आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, December 14, 2007

वाटा ...(गझल)

आता कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा.

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा.

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा.

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा.

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा.

हो येथेच सुरवात , इथेच अंत
(कीती प्रवास असे गिळतात वाटा.)

सुधीर मुलिक ......
http://kavyalay.blogspot.com
http://marathikavita1.blogspot.com


एवढच........

लग्नाच्या त्या मंदावत तुला एकदा तरी पहायच होत
वधूचं ते सुन्दर रुप मनामध्धे जपायचं होत
जशील तिथे सुखि रहा एवढच फक्त सानगायचं होत!!

आयुष्यातले चार क्षण सोबत आपन जगलो होतो
कधी हसत कधी रडत सोबत आपण चाललो होतो
ते क्षण आता विसरूण जा एवढच फक्त सानगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

आठवतं का? झाडाखाली रोज आपन भेटायचो
आयूष्याचे सुन्दर स्वप्न सोबत आपन रंगवायचो
ते स्वप्न सगळे पुसून टाक एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

आठवतका तुला तू नेहमीच रुसायचीस
मी विनोद करताच खळखळून हसयचीस्
अस रुसनं आता सोडुन दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

नेहमीच प्रेमाने तू रजा माला म्हनायचीस
आपण दोघे रजा रानी हेच गीत गायचीस्
हा रजा आता वीसरुन जा एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

भेट्लो नहीं तुला तर दिवसभर रडायचीस्
रडतना सुद्धा तू कीती सुन्दर दीसायचीस
असं रुसन आता सोडून दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

समूद्राकाठी फिरन्याचा नेहेमीच हट्ट करायचीस
किनार्यावर रेतीमध्धे लहान होवून खेळायचीस्
असे हट्ट आता सोडून डे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

खांद्यावरती डोक थेवून तासन तास बसायचीस्
माझ्याकडे बघून मग लटकच हसायचीस
ते क्षण आता विसरूण जा एवढच फक्त सानगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

आज तू पत्नी झालीस उद्या तू आई होशील
हळूहळू नवी नाती आता तू गुंफ़त जाशील
संसारात स्वतहाला रमवून घे एवढच फक्त सानगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

उमेश ....

Thursday, December 13, 2007

तो सुंदर लाजरा मुखडा,
ते नयन चेटकी, जादुंचे ग
रसाळ ओठांची महिरप,
आत, दतपंक्ती कि मोती ग?

केश संभार घनदाट
त्यात तारुण्य बेफाट,
उतरली भु तळी रंभा की अप्सरा
वळती तुझकडे वारंवार की नजरा.


गोरेपान सुकुमार कोवळे हात
भरलास रंगीबेरंगी बांगड्याचा चुडा
वर ते मोहक खट्याळ हसणे,
पडे जणु शुभ्र चांदण्याचा सडा

लांब रेशमी कुंतळ काळे
ओल्या अधराचे चंचल चाळें
मोहक नयनांच्या त्या कोंदणी
उमलली जणु शुक्राची चांदणी

-- अविनाश
एक चारोळी बनवली आणि मैत्रिणीला पाठवली....
तिच्या आणि माझ्यामधला " एक संवाद" बघा कसा वाटतो ते.. ;-)

मी : बंद पापण्यांमागे
तुझाच चेहरा असावा
नको कोणतेच बंधन
नको कोणताच दुरावा

ती : वाह वाह
ती : सांभाळुन रहा मित्रा,
ईथे दुखाशी मैत्रि आहे,
मी प्रत्यक्षात अनुभवल तो रस्ता,
आता तुही त्याचा यात्री आहे

मी: परिणामाची येथे तमा कुणाला आहे
या वाटसरूला वाट न संपावी अशी आस आहे
मी : तुही वेडी आहेस सखे
आनंदाला दुखाची भिती दाखवत आहेस...
ज्याने दुसऱ्यान्ना हसवले
त्याला तु अश्रूंची भिती दाखवत आहेस...

ती: ईथे कुणाला दुखाची आवड आहे
पण प्रेमानेच केली दुखाची निवड आहे

मी : प्रेम कधिच फ़सत नाही
आपणच प्रेमात फ़सतो
क्षनभराच्य आकर्षनाला
प्रेमाचे नाव देउन बसतो
मी : तुज्या अनुभवाला
तु नियम मानत आहेस
जरा नियमाच्या चौकडीतून बाहेर पड
अजुन तुला खुप काही अनुभवायचे आहे

ती : प्रेम य शब्दाचा अर्थ मी काय घ्यावा ,
मी केले तो घ्यावा, कि तुला दिसतोय तो घ्यावा

मी : प्रेम म्हनजे काय
हे मलाही माहित नाही
पण त्याचा पाया विश्वास आहे
हेच कुणाला पटत नाही
मी : एका नजरे मधेच जेव्हा
तुला ज्याच्यावर विश्वास बसतो
तोच तुझा खरा जोडीदार
आणि तोच तुझा खरा सखा असतो

ती : नाईस

मी : माहित आहे कधी कधी
आपलाच पाय घसरतो
पण लक्षात ठेव
तोल न सांभळनारे आपणच असतो

ती : बस झाले
ती : नाहितर तुला आवार्ड द्यावा लागेल

Wednesday, December 12, 2007

बंद पापण्यांमागे
तुझाच चेहरा असावा
नको कश्याचेच बंधन
नको कोणताच दुरावा
- आनंद काळे

Tuesday, December 11, 2007

का कुणास ठाऊक
मन फ़ार उदास झालंय
तुझी आठवण का येत नाहि
याचा विचार करण्यात गुंतून पडलंय

का कुणास ठाऊक
नेहमी आपल्याला वाटेल तसं का होत नाही
कदाचित मीच कुठेतरी
कमी पडतोय असे तर नाही

का कुणास ठाऊक
सुख मिळाल्यानंतर लगेच दुख: का येते
उमलले फूल लगेच
कोमेजून का जाते

का कुणास ठाऊक
कुठे तरी दूर जावेसे वाटतयं
ह्या क्षणभंगूर जीवनातुन
स्वप्नात रमावेसे वटतयं

का कुणास ठाऊक
लिहायला काहीच सुचत का नाही
माझ्या विचारांन्ना शब्दांचा
आधार का मिळत नाहि

का कुणास ठाऊक......
का कुणास ठाऊक......

कवी: अद्न्यात
योगदान : स्वाती पवार
चमत्कारावर माझा विश्वास नाही
मी त्याच्या भरवशावर जगतेय
माझ्या स्वप्नातला सखा अचानक
मला साक्षात भेटलेला बघतेय

मनापासून तुझी कशी झाले यावर
सहज कुणाचा विश्वास बसेल का?
माझ्यासारखे सोनेरी भाग्य घेऊन
या जगात कुणी तरी असेल का?

तुझ्या विचारात दिवस आणि रात्र
आताशा चिंब चिंब भीजलेली असते
दिवस असे मस्त छान जात आहेत
की मला वेळेचे मुळी भानच नसते

चमत्कारावर माझा विश्वास नाही
मी त्याच्या भरवशावर जगतेय
तुझ्या विचारात तुझ्या स्वनात
न्हाऊन अगदी नखशिखांत सजतेय

-- तुषार जोशी, नागपूर
काल तू भेटलीस
वळवाच्या सरीपरी,
पण इवलूष्या वेळेत
तु केलीस जादू खरी

तुझ्या नजरेच्या खेळात
मी नशीला होत होतो,
तुझ्याकडे पाहता पाहता
मी तुझाच होत होतो,

थोडा वेळ वाटलं
विसरावं सार काही
अन तुच असावीस
माझ्या दाही दिशेलाही

कधी न भेटलेलो आपण
काल पहील्यांदाच भेटलो,
भेट झाल्यावर मनात आले
की आपण यापुर्वीही कित्येकदा भेटलो..

तु तशी सावळीच
पण तरी रुप तुझं
अबोलीच्या गर्द रंगाच्या
मोहक कळीचच..

थोडया वेळातच नजरा,
ऐकमेकांना मुजरा घालून गेल्या,
अन पुन्हा परत भेटण्याचा
एक मर्जिचा अल्विदा करून गेल्या..

-- आ. आदित्य...

तु....

तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना....

रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना....

आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना...

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना...

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना..

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना....

विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना...

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना..

सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना....

कवी: अद्न्यात

गुंजलेच होते नाद आठवांचे
की समोर ही सांज आली
छेडतच होतो सुर सावल्यांचे
की समोर ही सांज आली

मनाच्या अथांग सरोवरातल्या
तरंगांचा आकार मोडीत
विसरत तुला निघालोच होतो
की समोर ही सांज आली

किरणांच्या मागोमाग जाताना
घरटी विसरली काही पाखरं
मार्ग त्यांस दावितच होतो
की समोर ही सांज आली

क्षितीजाच्या भयाने जडलेली
अबोल नजर ही पावलावरी
बोलण्यास ती सरसावतच होती
की समोर ही सांज आली

एकटाच पडलेला सखे
कालचा प्याला हा शब्दांचा
विसळुनी त्यास घेतच होतो
की समोर ही सांज आली

-- सचिन काकडे

चिखलफेक

हसून हसून तिची पुरेवाट झाली होती. चिखलात पडलेल्या अरविंदाची अवस्था पाहून ते स्वाभाविकही होते.
खरी गम्मत त्या दोघांना पाहणाऱ्यांची झाली होती. लोकांना दिसत होते दोन काळया कुट्ट चिखलाने
माखलेल्या आकृत्या. निशाचे हसणे अजुनही थांबलेले नव्हते. खरे तर ती काय कमी माखलेली नव्हती.

कॉलेजच्या पहिल्या तासापासून अरविंद निशाला पाहून पहिल्या बघण्यातच खल्लास झाला होता. मग कोणतीही
निशाशी बोलण्याची संधी त्याने सोडली नाही. निशा आता त्यांच्या गटातली झाली होती. केमेस्ट्री प्रॅक्टीकल्स,
छोटे मोटे ट्रेक्स, कधी कधी एखादे सुट्सुटीत हॉटेल अशे त्यांच्या गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम मजेत पार पडत
होते. निशा सगळ्यांशीच छान वागत असे. पण अरविंदच्या मनातले विषेश तिला काय ठाऊक नव्हते.

अनिकेतला जेव्हा सांगितले तेव्हा तो उडालाच. म्हणाला अरविंद "काय सांगतोस काय? खरंच की काय?"
"नाही मी चित्रपट काढायला घेतलाय आणि तुला नवा प्लाट ऐकवत होतो", अरविंद चिडून म्हणाला.
"अरे रागावतोस काय! चेष्टा केली रे मी", अनिकेत बोलू लागला, "तुला काय वाटले, मांजर डोळे बंद
करून दूध प्यायली म्हणजे कुणाला कळत नाही, अरे तुझे तोंड ती दिसली की जे उघडते आ वासून ते ती
दृष्टीआड होईतो बंदच होत नाही माहित आहे".


"ए ते तोंड वगैरे अतिरंजित वर्णन आहे बर", आता अरविंद मारायच्या पावित्र्यात अनिकेत कडे सरसावत
होता, आणि तो अनिकेतला एक गुद्दा घालणार तेव्हड्यात अनिकेत निसटला आणि पळता पळता म्हणतो काय
"एक जरी गुद्दा बसला ना विंद्या तर कालेजच्या कॅन्टीन मध्ये जाऊन डरकाळी फोडेन की ऐका हो ऐका,
अरविंद शेट यांना प्रेमरोग जडला असून...", अनिकेत पुढे काही म्हणणार इतक्यात त्याला अरविंदाचे
आर्जवी डोळ्यांनी, अगतिक चेहऱ्याने आणि दोन्ही हातांनी नमस्कार मुद्रा करून त्याच्या कडे बघणे दिसले आणि
त्याचे शब्द मधेच अडकले.
"अरे अरे, काय यार आता काय रडणार आहेस की काय?", प्रेमात पडल्यावर माणूस हळवा होत हे ऐकले
होते पण पाहवत नाही रे गड्या.
"मग काय, इथे माझे प्राण जायची वेळ आलीय, तिला कसे सांगावे काय कळत नाहीये आणि तुला चेष्टा
सुचतेय", अरविंद एव्हडूसं तोंड करून म्हणाला.
"ए, तुला राजेश ठाऊक आहे", अनिकेत ला काहितरी नविन आठवल्यासारखे अरविंदाकडे बघून त्याने
विचारले.
"तो, प्रणिताला गटवणारा, तो उंचसा राजेश", अरविंदाला आठवणे फार कठिण नव्हते, कारण प्रणिता
कॉलेजची तारका होती.
"हो रे तोच, माझ्याशी बोललाय एक दोनदा. प्रेमाच्या बाबतीत बाप माणूस आहे बेटा. अरे
व.पु.काळेंच्या पुस्तकातले उतारे घडाघडा म्हणतो रे बोलता बोलता. एकदा त्याला विचारू की सल्ला काय
करता येईल ते. बघ आज संध्याकाळीच भेटू तू म्हणशील तर", या एका वाक्यात अनिकेतने मिटींग
मनातच निश्चित देखील करून टाकली होती आणि अरविंद मानेने हो देऊन मोकळा पण झाला कारण त्याच्या
हृदयाची जखम खोल होत चालली होती.

कॉलेजमध्ये प्रवेश करतांना आज अरविंदाची स्वारी जाम खुश्शीत होती. आज राजेश ला भेटायचे होते ना
संध्याकाळी. नेहमीप्रमाणे अरविंद, निशा, अनिकेत, पायल, सुधा सगळे स्कुटर स्टॅन्ड वर भेटून एकत्र
कॉलेजात प्रवेश करत होते. थट्टा मस्करी नेहेमी प्रमाणे चाललेली होतीच. पण अनिकेतच्या डोळ्यात
मिश्किल भाव होते. तो सारखा सारखा अरविंदा कडे पाहून हसत होता. अरविंदला सगळे कळत होते, तो
डोळ्यानेच जमेल तेव्हढे त्यांना मोठ्ठे करून त्याला दटावत होता, आणि तेव्हढ्तात कोणत्यातरी दगडाने तोल
जाऊन एकदम निशा समोरच्या चिखलात ढाडकन पडली.

दोन मिनिटे काय झालेय हे कळायलाच लागले सगळ्यांना. आजुबाजुला हशा पिकलेला पाहून काय झालेय याची
आता थोडी थोडी कल्पना गटाला यायला लागली. निशाला हात देऊन उठवण्याच्या नादात खरी गम्मत झाली
ते अरविंद ची. निशा हात धर म्हणता म्हणता साहेब तिच्याहून अधिक सपाट्याने चिखलात लोळण घेते झाले
आणि प्रक्षकांना आता फुकटात डबल मजा देते झाले.

चिखलात माखून रडवेली झालेली निशा सुद्धा अरविंदचा तो मदत प्रकल्प पाहून खो खो हसू लागली. गट
आणि तमाम प्रेक्षकवर्ग आता दोन चिखलात माखलेले गोळे एकमेकांकडे पाहून कसे घमासान हसतात, हे
पाहत होते.

"काय वेंधळा आहेस रे विंद्या", निशा हसता हसताच म्हणत होती, "कसली मदत रे तुझी?", आता ती
चिखलात रूळली होती.
"मदत नाही निशा", अरविंद अचानक शांत झाला, "तू अचानक पडलीस आणि सगळे तुझ्याकडे पाहून हसू
लागले, मला नाही आवडलं, नाही आवडलं मला. मग मी काय करणार तुला हात देऊन उभे केले तरीही
चिखलात माखलेलं सत्य काय मला बदलता येणार नव्हतं. मग माझ्याजवळ एकच उपाय होता."
आता निशाच्या अवाक होण्याची पाळी होती, "म्हणजे तू, तू, चिखलात..", आता निशाचा चेहरा आ वासून
अरविंदाकडे बघत होता.
"निशा, मला तू खूप आवडतेस, आयुष्याचा प्रवास एकत्र माझ्याबरोबर आखायला तुला आवडेल?", अरविंद
बोलून गेला आणि नंतर त्याला कळले की आपण बोलून गेलो आहे, आणि आता त्याची परिक्षेचा निकाल
लागण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यासारखी स्तिती झाली.

निशाने एकदा चिखलाकडे पाहिले, पुन्हा अरविन्दाकडे पाहून ती "तू, मुद्दाम..." असे काहीतरी पुटपुटली,
आणि एकदम चिखलाचा एक गोळा उचलून तिने तो अरविंदाकडे फेकला. आणि हसत हसत ती कॉलेज कडे
धावली. मधेच थांबून तिने मागे पाहिले आणि अरविंदाला लाहान मुलीसारखी जीभ दाखवून ती पुन्हा हसत
हसत कॉलेज च्या नळाकडे धावत गेली.

अरविंदाला तो चिखलाचा गोळा हृदयावर लागला. तो तसाच एका हाताने धरून तो अनिकेत कडे पाहत
होता. अनिकेत ने हुश्श केले आणि नळाकडे बोट दाखवून म्हणाला "चला, चिखल साजरा करूया"

-- तुषार जोशी, नागपूर

कल्पना-वास्तव

मी कल्पनेत रमणारा
तू वास्तावातच जगणारी

मी कधी कल्पनेच्या शिडीने स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचतो
पण तेवढ्यात तू पाय खेचून पुन्हा वास्तवाच्या आगीत ढकलतेस
मी स्वप्नांचे ईमले बांधलेलेच असतात की पुन्हा तू
वास्तवाच्या घणाचे घाव घालून एका क्षणात उध्वस्त करतेस

मी आत्तापर्यंत चाललेली वाट फुलांची होती असे म्हणतो
तेव्हा तू लगेचच पोळलेली पावले दाखवतेस
कधी मी पुन्हा कल्पनेच्या कुंचल्याने राजमहाल रंगवतो
तर तू ,"जरा प्रॅक्टीकल जगात रहात जा" असे म्हणतेस

कल्पना आणि वास्तव यात जितके अंतर आहे
तितकेच तुझ्या आणि माझ्या विचारांमधे आहे
पण खरं सांगू ? तरी देखील तू मला आवडतेस
कारण माझ्या कल्पनेतल्या तिच्यासारखीच तू आहे

वास्तवातील ही दुःखे, ह्या वेदना, ही संकटे
सारी आपल्या पाचवीलाच पुजली आहेत गं
ह्याजन्मीचे सगे सोयरेच जणू आपले ते
जम्नभाराची साथ देणारी हीच नाती आहेत गं

तुला खरं सांगू ?
वास्तवातल्या भळ्भळ्णार्‍या जखमेवर
कल्पनेचे पांघरून घेऊन बघ
कधी तरी असेच कल्पनेच्या गावा जाऊन बघ

कधी तरी वास्तव जगातून बाहेर पडून
असेच स्वप्नांच्या गावात शिरून बघ
पोळ्लेल्या पावलांना कल्पनेच्या पायघड्यांवर ठेवून बघ
मनीच्या असंख्य वेदनांवर स्वप्नांची फुंकर घालून बघ

वास्तवात असे जगताना
कल्पनांचा गाव हिंडून बघ
कवी नाही झालीस तरी चालेल पण
कधी तरी तू देखील स्वतःला विसरून बघ......
कधी तरी तू देखील स्वतःला विसरून बघ......

.... अमित वि डांगे

आंधळी जात.........

माझ्या डोळ्यातुन ओझरत्या
थेंबांतल्या सखे या तुझ्या जुन्या आठवणींना
आज ही सारी दुनिया "अश्रु" म्हणते
तु दिलेली अन आशेच्या उन्हात वाळवत ठेवलेली
जखम हीच दुनिया त्या एका शब्दातच ओली करते....

पण..... आता जणु सवय झाली
कालपर्यंतच्या माझ्या हळव्या मनाला
या ओल्या शब्दांची, सारख्या ओलावत्या जखमांची
रात्रीच्या एकांतात गप्पा मारत आता या मनाचा
दिवस काय आता त्याची रात्रही अगदी सहजच सरते....

सखे दुनिया म्हणजे भोवतालची हीच गर्दी सारी
नेहमीच या गर्दीच्या हाती शब्दांच्या नंग्या तलवारी
जिथं-तिथं ही आपलं सावज शोधत फ़िरते
या गर्दीची वार करण्याची [पाठीमागुन] रीत आगळीच असते
फ़क्त दोन-चार शब्दांच्या डोळ्यांनी पाहणारी ही जात आंधळी असते...
ही जात आंधळी असते.....

-- सचिन काकडे

ू दाता...

दिले नाहिस काहिच, असे म्हणनार नाही
काही दिले तू, असेही म्हणनार नाहि.

लेखनी होती हातात, शब्द होते मनात
भावनांची ऊबळ होती, दाह होता क्षणात
बळ दिलस मनगटात, लिहीन म्हटल काही
हा कसला न्याय म्हणावा, संपली होती शाई

दिले नाहिस काहिच, असे म्हणनार नाही
काही दिले तू, असेही म्हणनार नाहि.

भरकटलो या जंगलामध्ये, तूच दाखवलीस वाट
घशाला पडली कोरड जेव्हा, बाजूला होता पाट
बूडली नाव नदित माझी, शोधीत होतो धरती
तू मात्र उभा होतास, पाहत एकटक तीरावरती

दिले नाहिस काहिच, असे म्हणनार नाही
काही दिले तू, असेही म्हणनार नाहि.

ईवलासाही माझा स्वार्थ नाही,सारी उठाठेव त्यांच्याच पायी
त्यानाच हे न कळावे, भोग हे कसले माझ्या ठायी
आज मागावे तूझ्यापाशी, पण शब्द राहतात मुकेमूके
आशीर्वादासही मंदिरात या, मस्तकही आता का न झुके?

--अमोल

माझ्या डोळ्यात नीट बघं
तूझा प्रत्येक क्षण आवर्जून हिरवळेल
अलगद मग पापण्या मीट
एक स्वप्न हळूच येवून कुरवाळेल

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच
विश्वचं काही रम्य असतं
तुझं काय, माझं काय
तिचही विश्व साम्य असतं

विणलं मन मनाशी तर,
नात्याचं जाळं पसरणारचं
जिथे प्रेमाचा उतार असेल
तिथे भावना ह्या घसरणारचं

ज्यांना यातनाची फिकीर असते
ते प्रेम काय खाक करतात
जे दूर बसती किनाऱ्यावर
ते प्रेमाचीच राख करतात

-- सनिल पांगे
एकदा माझ्या परी , मजला जगावे वाटते ;
अन्य ना दुसरे कोणी , मज 'मीच' व्हावे वाटते !
केवढ्याला घेतलास , हा तुझा चेहरा नवा ?
त्याच बाजारामध्ये , मलाही जावे वाटते !!!

- संदीप खरे
प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे,
खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्टा, पद ह्यामागे
धावणारा माणूस फ़ार केविलवाणा वाटतो। -- व. पु. काळे

श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक। म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हणतात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्यांच प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.-- व. पु. काळे

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.-- व. पु. काळे

जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा.हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे
तो कविंचा मान तितुकी पायरी माझी नव्हे

आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो
सम्मानितो हासू तसे या आसवा सम्मानितो

जाणीतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे
नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे?

मानतो देवास ना मानतो ऐसे नव्हे
मानतो इतुकेच की तो आमुचा कोणी नव्हे

आहो असे बेधूद अमुची धुंद ही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी, आम्ही नव्हे......

-- भाऊसाहेब पाटनकर

पत्र -
पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली अशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

सार्थता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे

-- भाऊसाहेब पाटणकर
प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं। हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठिकाणीच जाऊ शकतं.

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

नजर आणि स्पर्श, प्रेमाची ही भावना इतकी सर्व श्रेष्ट भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'

समाज तप्त सुर्यासारखा असतो. आगीचा कितीही वर्षाव झाला तरीही ती सूर्यफ़ुलं सूर्याकडेच पाहत राहतात. तोंड फ़िरवीत नाहीत. माझ्यासारख्या निराधार बाईकडे समाज असाच बघत असतो. सूर्यासारखा रोखून. अशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत रहायचं हे मला सूर्यफ़ुलांनी शिकवलं.----

-----व. पु. काळे
प्रिय आईस

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहीलं नव्हतं तरी
नऊ महीने श्वास स्वर्गात घेतला
-- सनिल पांगे
पहाटवारा मला माझी म्हणतो
अंतरीचे गूज प्रेमाने सांगतो

दव भरली पाती मला खुणावतात
माझ्याकडे बघून निर्व्याज हसतात

पाण्यात नाचणारी चिमणी घेते गिरकी
हसते मिष्कील घेते फिरकी

संथ वाहणारा गंभीर ढग,गरजतो
आणि अलवार,अलगद सर्वांगावर बरसतो

चिंब भिजलेली फुलं आणखी गहिरी होतात
ये ना,आमच्यात भिजायला..कल्ला करतात

पाणी निपटत, निथळत माड भेटतात
तू आमचीच आहेस असं सांगायला आणखी वाकतात

प्राजक्त आसुसलेला , मला भेटायला
मी दिसतात लक्ष फुलांची पखरण करायला

माणसांचचं असं का होतं कळतं नाही,
आप-पराचा गुंता का होतो, जो सुटत नाही ?

कवयित्री- नेहा आठवले

Monday, December 10, 2007

सुर यास बावरत्या श्वासांचे
भाव यात सावरत्या नजरेचे
तुला शब्दात उतविणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..

साज यात थरथरत्या तणांचे
आठवांत उमलत्या नव्या क्षणांचे
गंध होऊनी दरवळणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..

कातरातल्या को-या क्षितीजावरी
चितारते हे अमुर्त शैली
सप्तस्वरांनी दिशा रंगविणारे
गीत तुझे नि शब्द माझे..

स्वर याचा ओठावरी झुलतो
नाद याचा हृदयी रुणझुणतो
नसानसांतुन भिनणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..

सप्तसुरांची ही माळ अचानक सुटली
पहीलीच ओळ आज कंठी रुतली
या कोरड्या ओठी अडखळणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..

सुर हरवले तुझ्याविन आता
गुंजतात नुसते शब्द दिवाने
सुन्या मैफ़ीलीत घुमणारे हे
गीत तुझे नि शब्द माझे..

-- सचिन काकडे
सांता क्लॉज

नाताळ मधे खुप मजा असायची
रात्री मोजा लावायाचो
अन सकाळी उठल्यावर मज्जाच मज्जा
सांता चॉकलेट्स,खाउ, खेळणी द्यायचा
खुप मजा यायची,
मग बाबांना विचारायाचो.....
बाबा सांगाना, कुणी दिला हा खाऊ? खेळणी?
सांता आला होता, तुला आवडतात म्हणुन दिलि.....बाबा
मग मला का नाहि जाग केले?.....
सांता म्हणाला त्याला झोपु द्या...बाबा म्हणाले.
सांता कधिच भेटला नाहि
एका नाताळला मोजा लावला
अन हसत बसलो...
काय रे लबाडा का हसतोस? बाबा..
बाबा मला सांताची गंमत कळाली आहे..
सांता बिंता काही नसतो..
बाबा च खाउ,खेळणी आणुन ठेवत असतात..हसत म्हणालो
चला आमचा बाळ मोठा झाला..बाबा हसत म्हणालें
मी बाबाकडें बघतच राहिलो.???
"अरे ज्या दिवशी तुम्हाला कळत ना
कि सांता बिंता काही नसतो.
त्या दिवसा पासुन तुमच बाल्य संपलेल असत"
बाबा हसत म्हणाले...

अविनाश.....