आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, July 18, 2007

काही नविन ग्राफ़िटी...........

* गरज ही शोधांची जननी आहे तर आळस ही सावत्र आई..

* झाडावर प्रेम करा. झाडाखाली नको..

* संवादान जग जिंकताही येत आणि सर्वस्व गमावताही...

* कोणतीही गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलण सोपं असत. जबाबदारीच्या बाबतीत मी तेच करतो.

* नवरा नावाच बंदर असतं बायको नावाच्या डोंबा-यासाठी...

* संवाद हे अतिशय प्रभावी माध्यम आहे पण मौन त्याहूनही प्रभावी..

* तुम्ही दारु पिता का? हा प्रश्न आहे की आमंत्रण...

* लिंबाचा वापर दोन गोष्टींसाठी. उतरुन टाकायला आणि उतरवायला...

* दुस-यांचे फ़क्त दुर्गुण दिसण हा ही एक दुर्गुणच..

* तुमच्या ऑफ़िसमध्ये जोर कमी आणि बैठका जास्त अस होतय का?

* अजिबात झोप लागत नाहीये. अशी स्वप्न पडतात हल्ली..

* गार पाण्याचे पहिले दोन तांबे घेववत नाही. एकदम तिसराच घेतला तर..

* मला इतरांना मदत करायची आवड आहे पण सवडच मिळत नाही...

* आपण किती शुद्ध आहोत याचा अंदाज येईल...
हिमालयात जा किंवा सरकारी कार्यालयात....

* माणसाला रोजचे सुख नको असते॥ रोज नविन सुख हवे असते...

* दारु पिऊन गाडी चालवायला बंदी आहे ना?
मग बार बाहेर पार्किंग ची सोय कशाला?

* चूक नेहमी अचूकपणे करावी..

* जंतूनाशक इंजेक्शन नेहमी निर्जंतूक करुन का घ्यावे लागते...

* मोहाचा सामना करण्याचा एकच मार्ग.. त्याच्या मोहात पडण...

* फ़ॅशन म्हणजे असा कंटाळवाणा प्रकार . जो दर सहा महिन्यांनी बदलावा लागतो..

* काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं चांगल..

* स्वतःपेक्षा दुस-याच्या सुखावरुन प्रत्येकजण आपल दुःख ठरवतो..

* आयुष्य हे नदी सारखच आहे.. वहाण थांबल की डबकचं...

* पॉझीटीव्ह विचार केल्याने खरचं उपयोग होतो....

* दुचाकीची मळलेली मागची सीट म्हणजे स्वच्छ चारित्र्याच लक्षण...

*एक किलो सोन्याचे बक्षीस लागेल त्याची, चांदीच ना!!

*आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आरोप करणार्‍यांना "खपवले" जाईल.

*आयुष्यात चार माणसे तरी जोडावित.....शेवटी उपयोगी पडतात.

*मांजर आणि नवरा कुठेही नेयुन सोडला, तरी संध्याकाळी घरीच परत येतो.....

No comments: