आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, July 05, 2007

गांधारी-
कोण म्हणतं ?
दुःखाची परिसीमा
म्हणजे मरण आहे,
मी तर म्हणेन,
स्वतःतून स्वतःच हरवणं
आणि स्वतःच कलेवर
आयुष्यभर वागवणं,
यासारखं दुःख नाही,
डोळे बांधून नावडतं जग
आपलसं करणं आणि
आवडतं सारं स्वप्नात जगणं,
गांधारीसारखं यासारखं दुःख नाही,
हो आणि डोळ्यांना पट्टी बांधली तरी कोण म्हणतं,
गांधारीला स्वप्न पडत नव्हतं।

No comments: