आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, July 02, 2008

संपलो नाही कधीच


संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतो
विझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतो

तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा
त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.

तुला वाटले माझी राख झाली ती कधीची
धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो

कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो

स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो

तुला जाण नाही आसवाच्या चवेची आजही
तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.

गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी
श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.

तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो

जेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.

नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.

तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो
अगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो.
कवि : अद्न्यात
स्त्रोत: इ-पत्र

No comments: