Wednesday, November 14, 2007

कॉलेज मध्ये असताना
भेटीगाठी व्हायच्या
क्त्ट्यवरचा चहा
वादाची लज्जत वाढवायचा
घोळकयात असताना
दोघच दोघ असायचो
एकटे एकटे असताना
सगळेच सोबत असायचो
कालपारवा भेटलो तरी
मधली तास युग वाटायची
फॉनेवर गप्पा मारायला
तेव्हा केवढी मजा वाटायची
आयुष्याच्या वळणावर
अवचित भेट झाली होती
दोघांच्या मनाने तेव्हा
मैत्रीची गाणी म्हटली होती
अंतर दोघांमधले
निमिशात दूर झाले होते
विरह तुज़ा होतच उरत
काहूर माजले होते
मी या नात्याला मैत्रीचे
नाव दिले होते
तेव्हाच तू त्याला
प्रीती असेही म्हटले होते...

-- चैताली

No comments:

Post a Comment