आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, September 14, 2007

दोन दिवस
दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे.

शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हरघडी अश्रू वाळविले नहीत,पण असेही क्शण आले
तेव्हा अश्रूच मित्र होउन साहय्यास धवून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला अता जगमय झालो
दु:ख पेलावे कसे,पुन्हा जगवे कसे;याच शाळेत शिकलो.

हे हात माझे सर्वस्व, दरिद्र्यकडेच गहाणच रहिले
कधी माना उंच्वलेले,कधी कलम झालेले पहिले.

झोतभट्टित शेकवे तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दु:खात गेले

- नारायण सुर्वे

No comments: