आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, August 22, 2007

तारीख सात :


मी आलो घरी,
अंतर्मुख होउनच..

पण दारात,नेहमीचेच स्वागत !
पगाराच्या दिवशी पत्नीच्या चेह-यावरचे सुहास्य भाव,

कदाचित पहिल्या रात्रीही नसतील इतके !
आणला का? चला आधी घरात, देवाजवळ ठेवा ते !

भोळीच ती, म्हणते पैसा टिकतो अशानं……
क्षणभर अभिमान वाटला,

जुन्याच साडया हरतलिकेला अन पाडव्याला नविन म्हणून वापरणा-या बायकोचा.

सौः- लावू उद्यापासून एकेकाचे ! अगदी शेवटचा रुपया शिल्लक असेपर्यंत,

मी :- शिल्लक तिच्या पुढयात, रुपयाच्या वर्तुळासारखा ! !


आई,

चश्म्याइतकीच वाळलेली !

ह्या महिन्यात जमेल का रे फ़्रेम बदलायला ?

टोचते रे ती ! दो-यां नी बांधून नाही राहत दांडया !

श्रावणात काही वाचीन म्हणते देवाधर्माचं !

मी :- वाचक तिच्या डोळ्यातल्या अनेक श्रावणांचा !


वडिल,
असंख्य आभाळं पाठीवर !

डॉक्टर म्हणतात की फिरायला पाहिजे,

वॉकर जमेल का रे या बजेटमद्ये !

कुलकर्ण्यांइतका भारी नको,

पण पाय दुखतात रे म्हणून !

मी :-शांत आणि सरळ वॉकर सारखाच, पण आतून पार वाकलेला !


आंगणातल्या वाळूवर घट्ट पाय रोऊन मी उभा, अविचल स्तब्ध, मनात उठणा-या असंख्य लाटांना थोपवीत……

पप्पा ! पप्पा !,

आणली का नवी स्कुलबॅग !

“खिशात पगाराच्या ऐवजी मिळालेली शेवटची नोटिस,

….सेवेतून कायमचे कमी करण्यात….


या सुटीत जायच ना पप्पा फिरायला,

किनई समुद्र बघायचाय मला,वाळुमद्ये किल्ले बनवायचेत !

टिचर सांगतात समुद्राचं…..

आई नाही म्हणते,पण जायच ना पप्पा आपण!

म्हणुन त्याने

पायाला मारलेली गच्च मीठी !

थरथरत्या हाताने मी त्याला उचलले!

कोनी सांगावं त्याला,

कि माझ्या पायाखालची वाळूच सरकतेय म्हणून !!!


@ अरुण नंदन (20.08.07)

No comments: