Thursday, April 03, 2008

पत्र


सध्याचा जमाना खरचं किती बदलला आहे ना...
पूर्वी लोक स्वतःच्या हाताने पत्र लिहून सर्व काही शेअर करायचे..
आणि आता ई-मेल आले...एसेमेस आले...
पण खरं तर हाताने लिहिलेल्या पत्रातून प्रत्यक्षात भेटल्याचा आनंद कसा मिळतो,
ते वाचा इंदिरा संत यांच्या या कवितेतून...


पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधूनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधूनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवई मधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्णविरामांच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरांतूनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातूनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी;तू हट्टी पण..

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायचे जाते राहून...

कवयित्री - इंदिरा संत


स्त्रोत : -पत्र

No comments:

Post a Comment