Monday, November 12, 2007

माझ्याच विचारांनी ,
घातला मला घेराव..
केला माझ्या मनावर,
प्रश्नांचा भडिमार.....

दुर्लभ मनुष्य जन्म,
मग उपभोग काय वाईट?

जिव्हा जाणते चव,
आस्वाद घेणे काय वाईट?

नासिका जाणी गंध,
सुगंध घेणे काय वाईट?

कर्ण ऐकती ध्वनि,
लावणी ऐकणे काय वाईट?

परमात्म्याने दिली इंद्रियें,
सुखोपभोग काय वाईट?

मन थोडे सावरले,
हळूच सांगू लागले----

"करु नकोस अती की,
पर आत्म्यास होई क्लेश."

......अरविंद
http://mevamazyakavita.blogspot.com

No comments:

Post a Comment