Monday, March 03, 2008

संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली
अंबराला नवी किनार देऊन सांज आली

घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली

गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली
अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली

संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली
उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली

पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली

तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..

- प्राजु

स्त्रोत : http://www.misalpav.com/node/709

No comments:

Post a Comment