Monday, September 10, 2007

ना कशाची तक्रार, ना कोणाचा राग मला
ना कशाची आस, ना प्रेमाचा रोग मला

मी अर्थहीन गोष्ट, जीला सारांशच नाही
ना कळलो मी जगाला, ना कळले जग मला

एका पराजयाने खचलो, पुन्हा उठलोच नाही
देवा इतके विजय, का दिलेस सलग मला

मिरची समजून कोणी, केली देहाची भाजणी
साखरही दिली कोणी, तरी होते भगभग मला

वेदनांनी मज गोंजरले, दुःखांनी कुरवाळले
तूही दे आसवांचे नव्याने ढग मला

निजलो आज शांततेत, ज्या मृत्युच्या कूशीत
दोन फुले आणशील, का आशेची जाग मला

अंधारात मिटली होती, पापणी माझ्या दु:खांची
मग का दिला जिवना, पुन्हा काळा रंग मला

जिवन प्रश्नचिन्ह झाले, उत्तर सोडवता सोडवता
आता तुझ्याच गणिताचं, तूच उत्तर सांग मला

सनिल पांगे

No comments:

Post a Comment