Wednesday, October 31, 2007

तुझी आठवण
नित्य नवा अनुभव आहे,
कधी उसळणारं वादळतर
कधी अळवावरच पाणी आह
--सानिका (सोनाली वैद्य।)

कसं सांगू तुला, काय वाटतं मला?
तुला तरी कळतंय का, काय झालंय मला?
माझंच मन मला विचारतंय, माझं बरोबर आहे का चुकतंय?
माझं मलाच कळत नाही, तुला तरी कशी सांगणार वेड्या?

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून,
पुन्हा आपल्यावरच रागवणार..

याच आश्रुंचा मग
दिसलाय मला तळा साठताना
तुला सोडून निघाल्यानंतर
पाहिलाय त्याना कडेलोट होताना

तुझी आठवण येताच माझ्या मनाची
हालत हि त्या वाती सारखी झाली होती
जीच्या दिव्यातले तेल संपले होते
तरी जगण्याची धडपड चालू होती।

No comments:

Post a Comment