Tuesday, November 20, 2007

शब्द मोत्यांसारखे असतात म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना, शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

खुप
दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!

प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!

No comments:

Post a Comment