आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, October 10, 2007

निसटून गेलेले क्षण
येत नाहीत परत ...
आपण त्यांच्या मागे
धावतो खुळ्यागत .....

पळत सुटलो तरी
नाही काही हाती लागत ...
आपण मात्र एकटेच
बसत बसतो कुढत ....

उद्विग्न होता आपण
सारे दूर पळतात...
दुरावा आला म्हणजे
संवाद ही हरवतात ....

आपल्या मनाचा आवाज
ऐकता आला पाहिजे ...
उत्स्फुर्तता टिकवून
स्वसंवाद झाला पाहिजे ....

मन व शरीर यांच्या
संवेदना जाणवू या...
स्वत:ला व्यक्त करण्यास्तव
कामास त्यांना लावू या....


कवी: ..........

No comments: