आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, April 02, 2008

निर्सग- ग दि मा यांच्या नजरेतुन

एकापाठोपाठ दिवस येतात, जातात, तसेच मोसम येतात मोसम जातात...
तसाच एक पावसाळा...पण या पावसाळा कधी कसा येतो...एका वेगळ्या नजरेतून...
निर्सग सुद्धा एका कुटुंबासारखा आहे...आणि त्यातही नाती-गोती आहेतच
असा विचार करुन कवी ग.दि. माडगुळकरांनी एक सुंदर कल्पना मांडली आहे...

नदी सागरा मिळता,पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्याची म्हण,नाही नदीला माहेर

काय सांगू बाप्पारे,तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराला जाते,म्हणूनच जग चाले

सारे जीवन नदीचे,घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो,जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी,रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते,पंख वा~याचे लेवून

पुन्हा होऊन लेकरु,नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा,तेव्हा येतो पावसाळा...!

कवी -गदिमा
स्त्रोत : ई-पत्र

No comments: