आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, July 25, 2009

एल्गार


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

     ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
     मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.

     मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
     मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.

     याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
     मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

     मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
     मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.

-:    एल्गार     :-
- सुरेश भट 

No comments: