आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, December 21, 2007

तुझ्याशी फोन वर बोलताना
माझी मी न राहते.
कधी नजर झुकवुन,
तर कधी स्वप्नील नजरेने,
तुझेच ऐकत राहते.

तुझ्याशी फोन वर बोलताना,
पडतो माझाच मला विसर.
हा तुझ्या बोलण्याचा,
कि तुझ्या प्रेमाचा असर?

तुझ्याशी फोने वर बोलताना,
जग का धुंद होते?
तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने,
मी ओली चिंब होते.

तुझ्याशी फोन वर बोलताना,
वेळेचे उरत नाही भान.
वाटते बोलणे संपुच नये,
हि कुठली ओढ? हि कुठली तहाण?

तुझ्याशी फोन वर बोलताना...

~प्रशांत रेडकर

Thursday, December 20, 2007

झळा न सोसनार्यांन्ना

सावलीची किंमत कळत नाही

इतरांच्या दुखात बुडल्याशिवाय

आपली हिंमत कळत नाही

-- अद्न्यात चरोळिकार
एकरूप

प्रिय तुज्या प्रेमात,
मुक्य जाल्या भावना.
शब्दही साथ देत नव्हता
जग्य जाल्या वेदना

दुखला कुरावालाताना
सुखही दिसत नव्हते
तुजी आठावन येताच
अश्रु मात्र ढलत होते

जीत तुज आस्तित्वा
तिथच मला बर वातात
अग्नित उभ राहून सूधा
मन मज शांत राहत

सुख काय दुख काय
शेवटी एकरुपच असत ....

कवी: अद्न्यात
का पुन्हा पुन्हा मी शोधते
त्या भुत काळातल्या वाटा.
का दु:ख्ख करुन घेते.
जेंव्हा पायी रुततो काटा

बसता अशा कातर वेळी
कानी कोण गुणगुणे गाणी?
झोंबताना ह्या कोवळ्या तनुस
कोण करते भलतिच मागणी?

ज्याने ह्रुदयास पीडा दिली
तोच कसा ह्रुदयी बसला?
कोवळ्या मम तनुस छेडुन
यौवन कसे जागवुन गेला.

कसा मी विसरु त्याला
तो मम रोम रोमात भिनला
सारखा तो आठवतो का?
जो जखमा देवुन गेला

तुझि लागलेली हि आस
हा भास कि आभास आहे
तु आता माझा नाहि
हे मज का उमगत नाहि?

केंव्हा सरेल ति माझी
काळरात्र घनघोर अंधारी?
कधि उजाडणार मम जिवनी
ति पहाट सोनेरी?

काय सांगु काय बोलु
मन माझे था~यावर नाहि
दाटुन येते निर नयनि
लिहिताना अधुरी प्रेम कहाणी

-- अविनाश...
मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.

***व.पु.काळे
माज्यावरही कोणीतरी
पावसाच्या सरीप्रमाने
बेभान होवून कोसाळाव,
मला सोडून जाताना
निदान एकदातरी वळून पाहाव.

वळून पाहताना त्याचे
नयन ओलेचिब व्ह्वावे,
अन त्याच आसवांच्या पावसात
मी मनासोक्ता न्हावे.

मी त्याच्यासमोर असताना
तो माज्यावर भालावा,
पण मी जेव्हा अस्तित्वात नसेन,
त्यावेळि त्याने माज्यासाठी
निदान एकतरी आश्रु गाळावा ।

कवि: अद्न्यात

Tuesday, December 18, 2007

अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

-- मंगेश पाडगांवकर

Monday, December 17, 2007

स्थळ लागत नाही काळ लागत नाही

तुझी आठवण यायला वेळ लागत नाही

कित्ती स्वतःमध्ये तू गुंतून गेलीस बघ

मी जळतोय पण तुला झळ लागत नाही !!"

-- अद्न्यात चारोळिकार
एक होता विदुषक , नाव त्याचं लक्ष्या..

शांतेचं कार्ट चालू आहे
हा बसला ज्याच्यावर ठपका
मग,चल रे लक्ष्या मुंबईला म्हणत
धुमधडाका ज्याने केला..

हसवलं त्यानं जगाला
बोलक्या डोळ्यांनी,मिश्किल हास्याने
अफलातून बोलांनी,चुलबुल्या स्वभावाने
मोहवलं त्यानं मनाला..

शुभ बोल ना-या म्हणत
सा-यांनी त्याच्यापुढे रगडला माथा
पण त्यानं धांगडधिंगा करत
गडबड घोटाळ्याचा शेजार नाही सोडला..

दे दणादण करत
मारलं त्यानं खलनायकांना
प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणतं
जिंकलं त्यानं प्रेमिकांना..

नायिकेच्या बापापुढे करे तो थरथराट
बनवा बनवी करणा-यांसाठी असे तो खतरनाक
बचतीचे धडे देणारा होता तो चिकट नवरा
बहिणीसाठी विघ्नहर , हाच सूनबाईचा भाऊ होता..

रंगत संगतीनं ह्याच्या जो तो रंगलेला
मस्करीने त्याच्या रसिक झपाटलेला..

पण नियतीने कथेचा सापळा असा रचला
धडाकेबाज विदूषकाचा रोल तिनं काटला..

पण, बजरंगाची कमाल बघा
नियतीलाही बेट्याने हरवला..

अरे,रडवून ' जाईल ' तो विदूषक कसला ?

पडद्यावरून मनात उतरुन..

मनमुराद हसवत सर्वांना
लक्ष्या तर अमर झालेला..

लक्ष्या अमर झालेला..

कवयत्री: स्वप्ना

नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्‍या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त.

सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!

परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या . दोन हात आणि एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गँरंटी
मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालविली म्हणुन आता नियातिसुध्दा कसलीच गँरंटी
देत नाही. संतांच उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणुन संत कसलीच हमी मागत नाहीत.
ते निर्भय असतात.

-- व.पु.काळे
एकटीच मी रडते आहे, अश्रुंसाठी नयन कशाला?
जगायचेच जर एकट्याने,अश्रुंची तरी साथ कशाला?

तुझा चेहरा,तुझे अस्तीत्व अन् तुझा भास
भेटशील तु वा दुसरे कुणी,याचा आज विचार कशाला?

दुःख माझ्या आयुष्याची कधी रुसली ना रडली
साथ मज मिळेल वा न मिळेल,याची आज चिंता कशाला?

प्रेमाचा जर अंशूच नव्हता तुझ्या मनात
तर, तुझ्या ओठांवर माझ्या नावाचे शब्द कशाला?

कवी: अद्न्यात


एकदा लग्न झालं की , आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा
वाटण्याची जागा मग,
मूल
झालं की...
मोठं
घर झालं की...
अशा
अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या
काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.
मुलांच्या
वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला
नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की ...
आपल्या
दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला
मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त
झालो की ...
आपलं
आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो .
खरं
असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्žचय करायचा हेच बरं नाही का ?
जगायला
- खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं.
पण
, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्žवासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे
जाणारा कोणताही मार्ग नाही .
आनंद
हाच एक महामार्ग आहे.
म्हणून
प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा
सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी ... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी ... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते . पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.

आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्žनांची उत्तरं द्या पाहू -
- जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
- गेल्या पाच वर्षांत विश्žवसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
- या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
- गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ?

हं
! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी, या प्रश्ž नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का?
टाळ्यांचा
कडकडाट हवेत विरून जातो.
पदकं
आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही
लवकरच विसर पडतो.

आता
या चार प्रश्ž नांची उत्तरं द्या पाहू -
- तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
- तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ?
- आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
- तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं .

क्षणभर
विचार करा.
आयुष्य
अगदी छोटं आहे. ुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय ?
मी
सांगतो.
जगप्रसिद्ध
व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे ....
आता
एक गोष्ट.
काही
वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा
आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता
धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या
रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले .
सारे
मागे फिरले... सारे जण...
"डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?'' .
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले .
ते
दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता ...
त्यावेळी
तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात . का?
कुठेतरी
आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते .
आयुष्यातली
सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं . त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.

शक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल . कदाचित इतरांचंही...

दुसरी
मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का?

-- एक वृत्तापत्रतिल एक लेख