आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, April 03, 2008

पत्र


सध्याचा जमाना खरचं किती बदलला आहे ना...
पूर्वी लोक स्वतःच्या हाताने पत्र लिहून सर्व काही शेअर करायचे..
आणि आता ई-मेल आले...एसेमेस आले...
पण खरं तर हाताने लिहिलेल्या पत्रातून प्रत्यक्षात भेटल्याचा आनंद कसा मिळतो,
ते वाचा इंदिरा संत यांच्या या कवितेतून...


पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधूनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधूनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवई मधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्णविरामांच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरांतूनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातूनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी;तू हट्टी पण..

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायचे जाते राहून...

कवयित्री - इंदिरा संत


स्त्रोत : -पत्र

Wednesday, April 02, 2008

निर्सग- ग दि मा यांच्या नजरेतुन

एकापाठोपाठ दिवस येतात, जातात, तसेच मोसम येतात मोसम जातात...
तसाच एक पावसाळा...पण या पावसाळा कधी कसा येतो...एका वेगळ्या नजरेतून...
निर्सग सुद्धा एका कुटुंबासारखा आहे...आणि त्यातही नाती-गोती आहेतच
असा विचार करुन कवी ग.दि. माडगुळकरांनी एक सुंदर कल्पना मांडली आहे...

नदी सागरा मिळता,पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्याची म्हण,नाही नदीला माहेर

काय सांगू बाप्पारे,तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराला जाते,म्हणूनच जग चाले

सारे जीवन नदीचे,घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो,जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी,रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते,पंख वा~याचे लेवून

पुन्हा होऊन लेकरु,नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा,तेव्हा येतो पावसाळा...!

कवी -गदिमा
स्त्रोत : ई-पत्र

सुविचार

~:~ सुविचार ~:~

* भिती दार ठोठावेल, तेंव्हा धाडसाला ते उघडायला पाठवा. त्या दारातुन यश आत येईल.

* धंद्यात यशस्वी व्हायचे असेल,तर गि~हाइकाचे नाव लक्षात ठेवायला शिका. नावाने ओळखले जाणे सर्वाना आवडते.

* तुमच्याकडे जे आहे,त्यावर संपत्तीचे मोजमाप करु नका.
ज्याबदली तुम्ही पैसा घेणार नाही,अशा गोष्टिंमध्ये तिचे मोजमाप करा.

* कोणाही माणसाकडे असणारी सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपण.

* जगातील सर्वात प्रभावी संवाद म्हणजे प्रार्थना.

* समजत नाही, तो पर्यन्त कोणाची निंदा करु नये आणि समजल्यावर तर बिलकूल करु नये.
निंदा करण्याने फ़क्त पापाचे दनी होता येते.म्हणुन कुणी निंदा केली की साधकानी आनंदि व्हावे. निंदा करणा~याचे पुण्य दुस~याला मिळते आणि निन्दा करणा~याच्या पापात तेवढी वाढ होते. स्वस्थ राहावे,जग पहावे,हेच खरे !