Thursday, July 05, 2007

गांधारी-
कोण म्हणतं ?
दुःखाची परिसीमा
म्हणजे मरण आहे,
मी तर म्हणेन,
स्वतःतून स्वतःच हरवणं
आणि स्वतःच कलेवर
आयुष्यभर वागवणं,
यासारखं दुःख नाही,
डोळे बांधून नावडतं जग
आपलसं करणं आणि
आवडतं सारं स्वप्नात जगणं,
गांधारीसारखं यासारखं दुःख नाही,
हो आणि डोळ्यांना पट्टी बांधली तरी कोण म्हणतं,
गांधारीला स्वप्न पडत नव्हतं।

No comments:

Post a Comment