आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, March 14, 2008

प्रतिक्षा म्हणजे अक्षरशः झेलणं,
सोप नाही हे शिवधनुष्य पेलणं..

प्रतिक्षा म्हणजे अक्षरशः गोठणं
किर्र मध्यरात्रीला मेघाच साठणं

प्रतिक्षा म्हणजे कोरडा विजनवास
गुन्हा नसताही सक्तीचा कारावास

प्रतिक्षा म्हणजे निसटलेलं पाऊल
प्रत्येक हालचालीत तिची चाहूल

प्रतिक्षा म्हणजे चिंतेची काजळी
प्रियेचं आगमन अन् चेहरा उजळी

प्रतिक्षा म्हणजे दिर्घकाळ संन्यास
त्यानंतर येऊ घातलेला ऊपन्यास

प्रतिक्षा म्हणजे कंटाळवाणा त्रास
खरं तर ती येणाऱ्या सुगीचा वास

कवि: भूपेश
स्त्रोत: ई-पत्र
♥ दिसतं तसं नसतं म्हणुन जग फ़सतं ♥
===================================

स्वत:ला सदैव रडवुन दुस-याला नेहमी हसवायचं असतं

आपल्या ईच्छा मनात ठेवुन दुस-याचं कौतुक करायचं असतं
मनातलं चेह-यावर कधी आनायचं नसतं
कारण असं करुनच दुस-याचं मन फुलवायचं असतं
दुस-यांसाठी राब राब राबायचं असतं
आणि स्वत:च्या जीवाचं मात्र राण करायचं असतं
एवढं करुनही आपल्याला कुनी समजुन घेत नसतं
कारण सर्वांनाच आपापलं वार्थ साधायचं असतं
आपल्या ईच्छेचा खुन करायला कुणीही तयार असतं
आणि आपलं मन मात्र दुस-यांसाठी सदैव तयार असतं
पन दुस-याचं भलं करुनही नेहमी आपलचं चुकीचं दिसतं
आनि दुस-याचं मनं आपल्याला पाहुन खुदक हसतं
पन एकांतात आपलं मन किती रडतं असतं
कारण एकांत नसतांना ते सर्वांसाठीच हसतं
आणि म्हणुनच हे सर्व जनसमुहाला माहीत असतं
की दिसतं तसं नसतं म्हणुन जग फ़सतं

-♥ अमोल ♥
http://amol-koshti-True-poems.blogspot.com

प्रेमाचा खरा अर्थ..

दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला,
मी तर पडलोय प्रेमात, तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं, प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू
कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या
प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

लेखक/कवि: अद्न्यात
स्त्रोत : ओर्कुट

Monday, March 10, 2008

बाईपणाचे आज माझ्या - कौतुक तुमचे करणे नको
कर्तृत्वाचे आज माझ्या - वजन तुम्ही तोलणे नको
भरारीची आज माझ्या - झेप तुम्ही मोजणे नको
आजपुरतेच मला तुमचे डोक्यावर घेऊन नाचणे नको

नको आहे उदो उदो माझ्या स्त्री-आत्म् शक्तीचा..
नको आहे आरक्षणाचा- राखीव नियम सक्तीचा

बाईपण माझे - ते तुमचे मला जपणे नको
अबला सबला.. चिकटवलेली विशेषणे नको

उंच उत्तुंग भरारीला माझ्या बाईपणाची शिडी नको
अमर्याद कर्तृत्वाच्या पायात बाईपणाची बेडी नको

उमलुदे फुलुदे ..नैसर्गिकच- संकरित कलमी फुलणे नको
आज खुलताना मनभरुन.. एरवीचे मन मारुन ते कुढणे नको
आज मखरात सजताना.. रोजचे अडगळीतले सडणे नको
आज मुक्त वावरताना -उद्या ते भर रस्त्यातले अडणे नको

महिलादिनी सलाम ठोकुनि वर्षभर उट्टे काढणे नको
आजच्या पुरते पाय धरून.. वर्षभर पाय ओढणे नको

पुरूष दिन केलात का साजरा कधी
मग महिलादिनाचीही महती नको
माणूस म्हणूनच जगू दे फक्त..
एकाच दिवसापुरती ही पोच पावती नको..
.
.

:मी फक्त एक माणुस..
सौ. अनुराधा म्हापणकर
http://anuradhamhapankar.blogspot.com/

आयुष्याच्या निबंधात-

सुखसमाधानाचे पुर्णविराम फार कमी असतात,

निरुत्तर संतापाचे प्रश्नचिन्हच जास्त जमतात.

कधी हास्याच्या श्रावणसरी बरसतात,

तर कधी अश्रुंचे महापुर लोटतात.

कुणाचे काही हरवते, कुणाला काही गवसते,

कुणाचे कुठे तुटते, कुणाचे कुठे जुळते.

कुणाला मिळते पोर्णिमेची शीतल छाया,

कुणाला मिळतो अमावस्येचा दाट काळोख.

कधी असतो गोंगाट, कधी स्मशान शांतता,

प्रत्येकाच्या आयुष्याची निराळीच वार्ता.

तरीही प्रत्येकाला हा निबंध लिहावाच लागतो-

कारण "देवबाप्पाच्या" शाळेत जाब द्यावा लागतो.

स्त्रोत: आमचं ओर्कुट..
चांदण्याच्या देशात तुझी वस्ति होति
कसे शोधु?अवसेची रात संपत नव्हती.....

का त्या फुलाची छबी सारखी आठवत होति?
विसरावे म्हणुन, बाग उखड्ण्याची तयारी होति...

माझ्या ति किति जवळ बसली होति..
हाकेच्या अंतरावर होति..तरी का लांब वाटत होति?

मौसम शराबी, अन हवा गुलाबी होती..
कुणास खबर, दिवस होता की रात्र होति....

ति भेटली की, वेळ भांडणात जायची..
नसताना का तिची आठवण छळत होति??...

गंध, सुगंधा सारखी हवेत पसरली होति
जाणवत होति,पण स्पर्शीता का येत नव्हति?

सा~या आठवणी पुसल्या,विसरलो होतो तुला
प्रेम केल्याची, ति जिवघेणी शिक्षा घेतली होति..

-- अविनाश
बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन