आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, November 16, 2007

प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥

ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥

तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥

एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,
नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥

एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,
नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥

सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,
नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥

प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,
एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥

प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,
पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते ॥प्रेम म्हणजे प्रेम, केवळ प्रेमच असते,
दुसरे तिसरे काही काही काहीही नसते ॥

ते एक हळुवार भावनांचे नाजूक नाते असते,
भावभऱ्या मनाचे, सुरिले गीत असते ॥

तिथे तुझे माझे,माझे तुझे काहीही नसते,
जे काही असते ते सारेच परस्परांचे असते ॥

एकदा आपले मानले, की मग सारेच मानायचे असते,
नि पावलापावलावर परस्परांना सदैव सावरायचे असते ॥

एकमेकांत मिसळून, विरघळायचे असते,
नि स्वत:चे स्वत्व दुसऱ्यांत पाहायचे असते ॥

सारेच्या सारे कधीही, कुठेच पटत नसते,
नि म्हणूनच बरेचसे तडजोडीने मिळवायचे असते ॥

प्रेम मिळावे लागते, मिळाले तर कळावे लागते,
एकदा कळले की मग, सदैव वाढवायचे असते ॥

प्रेम नशिबाची गोष्ट असते, ते नशिबवंतांनाच लाभते,
पण आपणच नशीबवान आहोत हे मात्र कळावे लागते

कवी: अद्न्यात

No comments: