आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : अनोळखी वस्तू दिसल्यास स्पर्श करू नये. ( व्यक्तिंसह ) ...

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


जरुर वाचावं असं काही ..
http://khattamitha.blogspot.com/
http://www.sureshbhat.in/

अजुन एक संग्रह ;-)
मराठी कट्टा

.....................................................

दहाची नोट  

Posted



ती दहाची नोट तेवढीच त्याची संपत्ती
दप्तराचा कप्पा
कप्प्यातली कंपास
कंपासमधलं कोनमापक
आणि कोनमापकाच्या खाली बंदोबस्तात घडी करून ठेवलेली दहाची नोट

शाळेला उशीर झालाच होता
घिसाडघाईत जेवण झालं
अर्धमुर्ध भरलं पोट
बॅगेत भरली दहाची नोट

प्रार्थना सुरू असतांना
धापा टाकत आला
मान खाली प्रश्नाला
आज उशीर का झाला?

अंदाज होताच त्याला कदाचित होईल आज शिक्षा
उर फुटेस्तोर धावत आला पण केली नाही रिक्षा

शिक्षा पूर्ण झाल्यावर
बसला जाऊन बाकावर
ना अपराधी वाटलं त्याला
ना राग होता नाकावर

पाठ चांगलीच दुखत होती ओणवं उभं राहून
कंपासमधली नोट तेवढ्यात हळूच घेतली पाहून

यांत्रिकतेने फळ्यावरचं वहीत उतरलं थोडं
मनात मात्र दौडत होतं दहा रुपयाचं घोडं

एका मागून एक तास सरत गेले
मधली सुट्टी झाली
नोटेपुढे भूकही विसरून गेली स्वारी

बाकाबाकावर दिसू लागले नानारंगी डबे
फेरीवाले, आईसफ्रूटवाले शाळेबाहेर उभे
पैसे होते खाऊचे लागेल ते घ्यायला
पण शेवटी शाळेतल्या नळाचंच थंड पाणी प्याला
भुकेलेल्या पोटात त्याच्या थंड पाण्याचा घोट
पण अजून शाबूत होती त्याची दहाची नोट

बाबांनीच सकाळी खाऊसाठी दिलेली
पाठोपाठ आईसुद्धा ऑफीसला गेलेली
कार्टून पाहून झालं आणि गृहपाठही झाला
नोट घट्ट मूठीत ठेवून तो झोपी गेला
इवल्याश्या पेंगुळलेल्या डोळ्यांनी पाहिलं घड्याळाला
उडाली झोप, गडबड झाली शाळेला उशीर झाला
धांदलीतच त्याचं मग आटोपलं सारं
तरीही काळजीपूर्वक त्याने लावून घेतली खिडक्यादारं
आठवणीने ठेवून चावी शेजारी आला
आणि धावतपळत धडपडत शाळेला निघता झाला

अशाप्रकारे आज
शिक्षा भोगली
भूक सोसली
बरेच काढले हाल
काय करणार अखेर सारा दहाच्या नोटेचा सवाल

मधली सुट्टी संपली पुन्हा तास झाले सुरू
चिमण्यांनी भरून गेले वर्गरूपी तरू
चिमण्याच त्या दिवसभर निरागस चिवचिवणार्‍या
कापसाच्या घरट्यातून अचानक आभाळात भिरभिरणार्‍या
त्याच्याही डोक्यात होताच की विचारांचा चिवचिवाट
तासाशेवटी लिहून दिला हातभर गृहपाठ
वर्गात मुलांचे आळोखेपिळोखे सुरू झाले
शेवटचे रटाळ तास संपल्याचे टोल आले

संपली एकदाची
वारूळ फुटलं
जणू माश्या उठल्या
पोळं फुटलं

मुलांचा गलका
पालकांची गडबड
हसरे चेहरे
छोट्यांची बडबड

कुणी शाळेच्या भिंतीवर चढलेला
कुणाला मोठ्या दादांनी घेरलेला
कुणी मधल्या सुट्टीतली शिलकीतली लिमलेट गुपचूप घेतली खाऊन
कुणी चिंतातूर दमलेला आईची वाट पाहून

या गडबडीत मित्रांना चुकवून हा भरभर चालत सुटला
मित्र म्हणले असतील कदाचित "भावखाऊ कुठला"

नेहमीचा रस्ता
सवयीचा रस्ता
मंदिर आलं
दवाखाना आला
ते मैदानही मागे पडलं
वडापावच्या गाडीजवळून उजवीकडे वळला

पण ही नवी वाट
नजरेत शोधाशोध
बहुतेक वाट चुकला
बसस्टॉपवरती पाहिलं
आणि मनाशीच हसला

थोडं चालत पुढे गेला
त्याच्या ओळखीचा चेहरा
नावं नव्हतं माहित
म्हणून हाका मारली "ए मुला"

दिसतोस तू मला पैसे मागतांना
रोज लोकांकडून ओरडा खातांना

काल बाजारात त्या काकांनी तुला बेदम मारलं
मी बघत होतो उभा
आईने मला ओढत घरी आणलं

माझ्याकडे तेव्हा पैसे असते
तर तुला पक्का दिले असते

ए मला सांग तू पैसे का मागतोस?
तुला घरातून खाऊसाठी कोणी पैसे देतं का?
तुला सुट्टीच्या दिवशी बागेत फिरायला कोणी नेतं का?

पण सुट्टी ... तुला .. अं ..
बाबांना सांगून तू नवे कपडे का नाही घेत?
आमच्यासारखा तू शाळेत का नाही येत?

रडू नकोस
रडतोस का असा?
आजही कुणी मारलं का रे?
आईला नाव सांग त्यांचं .. ती ओरडेल
आईला सगळं सांगत जा रे ....

आई बाबा शाळा कपडे याची बडबड होती सुरू
रस्त्यावरचा तो भणंग भटका
ढोरासारखा लागला रडू

याला काही कळेना पण चेहरा पडला
वाटलं आपल्याच हातून काही मोठा गुन्हा घडला

रडू नकोस एक गंमत आणलीय मी
अरे बघ तरी
दप्तर उघडलं
कप्पा उघडला
कंपास उघडली
कोनमापक उचलला
बंदोबस्तातली दहाची नोट हलकेच बाहेर काढली

हे ठेव खाऊला
आज तुला कुणी मारणार नाही
हस आता तरी
चल चल उशिर झालाय जायला हवं घरी

आजच्यापुरतीची त्याची सारी संपत्ती देऊन तो गर्दीत शिरला
पुढल्याच क्षणी त्याच्या संपत्तीत एक कृतज्ञ अश्रू जिरला

-साद
http://churapaav.blogspot.com/2009/12/blog-post_26.html
- प्रसाद साळुंखे
(कवीची पुर्वपरवानगी न घेता आवडले म्हणून पोस्ट करत आहे , क्षमस्व )


लाला टांगेवाला...  

Posted

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ल लल्ल लल्ल ला

स्त्रोत : इ-पत्र
कवी: अद्न्यात

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांची जन्मदाती आई ही जिजाबाईसाहेबांची ओळख.पण त्यांची एव्हढीच ओळख करुन देणे हा त्यांच्यावर अन्याय होईल.देवगिरीचे सम्राट यादवराव हे भगवान श्रीकृष्णाचे वंशज.या यादवरावांच्या घराण्यामधील लखुजीराजे जाधवराव यांच्या खानदानी घराण्यात सन १५९८ मध्ये जिजाबाईसाहेबांचा जन्म सिंदखेडराजा येथे झाला.लखुजीराजे जाधवराव हे त्याकाळी निजामशाह दरबारामधील एक कर्तृत्ववान,मातब्बर सरदार !घरी गजांतलक्ष्मी नांदत होती.अशा ऐश्वर्यसंपन्न घराण्यात जन्मलेल्या जिजाबाईसाहेबांचे लग्न तितक्याच तोलामोलाच्या भोसले घराण्यामधील शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाले.भोसले हे मातब्बर,कर्तबगार,पराक्रमी सरदारहि निजामशहीच्याच पदरी चाकरी करीत होते. एका ऐश्वर्यसंपन्न खानदानी घराण्यातील मुलीने लग्नानंतर दुस~या ऐश्वर्यसंपन्न घराण्यातील खानदानी घराण्यात प्रवेश केला.शहाजीराजांबरोबर लग्न म्हणजे एका कर्तबगार,शुर,धाडसी...प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्वाकांशी विर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे व्रत!पौर्णिमेसारखे सुख,आनंद उपभोगणे व अमावस्येसारखे दुखःही भोगणे !नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या,वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले !वडील,भाऊ यांचे निजामशहाने भर दरबारामध्ये दगाबाजीने केलेले खून,पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविणे,सख्ख्या जाऊबाईंना मोंगल सुभेदाराने पळवून नेणे,शहाजीराजांचे अपमान हे सर्व त्यांनी भोगले.शहाजीराजांना निजामशाहीच्या नांवाखाली स्वतंत्र राज्य स्थापण्याला यश आले नाही व अदिलशाहाने त्यांना नवीन,मोठी जहागिरी देउन बंगरुळला पाठविले.भरपूर दागिने लेऊन,भरजारी रेशमी वस्त्रे घालुन,चांगले गोडधोड खाउन शहाजीराजांसोबत बंगरुळात ऐश्वर्यात जिवन जगणे त्यांना सहज शक्य होते.पण त्यांचा पिंडच वेगळा होता.महाराष्ट्रामध्ये मुसलमान बादशहांनी हिंदूंवर चालविलेले जुलूम,स्त्रियांवरील अत्याचार यामुळे त्या अस्वस्थ,बेचैन होत्या.रंजल्या गांजल्या सामान्य माणसाला या त्रासामधून सोडविण्यासाठी आपले राज्य,स्वराज्य हवे या विचाराने भारलेल्या जिजाऊसाहेबांनी सुखाने आनंदाने बंगरुळला शहाजीराजांसोबत रहायचे सोडून पुण्याच्या फक्त ३६ खेड्यांच्या जगागिरीमधून "स्वराज्य" निर्माण करण्याचे वेडे व्रत स्वीकारले.

 

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब-2

आदिलशाही सरदारांनी पुणे व आजूबाजजूचा शहाजीराजांच्या जहागिरीचा प्रदेश बेचिराख केला होता.अशा उध्वस्त,उजाड जहागिरीमधून हिंदवी स्वराज्य उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला.पतीच्या स्वराज्याच्या ध्यासाचे त्यांना सदैव भान होते.पुण्याच्या ३६ खेड्यांच्या उजाड जहागिरीच्या को~ या कागदावर त्यांनी स्वराज्य-मंदिर रेखाटण्यास सुरुवात केली.त्याकेवळ बाल शिवाजीराजांच्याच आऊसाहेब नव्हत्या.....त्यातर अवघ्या मावळातल्या स्वराज्यातल्या सर्व गोरगरीब सामान्य रयतेच्याच माऊली अन सावली झाल्या.रंजल्या-गांजल्या सर्वसामन्य रयतेच्या,साध्या सैनिक-शिलेदारांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी आऊसाहेबांचा आधाराचा हात सदैव सर्वांच्या पाठीवर असायचा.
जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व सतराव्या शतकात पुर्ण हिंदुस्थानामध्ये ठळकपणे उठुन दिसत होते. मुत्सद्दी,धडाडी,कणखरपणा,धैर्य या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अंधा~या आकाशात ठळकपणे तळपण्या~या धृव ता~या प्रमाणे मार्गदर्शक होते.त्यांचे निपक्षपाती न्यायदान,कर्तव्यकठोर स्वभाव,प्रजेबद्दलचे ममत्व,हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा,स्त्रियांच्या बेअब्रुची चिड यासर्वांचा परिणाम बाल शिवाजी राजांच्या जडणघडणीवर फार मोठा आहे.आऊसाहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या नंतरचे चार पुत्र अल्प वयातच मृत्यू पावले.पुढे शंभुराजेहि कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले.आता राहिले एकटे शिवाजी महाराज ! मात्र शिवाजी महाराजांवर आलेल्या अनेक संकटप्रसंगी त्या विचलीत झाल्या नाहीत.अफझलखानाला,आग्रा भेटीला जाण्याचा प्रसंग असो,आऊसाहेबांचा सल्ला असायचा..." सिऊबा बुद्धीने काम करणे,अफझलखानास मारोनी संभाजीचे ऊसने घेणे" "सिऊबा जाणे,राजकरण फते करुन येणे."कर्तव्यकठोर,न्यायनिष्ठू
र,प्रजावात्सल्य,शूर,प्रशासनकुशल अन मुत्सद्दी राजा घडविण्यासाठी जे जे आवश्यक आहे,ते ते त्यांनी केले.म्हणुनच शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना त्यामधून जिजाऊसाहेबांना वगळताच येणार नाही.
"राधा माधव विलास चंपू"या काव्यात्मक ग्रंथामध्ये जयराम पिंडे या समकालीन कवींनी जिजाऊसाहेबांचे वर्णन कसे केले आहे पहा...........
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई !
भली शोभली ज्यास जाया जिजाई !!
जिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला !
करी सावली माऊलीशी मुलाला !!
एके ठिकाणी जयराम पिंडे त्यांचा उल्लेख "योगिनी" असेहि करतात.

