आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, May 18, 2007

Thursday, May 17, 2007

आयुष्य खूप सुंदर आहे

बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहे

जगायला गेलं तर


अश्रूंतही एक समाधान आहे

वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे

जपायला गेलं तर


काट्यांतही मखमल आहे

सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे

कुस्करायला गेलं तर


अपयशातही नवी आशा आहे

पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे

उमजायला गेलं तर


मातीतच खरं सोनं आहे

शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते

फुलांनी शरीर झाकल्यावर


निखाऱ्यांवर चालावं लागतं

कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते

हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर


कल्पना शक्तीचं प्रगती आहे

विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर


"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे

विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते

सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....


खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं

त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण

अगणित उत्तरांचं पीक आहे


@सनिल पांगे

देवा, घे एकदा अवतार!!

देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
इथे मनुष्याचे राज्य
मंदिरही त्याचीच एक रचना

फ़क्त पाप धुवायचे काम देवाकडे
लडिवाळ ते अभिषेकादी साकडे
परत निघतसे नवीन पाप कर्मण्या
संपता पुण्याचे इंधन, येई मग हवना

दानपेटीस मिळते लाच दहा रुपयांची
बाहेर उभ्या देवाची सोय नाही खायची
रोज भजन असे भिकाऱ्याच्या श्रवणा
एवढे पुण्य असुन का ती वंचना

नुसतीच गीता वाचून कसा मिळनार स्वर्ग
चाललात का कधी परोपकाराचा मार्ग
तहानलेल्याची भागवलीत का कधी तृष्णा
ढोंगी उपासाच्या कसल्या हो वल्गना

देवळात असे भक्तांची वर्गवारी
भक्त तोच महान ज्याचा खिसा भारी
मोठी मजेशीर असे ही संरचना
दुकानदार पुजारी,भक्तीचा भाव उणा

म्हणुन देवा, घे एकदा अवतार
थांबव ही भक्तिची उसनवार
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
माणुसकी जागव रे प्रत्येक मना

-- अभिजित गलगलीकर

लग्नाआधी....,लग्नानंतर...!

लग्नाआधी शब्द वेगळे,नंतर कळती अर्थ वेगळे....

आधी...रेशमी तुझे केस मोकळे,
जीव कसा गं त्यात गुंतला।

नंतर...घासाघासात गुंतवळ आहे,
बांधून ठेव तुझ्या कुंतला।

आधी...तू आल्याची वर्दी देतो,
तुझ्या अंगीचा गंध आगळा,

नंतर...परफ्युमचा तो खर्च केवढा,
बघुनी माझा प्राण ये गळा।

आधी...तू बोलावे,मी ऐकावे,
अनंतकाळ असेच व्हावे।

नंतर...किती वटवट ऐकू तुझी मी,
वाटे येथूनी पळून जावे।

आधी...साखरेवीणही चहास गोडी,
तुझ्या हातची जादुच न कळे।

नंतर...अगोड चहा पिऊ कसा मी,
लक्ष्य कुठे ते तुझे वेंधळे।

आधी...तंग तुझ्या त्या कपड्यामधुनी,
तारुण्य तुझे घे नजर खेचूनी।

नंतर...असले कपडे देतो फेकूनी,
साडीच ये पटकन नेसूनी।

आधी...कोमल हळवी प्रिया तू सुंदर,
फुलासारखे जपीन खरोखर।

नंतर.. किती जीवाचे कौतुक करशील
मुकाट मलम लाव जखमेवर।

आधी...पाऊल ठेवूस नको मातीवर,
मलीन होईल हे कोमल सुंदर।

नंतर...पुरेत नखरे,ये भानावर,
पदर खोच अन झाडलोट कर।

आधी...या जन्मीचा दास तुझा मी,
राणी असशी तूच खरोखर।

नंतर...माझ्या घरचा राजा मी तर,
जसे मी सांगीन,तसेच तू कर।

कवयित्री:सौ.शैलजा शेवडे
वावटळ- गझल (एक प्रयत्न)

उकरलेलं मन तो सारवत होता
निश्चल स्वप्नांना परत चालवत होता

कुणी ध्वस्त केलं सुंदर ते जग
विखुरलेल्या आठवणी तो आवरत होता

चेहऱ्यावरचं हसु पळवलं कुणीतरी
नेमकं उलट्या दिशेने तो धावत होता

आकाशालाही वाटला का त्याचा हेवा
मनाचं गळकं छप्पर तो बुजवत होता

झगमगाटात दिपले होते त्याचे डॊळे
शेवटचा दिवा तो आता मालवत होता

मंद वावटळीत भरकटले होते शब्द
जुनी ओळख म्हणुन त्याना बोलवत होता

-- अभिजित गलगलीकर

~:~ दुनियेचा चेहरा ~:~

दोन चेहरे घेऊन प्रत्येकाला जगाव लागत
ओठांवर एक अन् पोटात एक असच हल्ली वागाव लागत
पॉलिश केलेल हास्य दाखवून आतला गंज झाकावा लागतो
आणि शक्य नसले तरीसुद्धा मोठेपणा दाखवावा लागतो !

"माझ आयुष्य सर्वात सुंदर" अस चारचौघात म्हणाव लागत
नक्की खर काय ? ते विचार करून जाणाव लागत
इतरांच्यात नाटकी वागून शहाणपणा मिळवावा लागतो
अन् शहाणपणाच्या नावाखाली खरा स्वभाव पळवावा लागतो !

स्वत:शी प्रामाणिक अस सध्या कोणी रहातच नाही
अस कोणी राहील तरी दुनिया त्याच्याकडे पहातच नाही
"एक वेडा" म्हणूनच मग त्याला हिणवतात सगळे
मग समजूतदारपणे तोच आपले आयुष्य करतो वेगळे !

खेळण्यासारखे आयुष्य जगून काय करायचे इथे ?
प्रतिभेपेक्षा प्रलोभानानांच किंमत जास्त येते
पण प्रतिभेच महत्व समजायला तर हव
प्रलोभनांच दुष्टचक्र थांबायला तर हव !

माणूस हा असाच जगणार शोभेच्या बाहुलीसारखा
स्वत:मधल्या अस्तित्वालाही मग होईल तो पारखा
मग शेवटी उमगेल त्याला, आपण किती खोटे वागलो
स्वत:लाच स्वत:साठी किती वेळा महागलो !

तेव्हा मात्र तो त्यावर काहीच करू शकणार नाही
कारण तेव्हा निघून गेली असेल........ वेळही अन् काळही !

-- तन्मय पाठक

बाळु सकाळी न चुकता ८.२१ पकडणार

बाळु सकाळी न चुकता ८.२१ पकडणार
संध्याकाळी कसा बसा ६.५२ला लोंबकळणार
चुकुन विंडोसीट मिळताच बाळु धन्य होणार
तो बिचारा मध्यमवर्गीय तो असाच रहाणार

कधी सरकार कोसळणार
कधी शेअर बाजार वधारणार
बाळु मात्र निर्विकार रहाणार
सकाळी न चुकता ८.२१ पकडणार

माणुस हा मरणारच, कधी बाळुचंही कोणी मरणार
पराकाष्ठेने बाळु डोळ्यातुन दोन थेंब सांडणार
पोचवुन आल्यावर बादलीभर पाण्यात अंघोळ करणार
दुस-या दिवशी सकाळी ८.२१ पकडणार

श्रावणात घन निळा बरसणार
आजुबाजुला मोगराही फ़ुलणार
पिसारा फ़ुलवुन मोरही नाचणार
बाळु मात्र न चुकता ८.२१ पकडणार

दिवसभर ऑफ़िसात बाळु पाटया टाकणार
साहेबाच्या शिव्यादेखील मख्खपणे ऐकणार
घरातल्या कटकटींतही बाळु तटस्थ राहणार
सकाळी मात्र न चुकता ८.२१ पकडणार

कधीतरी बाळु म्हातारा होणार
निवृत हौउन निवांत आयुष्य जगणार
८.२१ च्या वेळेला थोडा अस्वस्थ होणार
८.२१ मात्र न चुकता बाळुशिवाय धावणार

म्हणालो नाही ..................!!!!!!!!!!!!!!!!!!

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी' ते ही 'सांग' म्हणालो नाही.
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही ...

मज स्मजते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का ही नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी'
जा! फिटले सारे पांग!'- म्हणालो नाही

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय लागला आतून वणवा सारा
पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग- म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग- म्हणालो नाही...



आठवतंय का तुला,
तु मला पहिल्यांदा
दिसली होतीस
मग मला ही दुनिया
खुपच छान भासली होती

आठवतंय ना तुला,
तु माझ्याशी
पहिल्यांदा बोलली होतीस
त्या चार सेकंदात मी
पुर्ण लाईफ जगली होती

आठवतंय एकदा,
दुर मैत्रिणींमधुन तु
मला ‘हाय’ केलं होतस
माझं मलाच जाम
कौतुक वाटलं होतं

खुप आठवतात मला
ते सोनेरी क्षण
रुपेरी स्वप्नांमध्ये
बागडणारे माझे मन

तु सर्व आठवतेस की नाही
हे मला माहित नाही
पण मी सगळं रोज आठवतोय
पाय वळत नाहीत तरीही
विरहाच्या रस्तावरुन रोज त्यांना चालवतोय.....

--श्रीकांत लव्हटे

~:~ त्याला पाऊस आवडत नाही ~:~

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.

ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,

असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,

पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी

पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,

पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.

पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.

पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.
शब्द
शब्द एक वीज,शब्द एक तारा,
हाच शब्द कधीतरी,सुखावणारा गार वारा....
शब्द कधी त्याग,शब्द कधी भोग,
हाच शब्द अचानक,होवुन जातो योग.......
शब्द एक देव, शब्द एक दानव,
या दोन्ही मध्ये फक्त, अडकतं असतो मानव.....
शब्द तुझे रुप,शब्द तुझा रंग,
ह्याचं रंगातो,तो अळवावरचा थेंब......
शब्द तुझे डोळे,शब्द तुझेचं श्वास
ह्या शब्दात खेळताना,मज होतो तुझाचं भास......
शब्द एक आठवण, शब्द मायेची पाखरण
हळुचं होवुन जातो शब्द, ह्र्दयाचे एक स्पंदन .........
शब्द एक शस्त्र, शब्द एक अस्त्र
श्रीक्रष्ण बनवतो शब्दाला, द्रौपदीचे वस्त्र .......
शब्द नेहमीच सदगुरु,शब्द दोन कल्पतरु
ह्या शब्दांच्या लाटेमध्ये कसे मी मज सावरु......
कवयत्री : मिनल
~:~ माझ मन ~:~



Wednesday, May 16, 2007

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Monday, May 14, 2007