आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, May 17, 2007

आयुष्य खूप सुंदर आहे

बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहे

जगायला गेलं तर


अश्रूंतही एक समाधान आहे

वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे

जपायला गेलं तर


काट्यांतही मखमल आहे

सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे

कुस्करायला गेलं तर


अपयशातही नवी आशा आहे

पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे

उमजायला गेलं तर


मातीतच खरं सोनं आहे

शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते

फुलांनी शरीर झाकल्यावर


निखाऱ्यांवर चालावं लागतं

कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते

हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर


कल्पना शक्तीचं प्रगती आहे

विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर


"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे

विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते

सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....


खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं

त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण

अगणित उत्तरांचं पीक आहे


@सनिल पांगे

No comments: