचार करतं
प्रत्येकक्षात कधी घडत नाही
जे भाग्याला मान्य असतं
तसं स्वप्नही आपल्याला पडत नाही

वाटणी झाली तर ते पाप कसं
सुखानं वेगळं नांदणं शाप कसं
भिंती मनाच्या असतात
एकत्र असणं प्रेमाचं माप कसं

चारोळीकार: अद्न्यात


Tuesday, February 26, 2008

मराठीच्या पुस्तकात

मराठीच्या पुस्तकात वाटले जातात सहित्यिक
ज्ञानेश्वर दहा मार्कांसाठी
कुसुमाग्रज सात मार्कांसाठी
त्यामुळे पोहोचतच नाही मुलांपर्यंत कधी,
दुरीतांचे तिमिर घालवणारे पसायदान
किंवा कोलंबसचा दुर्दम्य आशावाद
पोहोचतात ते फ़क्त निकालातले आकडे
तुल सत्त्याण्णऊ मला साडे सत्याण्णऊ
मुलं अशीच वाढतात
आणि मग आयुष्यभर सोडवत बसतात आकड्यांचीच गणितं,
शब्द आणि अर्थाना मागे टाकून.

-- हर्षदा सुंठणकर

Monday, February 25, 2008

पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..’
गल्लीत यार लई बोर होतं..
दिल्लीच्या राजकारणात शिरायला पायजे.
तोडपानी , हप्तापानी .. साला इन्कमच नाय..
वर्षाकाठी चारपाच घोटाळे करुन
चांगला लंबाचौडा हात मारायला पायजे..

धमक्या द्या, ग्यांग पाठवा,
सालं कुत्रं बी आजकाल खात नाय..
मामालोकांना वाटत बसलो
तर खिशात कायपन –हात नाय..
राव हप्ते मागत बसण्यापेक्षा
आता मतं मागत फिरायला पायजे..
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

हिकडं जंबिया घेऊन ग्यांग चालवा,
फारतर फार गल्ली डरेल.
तिकडं खादी घालून पक्ष चालवा,
साला आय शी यस वाला बी सलाम करेल..
इथं कट्ट्यावर सडत बसण्यापेक्षा
दिल्लीचा रस्ता धरायला पाहिजे.
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

खरं सांगतो यार तुला,
हिकडं काय पन खरं नाय..
दिवसाकाठी हजार बाराशे
कमाई हाय पन साला ब्यालंस नाय,
सात पिढ्या खातील बसून.
यार येवढा तरी ब्यालंस उरायला पायजे.
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

तू येकच हाक चाळीत टाक
शंभर कार्यकर्ते तयार होतील.
सणावाराला वाढदिवसाला
चौकांत होर्डिंग उभे –हातील.
म्हनून म्हंतो कसा का व्हईना
यंदा पक्ष उभारायला पायजे..
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

-- संदीप मोहिते
आनंदक्षण
.............................

या जीवनाच्या झाडावरूनी...
उगाच झडले काही क्षण..
आता थोडं जगावं म्हणतो...
काही क्षणांना वेचावं म्हणतो..

या स्वार्थी जगामध्ये..आता..
या क्षणांशिवाय मोठं काय..?
पाचोळ्यागत त्यांना ..आता..
वाया जाउ द्यायचं नाय...

म्हणून माझ्या ओंजळीत...मी..
घेतो भरून चार क्षण..
तुमच्या सोबत आनंदाचे माझे दोन..
माझ्यासोबत आनंदाचे तुमचे दोन..

पैसा कुठे पुरतो कुणाला..
पुरायला ही नाही उरत कुणाकुणाला..
उरतील इथे शेवटी सुद्धा..
वेचलेले ते चार क्षण...

वेचावे म्हणतो माझे काही ' आनंदक्षण '

आनंद माने...
('आनंद' या शब्दाविन जगणे अशक्य ...तुम्हालाही...)