Wednesday, September 26, 2007


बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.....
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही......
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.....
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही....
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.....

कवी : अद्न्यात

No comments:

Post a Comment