Monday, November 12, 2007

खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही

मनातील भाव क्षणभर थबकले
हृदयातील शब्द कागदावर ओघळले
तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही

काजळ रात्रीतही प्रेम तुझे उजळले
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले
तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले
तरी तुला ते हृदयात ओतावंसं वाटलं नाही

तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही
मी तुझ्यासाठी तडफडणं, याशिवाय आता काही उरलं नाही …

-- कवी: अद्न्यात

No comments:

Post a Comment