आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, November 13, 2008

ऑनलाइन



तुझं सांभाळुन बोलणं
मर्याद्शील वागणं
किति राग आला तरि
मुळिच नाहि तोडणं

तुझि प्रत्येक गोष्ट
मला भुलवत गेलि
अशि तुझि माझि
मैत्रि खास झालि

मग सुरु झाले
वाट बघायचे तास
ऑनलाइन नाहिस म्ह् णुन
डोक्याला त्रास

मग तुझा मेसेज
जरा बिझि आहे मि
पण विसरु नकोस
"यु आर स्पे शल फॉर मि"

आपले वेगळे देश
वेगळ्या आहेत वेळा
"बट आय लाइक यु"
सांगु किति वेळा?

दोन मैत्रिचि कार्डं
त्यात लिहिणं "डिअर"
रडका स्मायलि टाकला
कि म्हणे "आय केअर"

सोडुनच दिलय मिहि
मेसेंजर वर जाणं
पण मिस्ड कॉल येतो का
मोबाइल वर पहाणं


स्वतःवर प्रेम करणं


एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. …….
तुम्ही स्वतःच्या कधी प्रेमात पडला आहात? स्वतःच स्वतःला खूप आवडला आहात? विचित्र वाटतोय प्रश्‍न, की असा कधी विचारच आला नाही मनात?

हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नाहीए. साधा सरळ विचार आहे. आपण आपल्याला आवडणे यासारखी सुंदर गोष्ट नाही. आपण नेहमीच इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांविषयी बोलत असतो, पण आपलं आपल्याशीही काही नातं असतं, याचा अनेकदा विचारच करत नाही. आपण आपल्यालाच काही देणं असतो. आपलं आपल्याशीच काही मागणं असतं. कधी मनाच्या या आवाजाचा विचार केला आहे? इथे आतला आवाज (सोनिया गांधी आठवल्या असतील) म्हणजे आपली विवेकबुद्धी अपेक्षित नाही. तो तर मनाचा एक वेगळाच कप्पा आहे… आपल्याला अंतर्बाह्य सच्चा ठेवणारा. हा आवाज आहे आपल्याला आनंददायी जगणं शिकवणारा. आपल्याला आपल्यावरच प्रेम करायला शिकवणारा. कारण एकदा का तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडलात, की जगणंही सुंदर होऊन जातं.

स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आत्मकेंद्री, स्वार्थी प्रेम नव्हे, तर ते आहे आपल्यातली अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं. एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. कारण आपल्याला जग होकारार्थी भासू लागतं. जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आहे तशी घडू लागते. कामात आपण जादा ऍक्‍टिव्ह होतो. मग त्याच्याशी जे जे संबंधित असतात ते खूष. समोरचे खूष की आपण खूष. विन विन सिच्युएशन!

म्हणूनच म्हटलं, तुम्ही कधी स्वतःच्या प्रेमात पडला आहात? नसलं तर पडून बघा. हे प्रेम म्हणजे काय, तर आपण आपल्यावर खूष असणं. तुम्ही कधी तुम्हा स्वतःला गिफ्ट दिलं आहे? म्हणजे कपडे, बॅगा, इतर गरजेच्या वस्तू या आपण गरजेच्या वस्तू म्हणून घेत असतो किंवा आवडलं म्हणून घेत असतो. (पैसे आहेत ते कुठे संपवायचे, म्हणूनही अनेक जण घेत असतील) पण एखादी ठरवलेली गोष्ट केली, किंवा बराच काळ रेंगाळलेलं, रखडलेलं काम पुढाकार घेऊन पूर्ण केलं म्हणून खूष होऊन स्वतःला बक्षीस देऊ केलंय? देऊन बघा. इथं फक्त एखादी वस्तू स्वतःला प्रेझेंट करण्यापर्यंत, किंवा आवडती खायची वस्तू घेण्यापुरतंच हे मर्यादित नाही. तर मनाला आवडेल ती गोष्ट करायची. कोणाला जर संपूर्ण दिवस लोळत काढायचा असेल तर यथेच्छ काढावा (इथं स्वतःचं घर हवं किंवा घरातल्यांना ही गोष्ट पटवून द्यायला हवी. सॉरी!) पण उलटंही आहे बरं! एखादी गोष्ट नाही घडली मनासारखी तर खूप वेदना होतात. अशा वेळी लोकांच्या भिडेस्तव दुःख मनाशी दाबून टाकतो. नकोच करायला असं. मनाचं ऐकायचं, मनसोक्त रडून घ्यायचं. मन स्वच्छ होऊन जाईल. मोकळं मोकळं!

आयटीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना "तरुणांचा" लेखक चेतन भगत यानेही याचाच वेगळ्या शब्दांत उल्लेख केला आहे. त्याने या भावनेला तुमच्यातला स्पार्क जिवंत ठेवणं, असं म्हटलं आहे. हा स्पार्क जिवंत असला की तुम्ही भरभरून जगू शकता. एकदा का तो स्पार्क धूसर झाला, की जगणं साचलेलं डबकं होऊन जातं. म्हणूनच हा स्पार्क कायम ठेवण्यासाठी त्याने अपेक्षाभंग, नैराश्‍य आणि एकटेपणा या बाबी आयुष्यातून काढून टाकायला हव्यात, असं सांगितलं आहे. यात एक उदाहरण देताना त्यानं लिहिलंय, "मी नाही ऐश्‍वर्या रायसारखा सुंदर, पण म्हणून काय झालं! माझी दोन मुलं तिच्यापेक्षा सुंदर आहेत!' चेतनचा हा दृष्टिकोन, आणि अर्थातच त्यामागची भावना म्हणजेच स्वतःवर प्रेम करणं

Tuesday, October 28, 2008

बालभारती- लेझिम चाले जोरात


दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे

बालभारती -गवतफुला


रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

- इंदिरा संत

बालभारती- टप टप टाकित टापा


टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके

बालभारती, -फुलपांखरूं


फुलपांखरूं !
छान किती दिसतें फुलपाखरूं

या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसतें फुलपांखरूं

पंख चिमुकलें निळेजांभळे
हालवुनी झुलतें फुलपांखरूं

डोळे बरिक करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते फुलपांखरूं

मी धरुं जाता येई हाता
दूरच तें उडते फुलपांखरूं

- ..पाटील

गणित

अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......


कशाची आठवण ठेवायचीये
कुठली गोष्ट विसरायचीये
कोणाला मनातलं सांगायचाय
कोणापासुन सगळ लपवायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......


कधी आवाज द्यायचा
कधी निशब्द व्हायचय
कधी रडता रडता हसणं
तर कधी हसता हसता रडणं
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......


कुठे मार्ग बदलायचाय
कुठुन आल्यापावली परतायचय
अवघड आहे एखादा निर्णय घेणं......
जिवनाचे गणित सहजपणे सोडवणं......

कवि: अद्न्यात

Monday, October 27, 2008

बालभारती- मन

मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

- बहीणाबाई चौधरी

बालभारती - श्रवाण मासि

मित्रांनो, लहानपणी जर का आपण शाळेत गेला असाल तर आपल्याला बालभारतीचं पुस्तक आठवत असेल. त्यातिल काहि निवडक आणि खुप रुचकर कविता येथे आनंदक्षणवर देत आहे... दिवाळीचा फराळ समझा हवं तर.... ;-)


श्रवाण मासि



श्रवाण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


- बालकवी

Wednesday, October 15, 2008

आजोबा

नेटवर वाचनात आलेली एक मस्त कविता ...

जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या कवित भकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"

मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

कवि: मंगेश पाडगावकर
काव्यसंग्रह: बोलगाणी

आलास का पुन्हा तू?

एक गजल

आलास का पुन्हा तू? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.

रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.

शोधू कुठे तुला मी? रे काळजात माझ्या,
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.

दे लाघवी अश्रूच, दिलखुलास मागणे हे,
हा हास्य मुखवट्यांचा, झाला सुकाळ आहे.

आता चर्चा कशाला? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.

पूरे तुझे उसासे,या स्वप्निल पापण्या ही,
ढळली निशा पहाटे, झाली सकाळ आहे.

ये तू अता विठ्ठ्ला, तूझीच ओढ मजला,
वारीत माणसांचा, पडला दुष्काळ आहे.

वृत्त: आनंदकंद
कवयत्री : निशा

तुला पाहुनी

तुला पाहुनी ... (नज़्म)

तुला पाहुनी जीव सांडतो
कळत नकळतच ...
तुला पाहुनि श्वास थाम्बतो
कळत नकळतच ...

मनात उठते उधाण वारे
पुन्हा एकदा...
अन् पाउस जातो शिंपून अत्तर
कळत नकळतच


-- महेश घाटपांडे

Friday, October 10, 2008

ढग

लहानपणी माईला असंच एकदा विचारलं ,

माई ते ऊंच तिकडं आकाशात -

काळं-पांढर कापसासारखं काय उडतंय ?

माई म्हणाली ते ढग आहेत

त्यात पाणी असतं .

नंतर एकदा माईच्या डोळ्यात पाणी पाहून-

मी विचारलं ,

माई तूझ्या डोळ्यात -

काळे-पांढरे ढग आहेत ?

माई हसून म्हणाली,

खूप वेळ ऊंच आकाशात पहिलं की -

डोळ्यात ढग जमा होतात !


स्त्रोत: -पत्र

आठवून पाहायचो मी


आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली पापणी

कवि: अद्न्यात

Wednesday, September 03, 2008

देवबाप्पा देवबाप्पा मला मोदक दे ना - अमरीश भिलारे

देवबाप्पा देवबाप्पा मला मोदक दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना

पप्पा गेले ऑफिसात दीदी गेली कोलेजात
दादा तर सिमाबरोबर फिरत असेल पार्कात
घरात आत्ता नाही कोणी एकच मला दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना

अभ्यास असतो खूप नसते कधी सुट्टी
तुही फ़क्त ५ दिवस नंतर करतोस कट्टी
बघ ना जरा माझ्याकडे आत्ताच फक्त दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना

तुझी बाबा खूप मजा सारखे पाहुणे येतात
कोणीतरी काहीतरी सारखा खाऊ देतात
मला सुद्धा त्यातला एकच मोदक दे ना
मम्मी गेली बाजारात तुही हळूच घे ना

-- अमरीश अ. भिलारे

Monday, July 14, 2008

आता पुन्हा पाऊस येणार.... --संदीप खरे

आता पुन्हा पाऊस येणार....

आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..
काय रे देवा.....

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्...,
मग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्....
काय रे देवा.....

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्....,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्...,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा.....

पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....
काय रे देवा.....

पाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्शीही पडणार्....
काय रे देवा.....
-- संदीप खरे

Tuesday, July 08, 2008

माझी पापणी सांगते - संदीप खरे

माझी पापणी सांगते
गोड स्वप्नांची कहाणी
माझ्या ओठांशी खेळती
शब्द शब्दांतून गाणी

झुंजु मुंजु माझे हसू
सदाफ़ुलीची आरास
माझा सुगंध वाटते
कळी मोगर्‍याची वेणी

माझं मन झुळझुळ
झरा मधाळ गोडीचा
थेंब थेंबातून वसे
शिरशिरी झिणझिणी

विनापरांची मी परी
तनु माझि जलपरी
माझ्या तनुला जाळते
खुळे खळाळते पाणी

येशी अवेळीच असा
कसा रुसून बसशी
समजवू कसे तुला
तुझी भलती मागणी

-- संदीप खरे

Monday, July 07, 2008

वेड लागेल नाहीतर काय ! -- संदीप खरे

कसा चंद्र! कसं वय !
कसा चंद्र! कसं वय !
कशी तुझी चांदण सय !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

अंगामध्ये भिनत्येय वीज !
नाही जाग,नाही नीज !
दंव पडतंय शब्दांवर,
धुकं येतंय अर्थावर !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

उभा आहे मस्त खुशाल !
अंगावर थंडीची शाल !
गुलाब तिच्या गालांवर,
काटा माझ्या अंगावर !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

कशी मजा झाल्येय आज
शांततेची सुद्धा गाज !
फुटतंय सरं आतल्याआत !
जंतरमंतर झाल्येय रात !!
कसा निघेल इथुन पाय?
वेड लागेल नाहीतर काय !

कशी झुळूक हलकीशी...!
कशी हवा सलगीची...!
कसा गंध वार्यावर !
राहील मन थार्यावर ?!
कसा निघेल इथुन पाय?
वेड लागेल नाहीतर काय !

रात्र बोलत्येय तार्याशी;
पहाट उभी दाराशी !
गूज आलंय ओठांशी
पण बोलावं तरी कोणाशी...?
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

चंद्र असा झरझरतोय...
अबोलाही दरवळतोय...
मला आलाय अर्थ नवा;
तिला ऐकु जायला हवा !!
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

-- संदीप खरे

सुपरमँन -- संदीप खरे

या कवितेचा विशेष म्हणजे तीन कडवी तीन वेगवेगळ्या रसांमधली आहेत
‍ (वीर रस, करूण रस व भक्ती रस)

सुपरमँन सुपरमँन सुपरमँन
वरतून चड्डी आतून पँट

अंगामध्ये ताकद फार, पोलादाची जणू पहार
पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो
उडण्याचाही भलता वेग, पँरीस पनवेल सेकंद एक
रोज पृथ्वीला चकरा पाच, गेला म्हणता हा आलाच
गरुडाहूनही थेट नजर, जिथे संकटे तिथे हजर
कोसळती बस हा अडवी, फुंकरीत वणवा विझवी
अंतराळीचे व्हिलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी
अवघी दुनिया त्याची फँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन

जरी जगाहून भिन्न असे, तरी मनातून खिन्न असे
आदर करती सर्व जरी परी न कोणी मित्र तरी
लांबून कौतुक हे नुसते, कुणी न मजला हे पुसते
जेवण झाले काय तुझे, काय गड्या हे हाल तुझे
दिवस रात्र हे तू दमशी, सांग तरी मग कधी निजशी
उडता उडता असे सुसाट, दुखते का रे मधेच पाठ
एकएकटे फिरताना, विचार करतो उडताना
आत रिकामे का वाटे, कसे वाटते सर्व थिटे
अंगी ताकद जरी अफाट, काय नेमके सलते आत
करुन बसला तोंड लहाऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन

असा एकदा एक दिशी उंच हिमाच्या शिखराशी
बसला असता लावून ध्यान त्यास भेटला मग हनुमान
काय तयाचे रूप दिसे सुर्याचे प्रतिबिंब जसे
शक्ती ही अन् युक्ती ही, तरी अंतरी भक्ती ही
आणि बोलले मग हनुमान....
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
रोनी सी ये सूरत क्यूँ? मित्रा I am proud of you!!
सर्वाहून आगळाच तू, जैसा मी रे तैसा तू
ऐक एवढे ते अवधान, शक्ती युक्ती चे हे वरदान
त्या रामाने दिले तुला, त्याने बनवले तुला मला
त्या रामास्तव करणे काम, त्या रामास्तव गळू दे घाम
साथ जरी ना कुणी असे, आत तुझ्या पण राम असे
राम राम हे म्हणत रहा, आणि जगाला भिडत रहा
त्या रामाचे करूनी ध्यान, चिरंजीव भव सुपरमँऽऽऽऽऽन
चिरंजीव भव ...सुपरमँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान
-- संदीप खरे

वेड लागलं -- संदीप खरे


दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रण रण माळावर घालतो मी पिंगा
चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
रोज राती दारातून कवितांचे सडे माझ्या वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
वेड लागलं आता वेड लागलं आता वेड लागलं

हिरव्याशा पदराचे हलताना पान
कोण नभ कोण धरा झाडा नाही भान
जशी काही पाखराला दिसे दूर वीज
तिला म्हणे येना माझ्या घरट्यात नीज आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं

पुनवेची रात अशी येताना भरात
घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
पाहतो मी बोलतो मी चालतो मी असा
वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

खुळावले घरदार खुळावला वंश
मीच केले जागोजाग देहावर दंश
उसळली अगं अशी झणाणली काया
जीव असा खुळा त्याला विषाचीच माया आता वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं
आता वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
डोळ्यातून दिसू लागे वेडसर झाक
नका लागू नादी सारी उपराटी तऱ्हा
शहाण्याच्या समाधीला शेवटचा चिरा..हां वेड लागलं
वेड लागलं, हां वेड लागलं, वेड लागलं, आता वेड लागलं
-- संदीप खरे

तुझ्या माझ्यासवे... -- संदीप खरे


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही

कशी भर पावसात आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही
-- संदीप खरे

स्वर टिपेचा... -- संदीप खरे


स्वर टिपेचा आज वेचा ! रे उद्या, फुटणार काचा !
जायचे जातील ! पाहू सोहळा ; उरतील त्यांचा !

विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या.
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा !

देहही नव्हता तपस्वी , जीवही नव्हता कलंदर...
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा...

संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी,
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर ; पावसाचा !!!

-- संदीप खरे

रात्र सुंदर, चंद्र सुंदर -- संदिप खरे

रात्र सुंदर, चंद्र सुंदर
रात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर

हे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी
रात्र थकल्या काफिल्यापरी उतरणीवर चहूदिशांशी
हे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

शांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर
चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर
या तुझ्या अनिवार सईचे जीवघेणे सत्र सुंदर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

रात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे
निरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे
रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

- संदिप खरे

हरकत नाही... -- संदीप खरे

हरकत नाही...
"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

-- संदीप खरे

चौथी भिंत... - संदीप खरे

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ’चंचल असतात !’
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ’का?’ ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

-- संदीप

बुंबुंबा -- संदीप खरे


आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

ह्रीं ह्रां ह्रीं फट् ॐ फट् स्वाहा
कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
त्यास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा
-- संदीप खरे

डोंगळ्याचं जीणं .. - संदीप खरे


"तुझ्याकडे तर दिसत नाही एखादीही डिग्री..."
पारावरच्या डोंगळ्याला मी विचारले -
"...आणि तरीही चांगला गलेलठ्ठ जगतो आहेस..."

तो थबकला
कसनुसं म्हणाला -
"छे ! आमचं कसलं आलंय...डोंगळ्याचं जीणं !"

"नाहीतरी काय एवढा फरक आहे ?"
मी म्हणालो...
आणि डोंगळ्यासारखा तुरूतुरू पुढे निघालो......

-- संदीप

दोघे...नकळते... - संदीप खरे

दोघे...नकळते...
...ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ’तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...’
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ’कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !’
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

-- संदीप

धैर्य - संदीप खरे


जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......


जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सद्ध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सद्ध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापर्या कापर्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

-- संदीप खरे

एवढंच ना? - संदीप खरे


[ आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते. ]

एवढंच ना? एकटे जगू.. एवढंच ना?
आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,
एवढंच ना?

रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू!
एवढंच ना?

अंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,
घराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,
एवढंच ना?

आलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
एवढंच ना?

मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार
मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना?
-- संदीप खरे

सफरचंद - संदीप खरे


सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
-- संदीप खरे

मैत्रिण - संदीप खरे


मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

-- संदीप खरे

प्रिये ये निघोनी

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली... तनाच्या... मनाच्या
नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या...

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास
उरा - अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा... किंवा तो ही भास!!!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत : शी तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा

अल्बम : सांग सख्या रे
गाणे : प्रिये ये निघोनी
गायक : सलिल कुलकर्णी
कविता : संदीप खरे

तू -- संदीप खरे

तू

गौरगुलाबी चर्येवर
लालकेसरी टिकली टेकलेली...

लालचुटुक ओठांत
गडद गुलाबी गुपिते मिटलेली....

लालगुलाबी वस्त्रांत
सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...
मंद गुलाबी गंधाची
एक देहकुपी लवंडलेली...

सभोवताल्यांशी राखलेलं
एक फिकटं गुलाबी अंतर...

तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;
तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

-- संदीप खरे

मी फसलो म्हणूनी... -- संदीप खरे

मी फसलो म्हणूनी...

संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

-- संदीप खरे

तुटले -- संदीप खरे

तुटले

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

-- संदीप खरे

लागते अनाम ओढ श्वासाना


लागते अनाम ओढ श्वासाना .... अद्न्यात अश्या काही ओळी

लागते अनाम ओढ श्वासाना, येत असे उगाच कंप ओठांना, होई का असे तुलाच स्मरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा..
शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा!

एकांती वाजतात पैजणे, भासांची हालतात कंकणे, कासावीस आसपास बघताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद..
नको म्हणून गेलीस, तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद!

मी असा जरी नीजेस पारखा, रात्रीला टाळतोच सारखा, स्वप्न जागती उगाच निजताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन...
शब्दच नव्हे, मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कोठून?

आज काल माझाही नसतो मी, सर्वातुन एकटाच असतो मी, एकटेच दूर दूर फ़िरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

आयुष्यावर बोलू काही


आयुष्यावर बोलू काही या कवितेमधील सीडी मध्ये नसलेली काही कडवी...

कुणीच नाही बोलायाला त्याच्यासाठी
झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही...

खर्ज बोलतो मनात ठेवून तार तमाशा
'मध्या'मध्ये ठेवूनिया स्वर बोलू काही...

रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

जग बदलाची कशास करता इतुकी घाई
आधी बदलू स्वतःस नंतर बोलू काही...

गल्ली मध्ये बोलायाचे कारण नाही
आयुष्याच्या हमरस्त्यावर बोलू काही...

तुमच्या संगे आज मलाही म्हणूदे गाणे
मिटवून सारे मधले अंतर बोलू काही...

(The following two are most likely not by sandeep...)

स्पर्श जरी हे खरे बोलके असती तरीही
करून मौनाचे भाषांतर बोलू काही...

आभाळातून टपटपणारा थेंब टपोरा
मातीचा दरवळ सुटताना बोलू काही...

करार - संदीप खरे


चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !
विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !
खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !
लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !
नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !
जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !
समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !
भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !
तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !
' करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

दूरदेशी गेला बाबा.-- संदीप खरे


दूरदेशी गेला बाबा... गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
' आता पुरे ! झोप सोन्या..' कुणी म्हणतच नाही !! !!

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही...कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून ... परि खेळगडी नाही !! !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी - मुठीमध्ये बोट नाही !! !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही
दूरदेशी गेला बाबा......

-- संदीप खरे

लागते अनाम ओढ श्वासाना - संदीप खरे


लागते अनाम ओढ श्वासाना
येत असे उगाच ओठाना
होई का असे तुलाच स्मरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

एकांती वाजतात पैजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना.....
तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

आज काल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
एकटेच दूर दूर फ़िरताना.....
( तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना तनन धुम तेरेना तेरेना )

-- संदीप खरे

सरीवर सर…- संदीप खरे

सरीवर सर

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर

-- संदीप खरे

मी मोर्चा नेला नाही - संदीप खरे

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

-- संदीप खरे

नामंजूर - संदीप खरे


जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे - फ़ुगवे... भांडणतंटे... लाख कळा
आपला - तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वाहणे - नामंजूर!

-- संदीप खरे

कसे सरतील सये... - संदीप खरे


कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

-- संदीप खरे

हे भलते अवघड असते --संदीप खरे


गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….
-- संदीप खरे

नास्तिक -- संदीप खरे

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

-- संदीप खरे

दाढी काढून पाहिला - संदीप खरे

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला

मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला

चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपत्राना ही कागद रद्धीचा मी शोधला

नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला

लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला

मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला

मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला

भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला

मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

-- संदीप खरे

उत्कट-बित्कट होऊ नये - संदीप खरे

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

-- संदीप खरे

आताशा.. असे हे.. मला काय होते? - संदीप खरे

आताशा.. असे हे.. मला काय होते!!!
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!

कधी दाटु येता , पसारा घनांचा....
कसा सावला रंग , होतो मनाचा...
असे हालते .. आत हलुवार काही...
जसा स्पर्श पाण्यावरी चाँदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यरथ होतो ... दीशांचा पसारा...
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या... मागु जातो कीनारा....

न अंदाज कुठले.. न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही....

कशी ही अवस्था.. कुणाला कलावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे...
कीती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता.. कुणी सावरावे....

आताशा .. असे हे ..मला काय होते ....
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते....
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते...

आताशा असे हे मला काय होते ....
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते.....

संदीप खरे

मी हजार चिंतांनी - संदीप खरे

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो.

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो.

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो.

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो.

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो
-- संदीप खरे

कितीक् हळवे, कितीक् सुंदर - संदीप खरे

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर...
कितीक् हळवे, कितीक् सुंदर...

अवचीत कधी सामोरे यावे...
अन् श्वासांनी थांबून जावे...
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला पाहुनी... दडते-लपते,
आणिक तरीहि... इतूके जपते...
वाटेवरच्या फुलास माझ्या... लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून...
प्रश्न मला जो पडला नाही... त्याचेही तुझ सुचते उत्तर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण...
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मेघ कधी हे भरुन येता,
आबोल आतून घुसमट होता...
झरते तिकडे पाणि टप् टप्... अन् इकडेही शाई झर् झर्...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी... माझ्यासाठी... माझ्यानंतर...
किती शहाणे आपूले अंतर...

- संदिप खरे

एक फोन - संदीप खरे

करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन

फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण

कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !

-- संदीप खरे

नसतेस घरी तू जेव्हा --संदीप खरे

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविण ह्रुदय अडावे
मी तसाच अकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

गीत - संदीप खरे

मेघ नसता वीज नसता - संदीप खरे

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

- संदिप खरे

जरा चुकीचे जरा बरोबर -- संदीप खरे

जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

-- संदीप खरे

दुपार . . . -- संदीप खरे

दुपार . . .

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी
जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी
किती जपून ठेवले गुज ओठावर आले
साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?

दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना
मनातली हुरहुर जशी मनात मावेना
माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना
आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना

आता तरी दे ना दे ना मनातले आवताण
मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान
आता येथोनीच थांब नको मनभर होऊ
माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ

हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा
तुझे आकाश पाण्याचे . . माझा डोळाही पाण्याचा
इथे पाणी तिथे पाणी . . एवढेच ना करणे
उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .

आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन
आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .

- संदिप खरे

हे गंधित वारे फिरणारे -- संदीप खरे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

-संदिप खरे

अजुन तरी रुळ सोडुन -- संदीप खरे

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...
-- संदीप खरे

आठवतं तुला ? - संदीप खरे


आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .


- संदिप खरे

आता उरले ना दिस - संदीप खरे



आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥


--- संदीप खरे

हृदय फेकले - संदीप खरे



हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌

हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌

गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर

मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही


--- संदीप खरे

बॉस - संदिप खरे

... बॉस ...
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

हसलो म्हणजे - संदीप खरे



हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....


- संदीप खरे


नसतेस घरी तू जेव्हा - एक विडंबन



नसतेस घरी तू जेव्हा
जेवणही मीच बनवितो,
पोळ्यांचे होती नकाशे,
भाजीही मी करपवितो.....

नसतेस घरी तू जेव्हा
सर्वत्रच होई पसारा,
धुळ मणामणांची साचे,
कपड्यांचा होई ढिगारा.....

नसतेस घरी तू जेव्हा
बिल लॉंड्रीचे हे येते,
वाणीही लावी तगादा,
पाकीट रिकामे होते....

नसतेस घरी तू जेव्हा
मम इमेज हरवुन जाते,
ऑफिसला जातो तेव्हा,
सर्वत्रच चेष्टा होते.....

नसतेस घरी तू जेव्हा
भांड्यांचा होतो ढीग्,
मी घासत म्हणतो, सारे
नशिबाचे असती भोग.....

नसतेस घरी तू जेव्हा
टी.व्ही.ही मजेत असतो,
नसतात मालिका रडक्या,
मी मला हवे ते बघतो......

नसतेस घरी तू जेव्हा
जग सुनेसुनेसे भासे,
ना ओरडणे ना चिडणे,
घर्-दार सुखावून जाते.....

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हा पोरका होतो,
दरक्षणी तुझ्या असण्याचा
आभास बोलका होतो.....


मूल कविता : संदीप खरे
विडंबन : सुयोग कुलकर्णी

ब्लांक कॉल -- संदीप खरे



हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...()

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...()

नदी नि शेतं नि वार्याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...()

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...()

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...()

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...()

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...()

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...()

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...()

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....


-- संदिप खरे

Wednesday, July 02, 2008

संपलो नाही कधीच


संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतो
विझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतो

तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा
त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.

तुला वाटले माझी राख झाली ती कधीची
धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो

कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो

स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो

तुला जाण नाही आसवाच्या चवेची आजही
तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.

गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी
श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.

तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो

जेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.

नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.

तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो
अगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो.
कवि : अद्न्यात
स्त्रोत: इ-पत्र

Thursday, June 26, 2008

सुख म्हणजे काय नेमक ??



सुख म्हणजे काय नेमक
कसं असत... कुठे भेटत?

बाजारात कुणी विकता का?
शेतात कुठल्या पिकत का ?

कुणालाच कस सापडत नाहि
का कुणातच ते अडकत नाहि?

ते पंख लाउन उडत का?.....
अथवा भूमीमधे दडत का?

कि श्रीमंता घरी ते वसतं ?
मग झोपड्यांत कोण हसत ?

सॆरभॆर कल्पना आणि
गॊंधळलेले प्रश्न....

अस्वस्थ मनाच्या गाभ-यात
कण्हतय कुणीस तिष्ण............

जळमट सारि झाडून
आत डोकावले तेव्हा कळल
मीच माझ्या सुखाला
तळघरात होत डांबल....

अहंकाराच्या दोरांनी
करकचून बांधल ज्याला
तेच सुख ...... ठाउक नव्हत
म्हणूनच कहर झाला....

आता सांगू का जे कळलय मला
हळूच तुमच्य़ा कानात....
कधी कधी तुम्हिहि बघत जा
डोकाउन आपल्या मनात......

कवी - सुमन
स्त्रोत: ओर्कुट

Monday, June 23, 2008

एक भिजरी आठवण



गार गार आला वारा
पानांचीही सर सर
टापोरया थेंबांसवे
पावसाची आली सर

हातावरी सर पडे
आले हळूच शहारुन
पिंजर्यातील मनाला मग
दिले पावसात झोकून

चिंब चिंब झाले तन
काठोकाठ भरे मन
आडोश्याला कुणीतरी
पहातसे चोरून

नजर ती त्याची भिडे
घाबरूनी मी झाली गार
पाहुनी त्याचे खट्याळ हासू
लाज आली मझ फार

नकळत मी त्यास पुसे
ये पावसात चिंब भिझ
कोरड हसुनी तो म्हणे कसा
केव्हाच भिझुनी झाल माझ

शब्द: आनंद काळे
संकल्पना : स्नेहा जैन

Wednesday, June 18, 2008

मालवून टाक दीप


मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग

त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग

दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग

गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग

ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग

काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग

कवि : सुरेश भट


आज सारखं राहून राहून वाटतंय
मन वेडं साथ कुणाची तरी मागतंय...

खिडकीत आलं एक अवखळ पान
कुणाच्या आठवांमधे वारा हा बेभान
अनामिक त्या सुगंधाच्या भासाने
सारं अंग अंग शहारतंय
अन मन वेडं साथ कुणाची तरी साथ मागतंय


-- रेश्मा

Monday, June 16, 2008

चार पावलं

चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्‍त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलन

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस.....
कवी: सुनिल जाधव
स्त्रोत: ई -पत्र

Friday, June 13, 2008

तु



तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे


बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण


पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल


तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर ...


.... कवि - मंगेश पाडगावकर


चांदण्याचे तळे


दिवस उगवतो आणि मावळतो
पण मनाला ते काहीच नको असते
ते बसून राहते तळ्याकाठी
एकटक डोळे लावून
त्या झळमळणा-या पाण्यावर...
त्यात खोल उतरलेल्या तारांगणावर
तहानलेल्या बालहरिणाने
पाण्यावर ओठ टेकून एकभान व्हावे तसे...


कधी ते फक्त चांदण्यांचे तळे असते
कधी सतारीच्या झाल्या’ त बिंदुमालेचे रूप घेते,
कधी कारंजे होऊन रंगतुषार नाचवित राहते
कधी आपल्या चांदण्या मेघावलीतून
शब्द होऊन झिरमिरते...


लाडक्या मनाचा हा छंद
मी फार जपते...


-- इंदिरा संत


Wednesday, June 11, 2008

काही विचार

बापाला दारिद्र्याचा वारसा मुलाला द्यायला आवडत नाही आणि मुलाला बापाकडुन समुपदेश घ्यायला आवडत नाही.
--व.पु.काळे

हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय, शत्रुन्शी लड़ायचे असेल तर त्याच्या तत्वांशी लढा
-- महात्मा गांधी

युध्दात तत्व नव्हे, तलवारी टिकातात व जिन्कतात . राष्ट्राच्या सीमा हया फक्त तलावारीनेच आखता येतात .तत्वान्नी नव्हे .
-- विर सावरकर

दुर्गुणांना अनेक रूपं धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकी ती आकर्षक असतात
--व.पु.काळे

बोलायला कुणी नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं ही शोकांतिका जास्ती भयाण.
--व.पु.काळे

Wednesday, May 28, 2008

थोडंसंच हसा बरे !

मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह विन्या प्रधान एके रात्री आडगावातल्या एकमेव लॉजच्या रिसेप्शन काऊंटरवर उभा होता. शेवटची एसटी चुकली होती आणि रात्र या बकाल लॉजवर काढण्याला पर्याय नव्हता. त्यात समोरचा कारकून सांगत होता, ''साहेब, एकच बेड शिल्लक आहे पण तो आमच्या घाशीराम घोरणेच्या रूममधला. त्याच्या सातमजली घोरण्यामुळे त्या मजल्यावरचे सगळे कस्टमर कम्प्लेंट करतात. त्याच्या खोलीत तुमची व्यवस्था केली, तर तुमची काय अवस्था होईल?''

'' माझी चिंता करू नका. मस्त आरामात झोपेन मी,'' शिट्टी वाजवत विन्या उत्तरला आणि रूमकडे निघालासुद्धा...

... दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम गाढ झोपून फ्रेश झालेला विन्या चहा प्यायला खाली उतरला, तेव्हा चकित होऊन रिसेप्शन क्लर्कने विचारलं, ''साहेब, झोप लागली तुम्हाला? कशी?''

'' एकदम गाढ झोपलो मी,'' विन्या हसत उत्तरला, ''रूममध्ये गेलो तेव्हा तुमचा तो घाशीराम घोरणे नावाला जागून घोरत होताच. मी जाऊन त्याच्या गालाची एक पप्पी घेतली आणि अगदी नाजूक आवाजात म्हणालो, 'गुडनाइट स्वीटहार्ट, छान गाढ झोप हं!' हा हा हा! रात्रभर बिचाऱ्याचा डोळ्याला डोळा नाही लागला, तर घोरणार कुठून!!!!!''

__________________________________________________________________

संता नवीकोरी गाडी घेऊन निघाला होता. दुर्दैवाने वाटेत त्याला गारपिटीने गाठलं. टणटणीत गारांच्या माराने गाडीच्या सर्वांगाला पोचे आले. संता गाडी गॅरेजमध्ये घेऊन गेला. मेकॅनिकला गाडीचा पत्रा सरळ करून द्यायला सांगितलं. त्याला जरा संताची चेष्टा करण्याची लहर आली. तो म्हणाला, ''ओय प्राजी, मी दुरुस्त करेन, पण त्यात १५ दिवस जातील आणि १० हजार रुपयांचा खर्चही येईल. त्यापेक्षा तुम्ही स्वत:च ही गाडी फुकटात का नाही दुरुस्त करत?''

फुकट म्हटल्यावर संता पाघळला, ''कशी काय?'' मेकॅनिकने संताला उपाय सांगितला. संता आनंदाने गाडी घेऊन घरी आला. दोन तासांनी बंता जेव्हा संताच्या घरी पोहोचला, तेव्हा बंता गाडीच्या मागे एक्झॉस्ट पाइपला तोंड लावून हवा फुंकत असलेला दिसला. बंताने विचारलं, हे काय, तेव्हा संता उत्तरला, ''अरे गाडीचे पोचे काढून पत्रा सरळ करायचा उपाय चाललाय हा.''

'' हरे राम,'' कपाळावर हात मारून बंता म्हणाला, ''असा आयुष्यभर फुंकत राहिलास तरी निघतील का पोचे? गाडीच्या काचा कोण बंद करणार?!!!!!''

Wednesday, May 14, 2008

हळवं मन

"काय आवडत तुला माझ्यातल..........??"
तु सारख मला विचारतेस.....
मि काहिच बोलत नाहि
म्हणुन मनातल्या मनात हिरमुसतेस......

तुला रुसलेल बघुन मग
मी अजूनच तुला चिडवतो
आणि तुझ्या चहेय्राकडे बघुन
फ़क्त भुवया उडवतो...........

"तशी ठिक आहेस ग..........
पण सांगण्यासारखं नाहिय काहि
नकट नाक, चिमुकले डोळे
आणि रंगाचा तर पत्ताच नाहि.........."

"तरि आवड्तेस तु मला
काळजी करू नकोस,
आधिच छोट्या ओठांना
आणखिन दाबू नकोस......"

मनभर अस चिड्वून
मी तुझ्याकडे बघितल,
पाठ्मोय्रा तुला हात धरून
माझ्याकडे वळवलं........

नजरेला नजर भिडली फ़क्त
आणि हसू माझे ओसरले,
भावविभोर तुझ्या डोळ्यांतून
झरझर अश्रु ओघळले..........

वेडि आहेस का? म्हणतं
मी जवळ तुला घेतल,
तुझे डोळे पुसता पुसता
स्वत:लाहि आवरलं............

बोलायच बरच होत
पण शब्द्च फ़ूट्त नव्ह्ते
मला बिलगलेली तू
माझे काळिज भिजत होते....

पण आज खर सांगू......
तू सर्वाथाने जिंकलयस मला
लाडके......... तुझं हळवं मन
तुझा गुलाम करतं मला..................

लाडके......... तुझं हळवं मन
तुझा गुलाम करतं मला.........
कवी : अद्न्यात

Tuesday, May 13, 2008

नविन बहर - रेश्मा



जगण्याला माझ्या
अर्थ नवा आला होता
खुंटलेल्या त्या दिशांनी
सुर्य नवा पहिला होता......

कोमेजलेल्या त्या क्षणांचा
बहर असा पहिलाच होता
नकळत फुलले कमळ मनाचे
जणू नवा पल्लव फुटला होता

शुभ्र धूक्यात धुंदलेली
कोमलशी पहाट होती
सप्त सुराने रंगलेली
सांज सावली ही दाट होती

कातरलेल्या त्या क्षणाची
मी ही एक सावली होती
आसवात भिजलेल्या पापण्याची
गोष्ट ती निराळीच होती

खळखळत्या लाटे सारखी
मधुर अशी तुझी हाक होती
त्या हाकेला साद देणारी
ओढ मनाची पाक होती

स्वैर मनाने गुंतलेली
अशीच तुझी साथ होती
कवटाळुन अश्रूंना सजलेली
अशीच माझ्या जीवनाची बाग होती...

-- रेश्मा

हार - सचिन काकडे



लवती बहार आहे, तरीही नकार आहे

दडती श्वास लहरी, मनही फरार आहे

तशीच नजर लपते, नयनी तुला गं जपते
परी मी धुकेच ठरतो, मी आरपार आहे

रुसली नभात रात दिसली दिव्यात बात
जळती वातही ओली, अंधार फार आहे

आभाळ लख्ख वाजे, सखी हळुच लाजे
चांदणे घरात फिरती उघडेच दार आहे

हा कोठला प्रवास? होतो मलाच भास
क्षणीकाचीच स्तब्धता, पुन्हा थरार आहे

मदमत्त लाट येते, पाउल वाट होते
करते उरात घाव, 'कळ' ती पहार आहे

कळतो मलाच खेळ, छळतो मलाच खेळ
सरताच डाव हाही माझीच हार आहे

--सचिन काकडे

Thursday, May 08, 2008

डॉक्टर...

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले .

रिसेप्शनमध्ये बसले होते , तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग- यांच्या सटिर्फिकेटांवर गेली . त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले . नंदकिशोर प्रधान ...

म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो . गोरा गोरा , उंचापुरा , कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा . आता खोटं कशाला सांगू , माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर . या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या ... ... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले .

डोक्यावरचे केस मागे हटले होते . लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते . पोट सुटलं होतं . निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते . तरीही त्याचा रूबाब कायम होता . त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं . तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं ,

' लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का ?'
' हो .'
' दहावी कधी झालात ? सिक्स्टी सिक्सला का ?'
' अगदी बरोबर ! पण , तुम्हाला कसं कळलं ?'
' अहो , तुम्ही माझ्या वर्गात होतात ,' सांगताना मी चक्क लाजलेच ... ...

तर तो टकल्या , ढापण्या , ढोल्या , थेरडा नंद्या विचारतो कसा ,
' कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम !!!'