आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Monday, March 10, 2008

आयुष्याच्या निबंधात-

सुखसमाधानाचे पुर्णविराम फार कमी असतात,

निरुत्तर संतापाचे प्रश्नचिन्हच जास्त जमतात.

कधी हास्याच्या श्रावणसरी बरसतात,

तर कधी अश्रुंचे महापुर लोटतात.

कुणाचे काही हरवते, कुणाला काही गवसते,

कुणाचे कुठे तुटते, कुणाचे कुठे जुळते.

कुणाला मिळते पोर्णिमेची शीतल छाया,

कुणाला मिळतो अमावस्येचा दाट काळोख.

कधी असतो गोंगाट, कधी स्मशान शांतता,

प्रत्येकाच्या आयुष्याची निराळीच वार्ता.

तरीही प्रत्येकाला हा निबंध लिहावाच लागतो-

कारण "देवबाप्पाच्या" शाळेत जाब द्यावा लागतो.

स्त्रोत: आमचं ओर्कुट..

No comments: