आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, September 27, 2007

नात्याची वीण घट्ट असु नये.
उगीच नात्यात जास्त फसु नये.
सुटताना वीण जर तुटलेच धागे
हसतिल सारे, आपण रुसु नये.

नात्यातल्या नात्यांचा नात्यांनाही विसर होतो.
जीवाभावाचे नाते सोडून कुणी पसार होतो.
टिकलेले असे सांगा कोणते शाश्वत नाते,
जिथे नात्याच्याही जिवावर कुणी उदार होतो .

नात्यांना माणसाने जोडु नये,
जोडलेच तर ते तोडु नये,
विसरलात माणसांना तरी चालते......
पण नात्यांना कधी सोडू नये.


नात्यात कुणाच्या माझेही एक 'नाव' असेल.
स्वप्नात कुणाच्या माझाही एक् 'गाव' असेल.
नसेल ते नाते जन्मांतरीचे जरी....
काळजात एखाद्या माझाही एक 'ठाव' असेल.

एका नात्याचे रेशीम कोंदण असेल
काळजावर माझ्या 'एक गोंदण' असेल.
घेईन मी श्वास अखेरचा जेंव्हा ,
तेच मला शेवटचे 'आंदण' असेल........ !!!

---@अरुण

No comments: