आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, February 20, 2008

का कधी कधी ..................... ????????

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात ?

सुखाची फ़ुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर ...
तरी ते मात्र आपल्याला, दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात !

हसवत ठेवले जरी आपण नेहमी त्यांना ...
तरी ते मात्र नेहमी आपल्या डोळ्यांना अश्रूच देतात !

सोबत केली त्यांच्या गरजेच्या वेळी आपण ...
तरी ते मात्र आपल्याला एकटं सोडून निघून जातात !

आपण त्यांच्या आठवणीत रात्रंदिवस झुरलो तरीही ...
ते मात्र आपल्याला विसरून सुखाने जगतात !

का कधी कधी जवळचीच माणसं इतकी कठोरपणे वागतात

कवी: अद्न्यात

No comments: