Tuesday, July 10, 2007

या कवितेस मज्या मैत्रिनिचा प्रतिसाद आसा आला

नको रे मना बोल ते नवऱ्याचे
असे की जणू भाला छातीत टोचे
त्याच्या या जिव्हा कोण घाले लगाम
अशा वीरांगनांना हजारो सलाम

अशा नवऱ्याला कसा आवरावा
भ्रष्ट हा विचार कसा सावरावा
कुणी थोर तो काय सांगेल युक्ति
तया पावलांची शिरी लावू माती

कसा जिवघेणा अघोरी हा त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
विधि सांगते नीट ध्यानी धरावे
मरावे परि लग्न ना हे करावे.



No comments:

Post a Comment