आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, November 14, 2007

ओझं

युद्ध नुकतेच संपले होते, रणंभूमीवर प्रचंड पराक्रम गाजवुन सैनिक आपापल्या घरांकडे परतले होते. घरापासून दूर राहून पाच वर वर्षे लोटली होती . या काळात किती किती बदल झाले होते. युद्धाने सगळे काही बदलून टाकले होते.
पाच वर्षे! गेलेली पाच वर्षे परत आयुष्यात कधीच परतणार नव्हती. कुणाचा अट्टहास आणि कुणाचा बळी ! एकमेकांशी साधी तोंडओळख नसणारे जवान गडी, एकमेकांना जीव घेण्यास आतुर झाले होते. आणि ते अशा कोणाच्या सांगण्यावरून, ज्याला त्यांनी प्रत्यक्षात कधीच पाहिले नव्ह्ते.
पण आता परत वसंत पुन्हा फुलणार होता. ते भयाण वास्तव एखाद्या दुस्वप्नासरखे संपले होते. घरी जायच्या ओढ़ीनं आशुतोष नुसता बहारला होता. आई-बाबा त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते.

आशुतोष ने घरी फोन लावला. बाबांचा आवाज कानी पडताच गात्रं फुलून आली. बाबांना आनंदाचा आणि अभिमानाचे भरतं आले. गेल्या सहा महिन्यात अशुतोषशी - लड़क्या आशुशी साधं ऑपचारिक बोलन्यालाही ते पारखे झाले होते.
"बाबा, मी इथून उद्या निघतो आहे; दोन दिवसांनी घरी पोहोचेन," आशु म्हणाला- " पण बाबा, मला तुमची एक मदत-परवानगी म्हणा तर हवी आहे..."
"अर्थाताच ! बोल बाळा ..." बाबा म्हणाले !
"बाबा, माझ्या बरोबर माझा एक सैनिक मित्रही येणार आहे."
"अरे, ही तर आनंदाची गोष्ट आहे! आम्हां दोघा म्हातार्यांना त्याला भेटायला खूप आवडेल..." बाबा म्हणाले.
"पण बाबा, त्याच्या बद्दल एक गोष्ट तुम्हाला ठाऊक असणे अतिशय आवश्यक आहे," आशु म्हणाला - "युद्ध भुमिवर लढ़ता लढ़ता तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याचा पाय एका सुरंगावर पडला अणि हात अणि पाय त्याने गमावाला. त्याचे बिच्यार्याचे या जगात कोणी नाही. त्याला कूठेच आसरा नाही! माझी इच्छा आहे की त्याने आपल्याबरोबरच राहावं ! "
बाबा गंभीर झाले, " बाळ, मला तुझ्या मित्राबद्दल खरच खूप वाईट वाटतं . आपण त्याला मदत करू, हे नक्की. त्याला आपण जवळच कोठे तरी राहण्याची सोय करून देवू., ""
"नाही आई-बाबा:" मला तो आपल्याबरोबरच रहायला हवा आहे..." ठाम स्वरात आशु बोलला!"
"बाळ", बाबा समजावणीच्या स्वरात म्हणाले-" तुला भावनेच्या भरात हे समजत नाही की तू नक्की काय करतोय!" अशा अपंग व्यक्तिंची -मग तो कितीही जवळचा असला तरी जबाबदारी पेलणं फार कठीन असतं. आपणा सर्वांवर तो एक भार होवून राहिल. माझे ऐक, हा वेड़ा हट्ट सोड आणि ताबडतोब घरी ये! तुझा मित्र त्याच्या जीवनासाठी दूसरा मार्ग नक्कीच शोधेल. आपण सर्वच त्याला मदत करू......."
"...क्लिक ..." आशुने फोन नुसताच ठेवून दिला...
....महीना उलटला..... आशु घरी आला नाही. बाबा सतत फोंनजवळ बसून राहिले; आईच्या डोळ्यांची धार खलेना.... त्याचा संपर्कही होऊ शकला नाही .
.... आणि एक दिवशी अचानक दारी पोलिस उभे राहिले!
"तुमचा मुलगा आशुतोष एक उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली पडला व त्यात त्याचा मृत्यू झाला. ! पोलिस म्हणाले....
"... पण एकंदर परिस्थितीजन्य पुरावा पाहता, अपघातापेक्षा ही आत्महत्येची शक्यता जास्त वाटते..."ते पुढे म्हणाले!
आई-बाबांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शहरात यावे लागले.... एक शासकीय इस्पिताळात माँर्गमध्ये बाबा गेले... तिथल्या अटेंडंटने ड्रावर उघडला आणि बाबा जागच्या जागी थिजून गेले....
...तो मृतदेह लड़क्या अशुशाचाच होता...पण त्याला केवळ एक हात व एकच पाय होता...!

स्त्रोत : लोकसत्ता अंक
योगदान : संदीप

No comments: