आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, July 10, 2007

माझ्या स्वप्नाच्या निशेत,
खरोखर तुझीच नशा आहे..
कल्पनेच्या विश्वातही तुझ्याविना..
माझ्या एकटेपणाची काय दशा आहे..

किनारेसुद्धा किती शांत शांत आहे,
तुझ्या सहवासाविना लाटा सुद्धा निवांत आहे..
वर चांदण्याचा हिरमोड सुद्धा किती भकास आहे..
सांग सखे तुझ्या येण्याला अज़ून कितीसा अवकाश आहे..

मनात माझ्या काहुर माजले..
सुर माझ्या प्रेमाच बघ कसे हे विस्कटले..
अन डोळ्यात माझ्या अश्रुंचे डोह साठले..
सांग सखे सांग ठिणगीविना हे माळरान कसे गं पेटले..

नाही संवाद नाही आस्वाद..
तरीही हा आहे हा अर्थविना वादविवाद..
का सहन करावे हे दु:ख असह्याचे..
कानी गुमजतो फक्त विरहाचा शंखनाद..

का समजत नाही हे सारे,
का लागले तुला, मृगज़ळाचे वारे..
का निघालीस सोडूनी अशी मला..
अन का उध्वस्त केलेस माझ्या जिवनाचे संगीत सारे?

प्रश्न माझे हे असे,तुला उदास करतील..
मनात तुझ्या द्वेष निर्माण करतील..
तरीही तुझा द्वेष मला मान्य आहे..
पण तु एकदातरी परत ये माझ्यासाठी..
का सोडूनी चालली आपूल्या जिवनाच्या रेशीमगाठी....

तरी पण मन माझे तुझ्याकडेच धावते,
तुझ्या वाटेकडे उगाच आस लावते..
एकदा तरी मागे वळूनी बघ सखे जरा..
सखे अजूनही मी तिथेच आहे..

---- आ॥ आदित्य..

No comments: