आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, July 13, 2009

रुपक...


रुपक...

आभाळ भरुन आलं
म्हणुन मी पण बरसलो
तर लोकं म्हणतात,
वेडाच आहे...!
...
पण,
कुणीतरी बरसावं
म्हणुन तर आभाळ भरुन येतं
हेच लोकांना कळतंच नाही...!
...
पावसाची नवी नवी रुपं
डोळ्यांत साठवायची तर
मनात, आत साठलेला पाउस
बाहेर काढुन नको टाकायला...?
...
ह्या आणि अशाच काही विचारात
मी खिडकीत विसावतो
आभाळाकडे न पहाताही मनात
सात क्षणात सात मात्रा उमटु लागतात...
...
मनासोबत रुपक डोळ्यातही फेर धरतो...
आणि, त्याचा एक एक तुकडा
माझ्या गालांवर विसावु लागतो...
...
आता मात्र लोकं म्हणु लागतात,
आभाळ भरुन आलं की
हा वेडा बरसतो...
डोळ्यांतुन... लेखणीतुन...
कधी प्रत्यक्ष... कधी रुपकात्मक...!

कवी - महेश घाटपांडे

हल्लीच्या या पिक्चर चे..


हल्लीच्या या पिक्चर चे काय खरे नाय
काय त्यात दाखवतील याचा काय नेम नाय!!
अक्षय चा भूल भूलय्या तर लय झोलच हाय
त्या पायी शेजारची आन्टी लय परेशान हाय

म्हणे पॉरग लय बिघडल होत या फॅशनच्या मुळे
त्याच्या काया पालट झाला या भूल भूलय्या मुळे
पुर्वी तोंडात 'च्या आयला' आणि अंगात बनियन घाले
आता अंगात 'भगवे' आणि तोंडात 'हरे राम' आले
दिवस भर त्याचे हे घरात 'हरे राम' चले
अन त्याचा बुडा आजोबा भी त्या सांग डुले

या पेक्ष्या तर भोसल्यांचा बंड्या लय डेंजर हाय
त्याच्या अंगात तर 'ओम शांती' चा शाहरूखच हाय
म्हणे पोरी बघत नाहीत त्याना 'सिक्स पॅक' लागतय
म्हणून हे येड रोज दहा दहा तास जिमच मारतय
मायला म्हणे आता रोज कोंबडीच खाईन
आणि एक दिवस म्हणे आता शाहरूखच होईन
'गोवा' सोडून आता रोज बदामच खाये
अन घडी घडी ला आरशयात दंडच पाहे

हे पाहून माझी माय म्हणे आता आपली 'टर्न' हाय
मला म्हणे आता तर 'सावरीया'वर शक हाय
म्या म्हटले की माय तू टेन्शना घेऊ नकोस
तुला सावराया लागेल असे स्वप्ना बघू बी नकोस
तुझ्या संस्कारात वाढलेला मी तुझा लेक हाय
काहीही झाले तरी आता आपली टर्न नाय!!
 

पावसाळ्यातील पत्रे .....

पावसाळ्यातील पत्रे .....

तुझी आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही, रात्र तर विचारुच नकोस. पावसाळी ऋतू सुरू झालाय पण पाउस पडत नाही. मला जितकी तुझी तितक्याच तिव्रतेने पावसाची आठवण येतेय. मी आसुसलोय तुला पावसात चिंब भिजलेली पहायला, पावसाचे थेंब तुझ्या गालावरून ओघळताना टिपून घ्यायला. वाऱ्याने गारठणारं तुझं शरीर अलगद माझ्या मिठीत शिरून शांत होताना मला पहायचयं. थरथणारे तुझे ओठ माझ्या ओठानी व्यापून टाकायचेत मला! लाजेने आरक्त झालेले तुझे गाल आणि वाफाळणारे तुझे श्वास मला मझ्यात सामावून घ्यायचेत. मला सामावून घेणारे, आणि एका क्षणात सर्व जगाचा विसर पाडायला लावणारे तुझे डोळे पहायला मी आसुसलोय.
आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींनी मला अक्ष्ररशः वेड लावलंय त्यापैकी एक तू आणि दुसरा पाऊस! तुम्हा दोघांचीही उणिव मला मरेपर्यंत सतावत राहील. एकवेळ पावसाचं मी समजून घेउ शकतो पण तुझ्याशिवाय.......
पावसाचं हे वेड मला अगदी लहानपणापासूनच. पण तुझ्याबरोबरचा तो पाउस फार वेगळाच होता. मी अनेक पावसाळे भिजलेलो पण तो पाउस मी मनाने, तनाने आणि तुझ्या प्रेमवॄष्टीने न्हाउन गेलो होतो. पहिल्या प्रेमातला पहिलाच पाउस, मी कधीही विसरू शकत नाही ते क्षण! आणि आठवतं तुला?
अशाच एका वर्षासंध्येला आपण रेडीओ क्लबच्या समुद्रावर उभे होतो. पाउस नुकताच पडून गेलेला तरीही त्याची रिमझिम सुरुच होती. तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेल्या समुद्राला बघण्यात मग्न आणि मी तुझी शांत चर्या न्याहळण्यात मग्न. माझा हात तुझ्या कमरेला वेढा घालून तुझ्या हातात असलेला. प्रत्येक लाटेबरोबर तू तो अजुनच घट्ट धरलेला. गार वाऱ्याची झुळुक तुझ्या मानेवरच्या केसांना माझ्या चेहऱ्यावर आणून अलगद सोडते. मी तुझ्या स्पर्शाने बेधुंद झालेला. हळूहळू काळोख पडू लागतो पण पाय जागेवरून हालत नाहीत. अचानक! एक गार वाऱ्याचा झोत वेगाने अंगावर येतो, तो तुला सहन नाही होत तु लगेचच मला बिलगतेस आणि थरथरणारे तुझे ओठ माझ्या ओठंवर ठेवतेस २, ३.. ४ किंवा ५ सेकंद!!!!! पण तो क्षण कधी संपू नये असं वाटत राहतं! तुझी मिठी, तुझा स्पर्श, तुझा सुगंध माझ्या रोमरोमांत अगदी एखाद्या जालीम विषासारखा भिनत जातो आणि मी त्या विषाने मंत्रमुग्ध होउन तुझ्या मिठीत जगू लागतो.
प्रेमाचे हे सारे क्षण मला आजही वेड लावतात. तु नसतानाही तु असल्याचे भास होतात. तु गेल्यापासून प्रत्येक पाउस मी असाच तुझ्या आठवणींनी भिजतो. एकदा ना मला ह्या पावसांच्या सरींच्या प्रवाहात वाहून जायचयं कुठल्यातरी वळणांवर तु भेटशील या आशेवर!
 
स्त्रोत: विरोप


पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा


तिच्याविना आयुष्य जगण्यास असह्य झालं होतं,
तिच्यावाचून मन माझं सुन्न सुन्न झालं होतं..

स्वप्नही रातीला सोडून दुर गेली होती,
झोपेलाही डोळ्यात तिचं निघून जाणं सलत होतं..

चित्त थारयावर नाही म्हणून काही सुचत नव्हतं,
तिच्या आठवणीच्या पदराभोवती माझं काळीज घोटाळत होतं

सारं काही नरकवेदनेच्या पलीकडचं हे एकाकीपण,
अन देहात फक्त तिच्या श्वासांच जगण शिल्लक होतं..

पण…. अचानक….

पुन्हा एकदा ती भेटली अशी एकांतात तेव्हा,
काळीज माझं भितीने धडधडत होतं

पुन्हा एकदा आभासाच मृगजळ छळणार मला म्हणून,
मन माझं थरकापाने घाबरत होतं..

 


तेव्हा अचानक तिच्या त्या तळहातांचा स्पर्श झाला,
तसं अंग माझं रोमारोमातून शहारत होतं

ती म्हणाली पुन्हा आली परतून मी तुझ्यासाठी,
हे सांगताना तिच्या डोळ्यातूनही थेंबांच येणं जाणं सुरूच होतं..

नाही विचारलं मी तिला कूठे होती ? का गेलीस सोडून ?
कारण तिचं येणं माझ्यासाठी एक नव्या जन्माच नवं विश्वचं होतं

तेवढ्यात ती म्हणाली , "नाही मी राहू शकले तुझ्याशिवाय"
ते ऐकताना खरचं माझं वाट पाहण सफल ठरत होतं

मग आली पावसाची सर धावून आमच्या भेटीला,
अन सारं काही विसरून ऎकमेकांच्या मिठीत आयुष्य पुन्हा अंकुरलं होतं


कवी: अद्न्यात

स्त्रोत: विरोप