आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, September 17, 2007

त्या गलबतास किनार्‍याची ओढ वाटली होती
किनार्‍याच्याही डोळ्यांत दोन आसवं दाटली होती

शीड फ़डफ़डले गलबताचे.... वारा भरला त्यात
सोडुन किनार्‍यास गलबत निघाले अथांग सागरात

अनंत मैलाच्या प्रवासास गलबताने सुरुवात केली
वाटेत शिदोरी म्हणुन किनार्‍याची आठवण साथ नेली

किनारा रडला खुप खुप.. आसवं त्याची ढळाली
सागरालाही त्या आसवांनी किंचीतसी भरती आली

गलबताचा प्रवास सुरु झाला मैल दर मैल
वाटतं होता प्रवास हा सहज संपुन जाईल

किनार्‍याची ओढ गलबताला छळु लागली
अन आठवण त्याची दिवसेंदिवस जाळु लागली

मला मिळालेला किनारा मी का सोडला?
'अजुन मला काय हवं होत?' असा प्रश्न त्याला पडला

पण आता खुप उशीर होत होता परतायला
अन वेळही लागला होता हातातुन रेतीसारखा सरकायला

दिवसामागुन दिवस सरत चालले होते
दोघंही एकमेकांपासुन झुरत दूर चालले होते

प्रचंड त्या लाटांत श्वास गलबताचे अडखळू लागले
किनार्‍याच्या भेटीस प्राण त्याचे तळमळू लागले

घोर काळरात्री खुप दाटुन गेल्या
जखमा काळजावर दोघांच्याही वठवुन गेल्या

खुप दिवस झाले....प्रवासास निघालेले गलबत परत नाही आले
कुणीतरी बोललं काल..त्या किनार्‍याचे कण कण वाहून गेले

कदाचित एखादं प्रचंड वादळ गलबतास घेऊन गेलं असेल
कदाचित एखाद्या महाकाय लाटेनं त्या किनार्‍यास वाहुन नेलं असेल.....कदाचित ....

-- संदीप सुराले

No comments: