Wednesday, October 10, 2007

हवं ते मिळालं की ,
बाळ खुश होऊन जातं . .
बाळ गोड गोड हसून
आपल्याला ही खुलवतं ....

हवं ते मिळालं तरी ,
आपण नाखुशच असतो ...
पळत्याच्या पाठीमागे
सारखे धावत असतो....

आनंदाचा क्षण काही
टिकवून ठेवता येत नाही . .
दैवाला दूषण देवून
हव्यास सोडता येत नाही ....

हृदयात डोकावून पाहिले
तर कारुण्य खूप दिसते...
पण तेवढीच जागा ही
आनंदाने व्यापलेली असते....

जावू नये दु:खाने पोळून
की सुखाने खूप हूरळून ...
शांत शांत वाटेल बघा,
दोघांचा समतोल ठेवून ....


कवी: ..........

No comments:

Post a Comment