Friday, December 07, 2007

उसळलेला तूफ़ान सागर......
मनात भरते प्रेमाची घागर.....
कुठून तरी मग येते लाट.....
किनारा होतो भुई सपाट.....

ओहोटी भरती येतच राहते.....
आपला किनारा चाचपुन पाहते.....
कधी कधी येते लाट किनारी......
तर कधी दूर दूर आत घेउन जाते....

भरतीच्या वेळी स्वतःला सांभाळायचं.....
आलेल्या लाटेवरती तरंगत राहायचं.....
ओहोटी आली की पुन्हा तेच......
भरतीची वाट पाहत झुरत राहायचं.....

किना-याने ठेवावी एकच आस......
न धरावा सारखा भरतीचा ध्यास......
अथांग सागर घेउन येईल लाट......
पुन्हा होईल मग किनारा भुई सपाट......

पुन्हा होईल मग किनारा भुई सपाट......!!

........अमरीश अ. भिलारे

No comments:

Post a Comment