Wednesday, October 24, 2007

तुझ्या कल्पनेच्या नदिच्या काठावर
त्रास होतो नुसतचं बसून राहण्याचा
प्रत्यकक्षात तो आनंद देशील का ग
तुझ्या प्रेमात नि:स्वार्थपणे वाहण्याचा

विरह ओळी...

कोण म्हणते ती निघून गेली?
बस थोड्या वेळाचा एकांत आहे...
दुराव्याची थोडीशी खंत आहे
पण मला माहीत आहे...
या आभासाचाही लवकरच अंत आहे!!!

आणि विडंबन चारोळी...

कोण म्हणते ती निघून गेली?
अरे तो तर एक नुसता आभास आहे...
मी लाख जा म्हणतो, मी लाख जा म्हणतो
पण ती जात नाही हाच तर त्रास आहे...

तु आहेस म्हणुन
आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मी
माणुस असल्याचं भान आहे

तशी माझी किंम्मत शुन्यचं
होतो मी ही जाणुन.
आता मलाही अर्थ आहे
तु आहेस म्हणुन.......

आपल्या दोघांमधील शर्यत
नेहमी बरोबरीतच सोडवायचिस
मी तुला हरवणार नव्हतोच
आणि तुही नाही जिंकायचिस्

फ़क्त एकच 'स्वास',..
माझ्या नवाचा घे,
वाटल्यास लगेच् सोड,
पण काळजापर्यन्त ने....

आपल्या दोघांच्या नात्यात
बरच काहि खास आहे
तरी ही आपल्याला जोडनारी
शब्दांची आस आहे...


No comments:

Post a Comment