 

राजमाता पुण्यशील जिजाबाईआऊसाहेब.-3

जिजाबाईसाहेबांच्या कर्तृत्वाचे मुल्यमापन करताना डॉ.बाळकृष्ण म्हणतात......
she had the head of a man over the shoulders of a women.she remained a guide,philosopher and friend to shivaji through out her life.she anxiously watched the rising sun of the glory of her son and was fortunate to witness it's climax in his coronation as an independent king and an ornament of kshatriya race.
(जिजाबाईसाहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके(मुत्सद्दीपणा,बुद्धिमत्ता) मात्र पुरुषाचे होते.आपल्या सर्व आयुष्य़ामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक,तत्वज्ञ व ख~या मित्राप्रमाणेच राहिल्या.अतिशय उत्सुकतेने त्यांनी आपल्या मुलाचे सुर्याप्रमाणे दैदिप्यमन्य हिंदवी स्वराज्याचे वैभव पाहिले,आणि क्षत्रिय कुलामधील सार्वभौम सिंहासनाधिष्ठ हिंदू राज्याच्या रुपात आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा माध्यान्हहि पहाण्याचे भाग्य त्यांना त्यांच्या आयुष्यातच लाभले.)
राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसानंतर बुधवार दि.१७/०६/१६७४,जेष्ठ वद्य नवमी शके १५९६ रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचा मृत्यू झाला.महाराजांचा राज्याभिषेक पहाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पंचप्राण आपल्या वृद्ध,थकलेल्या शरिरामध्ये एकवटले होते अन आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून सिंहासनाधिष्ठित झालेला पाहून कृतार्थतेने त्यांनी शांतपणे,समाधानाने कैलासाची वाट धरली.त्यांचा मृत्यू नवज्वराने झाला असे शिवदिग्विजय बखरीमध्ये स्पष्ट लिहिले आहे.
जिजाऊमाँसाहेब म्हणजे महाराजांचे सर्वस्वच !त्यांच्या मृत्यूने महाराज अतीव शोकाकुल जहाले.महाराजांच्या शोकाकुल मनःस्थितीचे अतिशय ह्रुद्य वर्णन शिवदिग्विजय बखरीमध्ये उपलब्ध आहे........
"(महाराजांनी)आईसाहेबांचा आज्ञाभंग तिळमात्र केला नाही.......परस्परे एकाग्र अंतःकरणे होती.त्यामुळे क्षणैक वियोग जाला असता मनास चैन पडू नये,जावे,भेटावे असे (महाराज)वागत होते.ते छत्र (मातृछत्र)विच्छिन्न जाल्यामुळे उदासवृत्तीने......बहुतेकांनी नानाप्रकारे रंजने केली,परंतु कधी संतोष पहिल्याप्रमाणे जाला हे घडलेच नाही."
पुण्यशील,योगिनी जिजाबाई आईसाहेबांना लाख लाख प्रणाम .

सुभाष खडकबाण .

स्त्रोत : विरोप

भितिचित्र

भितिचित्र
09May09_Sawantwadi