आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, October 27, 2007

एकदा हास तु, एकदा हास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ध्रु ||

ऐक आतातरी पुस ही आसवे
बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे
का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु || १ ||

वेदनेला कुणी हाक मारु नये,
भेटलेल्या सुखा दुर सारु नये,
विसर ही काळजी विसरुनी आभास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || २ ||

एकटे मी तुला आठवावे किती,
गीत वेडे तुझे गुणगुणावे किती,
दे जरासा तुझा मधुर सहवास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु || ३ ||

-- सुरेश भट

Friday, October 26, 2007

जेव्हा तु स्वप्नात
अशी गोड हसतेस
झाल गेलं सगळं
पुर्ण विसरायला लावतेस

मग मी ही वेडयासारखा
तुझ्या आठवणींच्या मागे धावतो
स्वप्नातुन जागा झालो
की दचकुन अंथरुणात उठतो

हा असा भावनांचा पोरखेळ
वाटतं कधीच संपणार नाही
कदाचीत,
तुला विसरायचे गणित
मला कधीच जमणार नाही....

--श्रीकांत लव्हटे
खरंच कळत नाही आता मला
तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं
का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं

खरंच कळत नाही आता मला
मी असा कसा वागलो
सगळ्यांना सांगता सांगता
मीच एकतर्फी प्रेमात पडलो....
--श्रीकांत लव्हटे

नेहमी हे असेच होते
वेळ निघुन गेल्यावर
मन भानावर येते
बोलायचे तेव्हा बोलणे होत नाही
नी ती गेल्यावर डोळ्यात रडू येते.....
--श्रीकांत लव्हटे

Thursday, October 25, 2007

जवळिकी पेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच अधिक घट्ट करतो
-- शुभा

मी रोज खिडकीत उभी असते
तु येतोस का ते पाहण्या साठी
ये ना कधी तरी असाच
माझं मन राखण्या साठी
-- शुभा

विरहात नेहमी असे का होते
एक व्यक्ती सहज निघून जाते
दुसरी मात्र आठवणींमध्ये
तिलाच शोधत राहते.....
--श्रीकांत लव्हटे

विरहाचे दोन क्षण कधी
तु ही अनुभवून बघ
कधीतरी कातरवेळी तु ही
मला आठवून बघ

कदाचीत तुला समजुन येईल
विरहाचे दु:ख काय असते
प्रिय व्यक्तिच्या जाण्याणे
मनात काय खळबळ माजते...
--श्रीकांत लव्हटे

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

कवी: अद्न्यात

जवळ माझ्या नसलीस तरी...
सहवास मला तुझा आहे...
एकल्या ह्या जिवाला....
साथ फक्त तुझीच आहे....

संध्याकाळच्या वारया सोबत...
मी तुझाच गंध अनुभवत असतो..
व्याकुळ करते तुझी आठवण..
अन श्वास घेणेही मी बंद करतो...

उघड्या डोळ्यांसमोर माझ्या...
तुझ्या आठवणींच पडदा पडतो....
जगाचा विसर पडतो मला...
असा तुझ्यात मी गुंततो

तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण...
माझ्या हृदयातुन पाझरतो...
अन विरह दु:खाने मग...
तोच गालावर ओघळतो.....

ही ओढ कसली लागली मला...
हे मला न उमजे....
सांग सये यालाच का...
प्रेम म्हणतात सारे...?

कवी: अद्न्यात
'असा तू' म्हणालास म्हणून..

लावून घेतले बरेच छंद,

'तसा तू' म्हणालास म्हणून..

बदलला नेलपॉलीशचाही रंग,

'असा तू' म्हणालास म्हणून..

संसारात मी झाले दंग,

'तसा तू' म्हणालास म्हणून..

वाट पाहणेही केले बंद...!!

-- प्रज्ञा प्रधान...

Wednesday, October 24, 2007

प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?

बोलायचे तर दोघंानाही आहे,
पण शब्द कोण देणार..?

भेटायचे तर दोघंानाही आहे,
पण वेळ कोण देणार..?

प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही,
पण पहल कोण घेणार..?

स्पर्श तर दोघंानाही हवा आहे,
पण हींमत कोण देणार..?

तोडायचेत पाश बंधनाचे,
पण साथ कोण देणार..?

सोबत तर हवी आहे जन्माची,
पण हात कोण देणार..?

प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार॥?

कवी: अद्न्यात
मार्ग माझे खुंटलेले
दिशा तु होशील का?

स्पर्श माझे वाळलेले
चेतना तु होशील का?

डॊळे माझे भरुनी आले
फक्त अश्रु तु होशील का?

ह्रिदय माझे थांबलेले
स्पंदने तु तयाची होशील का?

बिंब माझे विस्कटलेले
प्रतिबिंब तु माझे होशील का?

सुर माझे हरवलेले
जिवन गाणे माझे तु गाशील का?

एकटाच आहे मी
मज साथ तु देशील का ?

गुलाब माझा सुकलेला
तरिही सुंगध तु त्याच होशील का?

सांग प्रिये सांग तु होशील का
ह्या वेड्याजिवाला आपलसं करशील का?

आता खरोखरी शब्द माझे संपलेले
म्हणूनी माझी कविता तरी तु होशील का?

कवी: अद्न्यात
तुझ्या कल्पनेच्या नदिच्या काठावर
त्रास होतो नुसतचं बसून राहण्याचा
प्रत्यकक्षात तो आनंद देशील का ग
तुझ्या प्रेमात नि:स्वार्थपणे वाहण्याचा

विरह ओळी...

कोण म्हणते ती निघून गेली?
बस थोड्या वेळाचा एकांत आहे...
दुराव्याची थोडीशी खंत आहे
पण मला माहीत आहे...
या आभासाचाही लवकरच अंत आहे!!!

आणि विडंबन चारोळी...

कोण म्हणते ती निघून गेली?
अरे तो तर एक नुसता आभास आहे...
मी लाख जा म्हणतो, मी लाख जा म्हणतो
पण ती जात नाही हाच तर त्रास आहे...

तु आहेस म्हणुन
आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मी
माणुस असल्याचं भान आहे

तशी माझी किंम्मत शुन्यचं
होतो मी ही जाणुन.
आता मलाही अर्थ आहे
तु आहेस म्हणुन.......

आपल्या दोघांमधील शर्यत
नेहमी बरोबरीतच सोडवायचिस
मी तुला हरवणार नव्हतोच
आणि तुही नाही जिंकायचिस्

फ़क्त एकच 'स्वास',..
माझ्या नवाचा घे,
वाटल्यास लगेच् सोड,
पण काळजापर्यन्त ने....

आपल्या दोघांच्या नात्यात
बरच काहि खास आहे
तरी ही आपल्याला जोडनारी
शब्दांची आस आहे...


कुणाची तू पोर
करुन शृंगार
करितसे वार
नयनांचे

साडी भरजरी
डोईवर चरी
देतसे लचक
कमरेला

स्वर्गाची अप्सरा
मदनाचा वारा
लावण्याचा झरा
वाहतसे

मनात भरली
क्षणात ठरली
एक तुच परी
लावण्याची

देह गोरा पान
रुपाची तू खाण
हरवले भान
तुजठायी

काय तुझे नाव
कुठे तुझा गाव
घेतला तू ठाव
काळजाचा

--संदीप सुरळे
हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

-- वेदश्री
मी स्वतः सुद्धा करत नाही,
एवढा माझा विचार तुझं मन करतं
सांग ना मने,
हे सारं तुला कसं जमतं?

शक्य नसून सुद्धा,तुझं मन
आपलं नातं नव्याने जुळवतं
सांग ना मने,
हे सारं तुला कसं जमतं?

दुःखाच्या डोंगरामागून
नेहमीच चेहऱ्यावर हसू आणणं,
माझ्यावरील प्रेमाला
आयुश्यभर कुरवाळणं
सांग ना मने
हे सारं तुला कसं जमतं?

माझं मन मला नेहमी खातं
तुझं न होउ दिल्यामुळे रुसून बसतं
तुझं मनं मात्र याला आपलं मानतं
एक सांगशील का मने?????
हे सारं तुला कसं जमतं??????

-- नचि
एकलेपणात
मन गाई गाणे
कुणाचेच नाही
मज घेणे देणे.

तरी पुन्हा पुन्हा
घेरते निराशा
कुणी तरी यावे
मन करी आशा.

एकलेपणात
थांबू पाही श्वास
जितेपणी होतो
मरणाचा भास

रित्या घागरीत
घोंघावतो वारा
उदास एकाकी
आसमंत सारा....!

-- अमोल शिरसाट
जगाव असे की
मरताना प्रत्येक हृदयाने साद द्यावी
नेता नेता मरणानेही आपल्या
जीवाला दाद द्यावी......

सहन मी एकट्यानेच केलं
तुझी सोबत जरी नसली
मन बिचांर एकटच जळांल
तुझी आठवण जेव्हा जेव्हा पेटुन उठली

पडणारा पाऊस
किती नकोसा आहे...
सर्वांगावर पडूनही,
मी मात्र कोरडीच आहे...!

दु:ख पराभवाचं नसतं.... फसवणुक करुन पराभव गळयात मारला जातो, त्याचं दु:ख होतं .
कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.

जपले मनातल्या मनात चांदणे
हृदयात चंद्र काळजात चांदणे
होतो चकोर जीव, बोलताच तू
झरते तुझ्या स्वरास्वरात चांदणे

आहे सभोवताल वाळवंट... पण
झळ लागते न ज्या घरात चांदणे

मी पाहिले तुला, न व्यर्थ भास हा
आले भरात, भर उन्हात चांदणे

कोजागिरी जणू मधाळ पत्र हे
मजकूर चंद्र,अक्षरात चांदणे

नाहीत अक्षता,नकोत मंत्र ही
सजल्यात तारका,वरात चांदणे

बघताच तू हसून, रात्र झगमगे
उजळे तुझ्याच चांदण्यात चांदणे

-- प्रमोद बेजकर
खुप भांडु नये..त्यातुन प्रतिपक्षाला तुमच्या लढण्याची पध्द्त समजत जाते
तुझ्या कुशीत शिरुन,

खूप रडावसं वाटतं...

तुझा हात धरुन,

खूप हसावसं वटतं...

तुझ्या श्वासात मिसळून,

विरघळवसं वाटतं...

साऱ्यांपासून दूर,

तुझ्या हृदयात रहावस वाटतं...

तुझ्यावीना जीवन,

संपवावस वाटतं...!

-- प्रज्ञा प्रधान

Tuesday, October 23, 2007

आयुष्यातला एखादा अनुभव भरजरी पैठणी सारखा असतो. कधीतरी एकदाच घेता येण्यासारखा. त्या विलक्षण अनुभवाची अलगद घडी घालून मनाच्या संदुकीत ठेवून द्यावी. विशेष प्रसंगीच कधीतरी ती पैठणी अंगभर लेऊन घ्यावी...... पैठणी चारचोघांमधे मिरवता येते पण अनुभवाची घडी मात्र एकंतातच मोडता येते.....
तुला विचारायचे प्रश्न,
मनात खूप मस्ती करतात...
तू समोर आलास की,
हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवतात...

-- प्रज्ञा प्रधान

Monday, October 22, 2007

कोणी गेलं म्हणुन आपण
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,

जगायचा असतो प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.

आठवणींच्या वाटांवरुन
आपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,

आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधी
त्याला खाली खेचायचं असतं.

कसं ही असलं आयुष्यं आपलं
मनापासुन जगायचं असतं,

कोणी गेलं म्हणुन उगाच
आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.

दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेल
त्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं,

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं

कवी: अद्न्यात
या सुंदर जीवनात कधी कधी..
पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..
पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी
अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी
नंतर "जागली होतिस का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..
हात तिचा चोरुन कधी कधी
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी कधी
असते रागवायचे लटकेच
"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी

विरहात तीच्या ...
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..
पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

कवी: अद्न्यात
वार्यावर उडणारी बटं सावरताना
खुप छान दिसायचीस तु,
तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन
खुप छान हसायचीस तु.
नेहमीच मला माझ्या अवतीभोवती
खरच छान भासायची तु,
मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग
आल्यावर,कुठेच नसायची तु..
माझ्यावरच हसुन झाल्यावर" माझे"
पुन्हा मला दिसायची तु,
मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु...

कवी: अद्न्यात