आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, November 16, 2007

ऋतू आलाय बहरावर,
कोकीळ गातोय आंब्यावर,
मलाही आता राहवत नाय,
सूरात सूर मिसळत जाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

अशी वेळ एकांताची,
अशी रात्र विरहाची,
आता चंद्र उगवलाय,
तुही बेचैन सांगू लागलाय,
कसा निघेल इथुन पाय,वेड लागलंय नाहीतर काय !

इष्काच्या दुनियेत शिरलो काय,
कवितेवर कविता सुचत जाय,
काही नाही त्यात तुझ्याशिवाय,
आहे का याला काही उपाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

अचानक तू येतेस काय,
मला मिठीत घेतेस काय,
घुसळून निघतात भावना सार्या,
मन आकाशापल्याड जाय,
कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !

- प्रणव-सुजीत
http://pranaavsays.blogspot.com/

No comments: