Wednesday, October 15, 2008

आलास का पुन्हा तू?

एक गजल

आलास का पुन्हा तू? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.

रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.

शोधू कुठे तुला मी? रे काळजात माझ्या,
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.

दे लाघवी अश्रूच, दिलखुलास मागणे हे,
हा हास्य मुखवट्यांचा, झाला सुकाळ आहे.

आता चर्चा कशाला? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.

पूरे तुझे उसासे,या स्वप्निल पापण्या ही,
ढळली निशा पहाटे, झाली सकाळ आहे.

ये तू अता विठ्ठ्ला, तूझीच ओढ मजला,
वारीत माणसांचा, पडला दुष्काळ आहे.

वृत्त: आनंदकंद
कवयत्री : निशा

No comments:

Post a Comment