आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, December 07, 2007

उसळलेला तूफ़ान सागर......
मनात भरते प्रेमाची घागर.....
कुठून तरी मग येते लाट.....
किनारा होतो भुई सपाट.....

ओहोटी भरती येतच राहते.....
आपला किनारा चाचपुन पाहते.....
कधी कधी येते लाट किनारी......
तर कधी दूर दूर आत घेउन जाते....

भरतीच्या वेळी स्वतःला सांभाळायचं.....
आलेल्या लाटेवरती तरंगत राहायचं.....
ओहोटी आली की पुन्हा तेच......
भरतीची वाट पाहत झुरत राहायचं.....

किना-याने ठेवावी एकच आस......
न धरावा सारखा भरतीचा ध्यास......
अथांग सागर घेउन येईल लाट......
पुन्हा होईल मग किनारा भुई सपाट......

पुन्हा होईल मग किनारा भुई सपाट......!!

........अमरीश अ. भिलारे

No comments: