आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, May 17, 2007

लग्नाआधी....,लग्नानंतर...!

लग्नाआधी शब्द वेगळे,नंतर कळती अर्थ वेगळे....

आधी...रेशमी तुझे केस मोकळे,
जीव कसा गं त्यात गुंतला।

नंतर...घासाघासात गुंतवळ आहे,
बांधून ठेव तुझ्या कुंतला।

आधी...तू आल्याची वर्दी देतो,
तुझ्या अंगीचा गंध आगळा,

नंतर...परफ्युमचा तो खर्च केवढा,
बघुनी माझा प्राण ये गळा।

आधी...तू बोलावे,मी ऐकावे,
अनंतकाळ असेच व्हावे।

नंतर...किती वटवट ऐकू तुझी मी,
वाटे येथूनी पळून जावे।

आधी...साखरेवीणही चहास गोडी,
तुझ्या हातची जादुच न कळे।

नंतर...अगोड चहा पिऊ कसा मी,
लक्ष्य कुठे ते तुझे वेंधळे।

आधी...तंग तुझ्या त्या कपड्यामधुनी,
तारुण्य तुझे घे नजर खेचूनी।

नंतर...असले कपडे देतो फेकूनी,
साडीच ये पटकन नेसूनी।

आधी...कोमल हळवी प्रिया तू सुंदर,
फुलासारखे जपीन खरोखर।

नंतर.. किती जीवाचे कौतुक करशील
मुकाट मलम लाव जखमेवर।

आधी...पाऊल ठेवूस नको मातीवर,
मलीन होईल हे कोमल सुंदर।

नंतर...पुरेत नखरे,ये भानावर,
पदर खोच अन झाडलोट कर।

आधी...या जन्मीचा दास तुझा मी,
राणी असशी तूच खरोखर।

नंतर...माझ्या घरचा राजा मी तर,
जसे मी सांगीन,तसेच तू कर।

कवयित्री:सौ.शैलजा शेवडे

No comments: