Tuesday, February 05, 2008

तूच सारे बोल आता,
मी काहीच बोलत नाही......
हा-नाहीच्या पोरखेळात,
मी देखील डाव मांडत नाही

तूच सारे बोल आता,

मी काहीच बोलत नाही......

जस तु सांगशील
सगळं कदाचित तसंच होईल
तुझा प्रवाह सोडून
थोडसं मी वळण घेईणं,
पण सये प्रवाह, वळण बदलले तरी
पाणी मात्र बदलत नाही

तूच सारे बोल आता,

मी काहीच बोलत नाही......

मनाशी ठरवलंय आता
सगळ सगळ शब्दांत सांगायच
राहिलच काही बाकी तर
हातच राखून ठेवायच,
तू ही एक लक्षात ठेव
अबोलात जेव्हढा अर्थ असतो
तेवढा शब्दांत मात्र नाही

तूच सारे बोल आता,

मी काहीच बोलत नाही......

खरच मनाला विचार एकदा
प्रेम वैगेरे असं असत का काही,
मी सतावलाय माझ्याच मनाला
प्रेम काही गैर नाही,
अगं सगळ-सगळ समजतय,
मला किंवा तुला
भातुकळीच्या खेळामधले आपण
बाहुला-बाहुली देखील नाही

पण, तूच सारे बोल आता

मी काहीच बोलत नाही.....

कळुन चुकलय मला आता
ज्योतिश्य-वाल्यांचे पोपट देखील,
खरं कधीच बोलत नाही
दगडी- देह परिधान केलेला देव
नेमाने नमस्कार करणाय्राला देखील,
कधीच कौल देत नहीं
अगं ज्याला जे हव
त्याला ते कधीच मिळत नाही
मला तू हवीस,
पण तुला ही ते उमगत नाही,

तूच सारे बोल आता
मी काहीच बोलत नाही.....

पण, तूच सारे बोल आता
मी काहीच बोलत नाही.....

कवी,
अमित जाधव

No comments:

Post a Comment