आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, August 23, 2007

चंद्र-तारे खूप झाले...!

चंद्र-तारे खूप झाले;
आता 'कोसळलेल्या उल्कांवर' लिही!
पाने-फुले नेहमीचीच;
आता 'उन्मळलेल्या मुळांवर' लिही!

प्रेमभंग नित्याचा;
आता 'रोजच्या' विनयभंगावर लिही!
तुलसी-महात्म्य पुरे ;
आता 'बाटवलेल्या गंगांवर' लिही!

हिरवा मळा छानच;
आता काटेरी कुंपणावर लिही!
भाटगिरी सोडून आणि,
राजाच्या माजोरेपणावर लिही!

माझे, मी , खूप आता,
आतल्या 'कमी'पणावर लिही!
आणि सिरीयल्सचा 'आत्मा' असलेल्या,
छद्मीपणावर लिही!

'जीवघेणे' कटाक्ष बस;
रोजच्या 'जीव देण्यावर' लिही!
अन हुंडा घे‌उनही 'सावित्रीचा',
'जीव घेण्यावर' लिही!

'कर्माचे ओझे' जाणतो;
अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही!
आणि सौभाग्य लेणे विस्कटणाऱ्या,
कर्जाच्या बोज्यावर लिही!

हिरवा‌ईचे वर्णन 'वाचले' मी;
'न वाचणाऱ्या' वनरा‌ईवर लिही!
नि आपण स्वत:लाच लोटतोय,ना वेड्या ;
त्या भयाण खा‌ईवर लिही!

-- तुषार मराठे

No comments: